(Ratnagiri Accident News) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सोमवार दि. १९ मे रोजी पहाटे भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला असून येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन चारचाकी गाडी थेट १०० फूट खाली कोसळली. यामध्ये गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथील नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
Read More
गोव्यातील शिरगावमध्ये आयोजित लैराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला असून परिस्थितीबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आढावा घेतला.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक, निर्माता, गीतकार आणि अभिनेता म्हणून ओळख असलेले श्रीरंग गोडबोले यांनी अलीकडेच मराठी चित्रपट व्यवसायाच्या आर्थिक वास्तवावर परखड मत व्यक्त केले. त्यांच्या मते, दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला सुमारे २०० कोटी रुपयांचा तोटा होत आहे, त्यामुळे अनेक निर्माते चित्रपट निर्मितीपासून दूर जात आहेत.
आपल्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे गुंतवणूकदार मोठ्या विश्वासाने एखाद्या कंपनीत अथवा वित्तीय संस्थेत गुंतवतात. अल्पकालीन लाभही त्यांच्या पदरी पडतात पण, कालांतराने गुंतवणूक केलेली संस्थाच फसवणूक करीत असल्याचे उघडकीस येते आणि गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांची आयुष्यभराची जमापुंजीच क्षणार्धात नाहीशी होते. मुंबईत अलीकडे उघडकीस आलेला ‘टोरेस’ कंपनीचा घोटाळा असेल किंवा ‘न्यू इंडिया बँके’तील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण, गुंतवणूकदारांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना संपूर्ण खबरदारी घेणे अत्यंत म
Jalgoan Train Accident जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग राज्यातील शहरी-ग्रामीण भागांना जोडण्याबरोबरच, संपूर्ण राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम करणार आहे. दोन राज्यांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्याबरोबरच, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणारा हा प्रकल्प म्हणूनच महत्त्वाचा ठरावा.
अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार असून, महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला ‘स्थळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
(Mumbai-Goa Highway) राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विभागाचा मंत्री म्हणून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी दिली.
Goa Liberation Saga गोव्यावरील पोर्तुगीजांची साडेचारशे वर्षांची जुलूमी, अन्यायकारक राजवट उलथवून भारतीय सैन्याने दि. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केले. गोव्याच्या या मुक्तीसंग्रामात केवळ स्थानिक नव्हे, तर देशभरातील स्वातंत्र्यसेनानी सामील झाले. कित्येकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यानिमित्ताने गोवामुक्ती गाथेचे सिंहावलोकन...
अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यानिमित्ताने दै. मुंबई तरुण भारतने नाना पाटेकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साकारलेल्या अनेक जुन्या कलाकृतींच्या आठवणी नानांनी सांगितल्या.
विनोदवीर, टायमिंगचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट पाहिलेला आणि त्यांचा चाहता नसलेला एकही मराठी प्रेक्षक सापडणार नाही. अनेक सुपरहिट मराठी चित्रपट, नाटक देणाऱ्या लक्ष्मीकांत यांचा पछाडलेला हा चित्रपट शेवटचा ठरला. या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री नीलम शिर्के यांनी नुकत्याच एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव सांगितले.
चित्रपट हे जरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे माध्यम असले, तरी त्यातून कायम जीवन जगण्याचा संदेश मिळतोच. मात्र, कुठलीही कलाकृती एकाग्रतेने पाहणेही तितकेच गरजेचे असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘ब्रिंग देम डाऊन’ हा चित्रपट. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग नुकतेच गोव्यातील 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपटप्रेमींसाठी करण्यात आले. जगभरात हा चित्रपट 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, थोडक्यात जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...
गोवा पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी या महोत्सवाची सांगता झाली. तसेच, यावेळी भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा देखील संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा उमटवत घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदीवडेकर यांन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पण हा पुरस्कार पटकावला.
पणजी : ५५व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारात ( Iffi ) महाराष्ट्र चित्रपट, ‘रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून सहभागी झालेल्या ‘छबिला’, ‘तेरवं’, ‘विषयहार्ड’, ‘आत्मपॅमप्लेट’ या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजीमधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मा शिरोमणी, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, ‘ऑस्करज्युरी’ उज्ज्वल निरगुडकर, महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, ‘इम्
55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात ‘इफ्फी’ला दि. 20 नोव्हेंबर रोजी दिमाखात सुरुवात झाली असून, या महोत्सवात देशविदेशातील चित्रपटांची मेजवानी चित्रपटप्रेमींना अनुभवायला मिळते आहेच. सोबतच गोव्यातील पारंपरिक संस्कृतीदेखील जपण्याचा विशेष प्रयत्न गोवा सरकारने या महोत्सवात केलेला दिसतो. त्याअंतर्गत शतकानुशतकांची परंपरा असलेले कुणबी कापडाचे आणि इकोफ्रेंडली आकाशकंदिलांचे स्टॉल्स हे लक्षवेधी ठरावे. ‘इफ्फी’ महोत्सवात अशाच कला जगभरातून आलेल्या अतिथींपर्यंत पोहोचविण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आ
गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाला मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झालेली अगदी तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. पुढे जसजसे सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर येत गेले तसतसे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट महाराष्ट्रभरात २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला. २० वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचाम चाहता वर्ग साहजिकच दुसऱ्या भागाकडे वळला आणि तो त्यांना आवडला देखील. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करताना दिसत असून ‘नवरा माझा नवसाचा २’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व २८ जुलै २०२४ ला सुरू झाले. १०० दिवसांचा फॉर्मेट असलेल्या या कार्यक्रमाने मात्र यंदा ती अट मोडित काढत केवळ ७० दिवसांचाच खेळ रंगवायचा निर्णय घेतला आहे. आणि जसा फिनाले जवळ येत आहे त्यानुसार टास्क अधिक कठिण केले जात आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात नवा टास्क 'महाचक्रव्युह' पाहायला मिळाला. या टास्क नंतर निक्की तंबोळी रडताना दिसली.
दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला ७.४४ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. पण या पाचव्या सीझनचं कौतुक होण्यापेक्षा प्रेक्षक या सीझनलला ट्रोल अधिक करत आहेत. बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळाले. अगदी नव्या होस्टपासून ते घरातील सदस्यांच्या अनपेक्षित स्वभावापर्यंत. या पर्वाने टीआरपीचेही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वांनाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. त्यामुळेच पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण, कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार
गोव्यातील पेडणे गावचे रहिवासी असलेले मकबूल माळगिमनी हे गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सवाचा सण साजरा करत आहेत. मूळचे कर्नाटकातील हुबळीचे हे कुटुंब गोव्यात स्थायिक झालेले आहे. प्रत्येक वर्षी ते त्यांच्या कुटुंबीयांसह हा उत्सव मनोभावे साजरा करतात. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याच मुस्लीम समाजामधून विरोध करण्यात आला होता, परंतु मकबूल माळगिमनी यांनी गणेशोत्सव हा सर्वधर्मींयाचा सण आहे, असे आदरपूर्वक निक्षून सांगितले.
मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्य एकमेकांवर आगपाखड करत आहेत. परंतू, घरातील काही सदस्य मर्यादा ओलांडून घरातील वयाने आणि अभिनय क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीतही ज्येष्ठ कलाकारांवर टीका करत आहेत. नुकताच घरात 'सत्याचा पंचनामा' हा टास्क झाला. या टास्कमध्ये सदस्यांनी प्रत्येकाच्या मताला असहमती दिल्याने त्यांना कोणतीही बीबी करन्सी मिळवता आली नाही. टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर चांगलीच भडकलेली दिसली. तिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावरुन टीका केली असून
मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार सुरु आहे. प्रत्येक सदस्य एकमेकांच्या नाकीनऊ आणताना पहिल्या दिवसापासून दिसत आहे. सर्वच सदस्य जबरदस्त खेळ खेळून घरात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. टास्कमध्ये बऱ्याचदा भांडणं तर होतातच पण सदस्य नव्या भागात आपल्याला भावुक होताना दिसणार आहेत. बिग बॉसने सदस्यांना फोन घेऊन कुटुंबाशी बोलायला सांगितलं. त्यावेळी सर्वच सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं.
‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
सध्या मालिकाविश्वात एकाच शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे आणि तो म्हणजे मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन. पहिल्या एपिसोपासूनच निक्की तंबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यात ठिणग्या पडताना दिसल्या. बऱ्याचदा अतिशय चुकीच्या भाषेत निक्की वर्षा यांच्यासोबत बोलताना दिसली. पण आता तिने नुकत्याच बेबी टास्कमध्ये सर्व सीमा ओलांडल्या आहेत. वयानं मोठ्या असलेल्या सदस्यांचा अपमान करणं, त्यांना नको ते बोलणं यामुळं तिच्यावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. यावेळी निक्कीने कहर करत वर्षा उसगांवकर यांना त्यांच्या मातृत्वावरू
कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या विशेष गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत. पण या सगळ्या सदस्यांपैकी निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची तर सगळ्याच सीमा ओलांडल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणांवरुन निक्की आणि तिची टीम घरात वाद घालताना दिसतात. बऱ्याचदा निक्की घरातील बरेच नियमही मोडताना दिसते. यावरुन सोशल मीडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीने निक्कीच्या कानाखाली लगावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घर
महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं "डम डम डम डम डमरू वाजे...." हे गाजलेलं गाणं "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. "डम डम डम डम डमरू वाजे...." या रिक्रिएट केलेल्या गाण्याचं गीतलेखन प्रवीण दवणे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केले आहे.
तब्बल १९ वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या "नवरा माझा नवसाचा" ह्या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" ह्या चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टीजर व्हिडिओला तर अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला. नुकतेच ह्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बहुचर्चित मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून २८ जुलै २०२४ पासून कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरु झाला आहे. आता १०० दिवस मराठी मनोरंजनसृष्टीतील १६ सदस्य कल्ला करणार आहेत. दरम्यान, नवा सीझन असल्यामुळे यावेळी नवा होस्ट अर्थात रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेणार आहे तर बिग बॉस देखील एका वेगळ्या आणि नव्या रुपात दिसणार आहेत. जाणून घ्या कोण आहेत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील १६ सदस्य...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळा लवकरच रंगणार असून या चित्रपटसोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५व्या आणि ५६व्या आवृत्तीसाठी कपूर महोत्सव प्रमुख असणार आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अजरामर चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा'. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या कथेने, प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता पुन्हा एकदा भक्ती आणि वक्रतुंड नवा नवस फेडायला निघाले आहेत. २० वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा २ येत असून या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या अनेक चित्रपटांच्या यादीत 'अशीही बनवाबनवी' हा चित्रपट नक्कीच येतो. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. त्यामुळे अशीही बनावाबनवीचा सिक्वेल येणार का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी अभिनेते सचिन पिळगांवकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सप्ष्टपणे उत्तर दिले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर ३ दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन टप्प्यात हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत असेल. तर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत पुन्हा हा ब्लॉक असेल. या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहानांसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे. कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यादा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी, असा उल्लेख करत राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तीन टप्प्यात मी बोलणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक यांसारख्या महत्त्वकांशी निर्णयाचे स्वागत केले. राम मंदिर झाल्यानंतर शरयू नदीत फेकून दिलेल्या कारसेवकांच्या मृतात्म्याला शांती मिळाली. तिहेरी तलाक रद्द करत मुस्लीम भगिनींना न्याय दिला. याच प्रकारे कलम ३७० हटवून तो भाग मोदींनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे अधोरेख
देशाच्या विकास, समृद्धी आणि संपन्नतेचं आमचं व्हिजन
सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे, परंतु त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. अनेक चढउतार यादरम्यान आले. त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. कलाकारां
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात गोवा राज्यातील दोन्ही जागांसाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. आजच्या घटकेला काँग्रेस पक्षासाठी प्रत्येक जागा ही महत्त्वाची असतानाही गोव्यातील दोन जागा जिंकण्यासाठी या पक्षाने काहीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही, तर ’अबकी बार चारसो पार’चा नारा देत निवडणूक लढाईत उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र कधीही नव्हते एवढे लक्ष यावेळेस दोन्ही जागा जिंकण्यासाठी केंद्रित केले असून काँग्रेस नेतृत्वास अपेक्षित असा निकाल येथे लागला, तर त्याचे कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील एका बोगद्यामधून दुतर्फा वाहतूक सोमवारपासून (ता. १) सुरू करण्यात आली. हलक्या वाहनानांच परवानगी दिलेली असताना रात्रीच्यावेळी अवजड वाहने दुसऱ्या बाजूने बोगद्यातून ये-जा करतात. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. मात्र महाराष्ट्र दिनाच्यादिवशीच कोकणातील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला सुरूवात झाली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे गाणं न ऐकलेला एकही श्रोता मिळणार नाही. लहानपणापासून कानांवर पडलेले पहिले सुर नक्कीच बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि लता दीदींचे (Lata Mangeshkar) असतील यात तिळमात्र शंका नाही. पण लता दीदींची एक नवी ओळख जगासमोर आली असती याचा खुलासा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून
गोवातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्यघटना गोव्यातील जनतेवर जबरदस्तीने लादण्यात आल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी राज्यातील रहिवाशांसाठी दुहेरी नागरिकत्वाची मागणी केली आहे जेणेकरून ते भारताचे तसेच पोर्तुगालचे नागरिक होऊ शकतील. या मागण्या त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या होत्या. यावर राहुल गांधी यांनी फर्नांडिस यांना विचार करण्यास सांगितले होते. भाजपने त्यांच्या वक्तव्याला देशाचा विनाश करणारे म्हटले आहे.
वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकार्यत्यांनी वनमानवाला ताब्यात घेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. (Slender loris rescue)
देशात सध्या लोकसभा निवडणूकांची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक कलाकारांनी मनोरंजन क्षेत्रासह आता राजकारणातही प्रवेश केला आहे. तसेच, लोकसभा निवडणूकीसाठी विविध जागांवरुन काही कलाकारांची वर्णी लागली आहे. भाजपकडून कंगना रणावत, अरुण गोविल या कलाकारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. आता आणखी एक मराठी कलाकार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आता राजकारणात प्रवेश करत थेट निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली असून यावर स्वत: सचिन यांनी प्
सूचना सेठ नामक महिलेने गोव्यातील एका हॉटेलमध्ये स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला आहे. पणजीच्या बाल न्यायालयात सुचना सेठ यांच्याविरोधात ६२४ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात सुचना सेठ यांनीच स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक कलाकार देखील प्रेक्षकांना हा चित्रपट आवर्जून पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. अशात अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचे कौतुक करत तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: र
आम आदमी पक्ष आणि त्याचे एकमेव नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभाराची अधिक भयावह आवृत्ती बनण्याच्या प्रयत्नात आहेत. केजरीवाल यांची राजकारणात उतरण्यापूर्वीची वक्तव्ये आणि एक नेता म्हणून त्यांनी केलेले वर्तन हे भारतातील कसलेल्या भ्रष्ट नेत्यांनाही लाजविणारे. तुरुंगात जाईन, पण मुख्यमंत्रिपद सोडणार नाही, हे केजरीवाल यांचे वर्तन पाहून भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादवही शरमिंदे झाले असतील; कारण त्यांनीही अटक झाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शुचिता दाखविली होती.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) हा चित्रपट २००४ रोजी प्रदर्शित झाला होता. आजही २० वर्षांनी तो चित्रपट प्रेक्षकांना पाहताना आनंद होतो. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट भेटीला येणार असून आता नवस फेडायला वक्रतुंड अर्थात वॅकी आणि भक्ती कुठे जाणार आणि यावेळी सहप्रवाशांसोबत काय धमाल मस्ती होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना ‘महाएमटीबी’च्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ अभिनेते जयवंत वा
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दोन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात रणदीप स्वत: वीर (Swatantryaveer Savarkar) सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर या चित्रपटातील आणखी महत्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची झलक समोर आली आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) या चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांचा लूक समोर आला आहे.
नवस फेडण्यासाठी सामान्य माणसांना काय काय करावं लागतं याचं उत्तम उदाहरण देणारा चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha). दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी २००४ साली ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणून मनोरंजनाची आणखी एक पायरी सर केली होती. आजही २० वर्षांनी हा चित्रपट, त्यातील प्रत्येक पात्र लोकं आवडीने पाहतात. काही दिवसांपुर्वी याच चित्रपटाचा पुढचा भाग ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha) हा चित्रपट येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी
गोवा शासनाने महाप्रितबरोबर केलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने पुढील पाऊल टाकलेले असून सुमारे २०० कोटी रुपयांची सोलरविषयक कामे मंजूर करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे.