मधुमेह निदानाचा नव्याने विचार आवश्यक
भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरची मोठी चिंता. मधुमेहाच्या निदानासाठी ‘एचबीए१सी’ ही चाचणी व्यापकपणे वापरली जात असली, तरी दक्षिण आशियातील विशिष्ट आरोग्यस्थिती लक्षात घेता, तिच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अॅनिमिया, हिमोग्लोबिन विकार आणि आनुवंशिक घटक यांमुळे या चाचणीचे निष्कर्ष दिशाभूल करणारे ठरू शकतात. परिणामी, मधुमेहाचे निदान उशिरा होणे किंवा चुकीचे ठरण्याची शयता वाढते. या पार्श्वभूमीवर मधुमेह निदानाच्या पद्धतींचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.





