|| गीतासार भाग २५ ||
Gita Saar पांडवांचा वनवास आणि एक वर्षांचा अज्ञातवास अशाकरिताच, दुर्योधनाकडून रचला गेला. ‘द्यू’ म्हणजे भ्रमात्मक अवस्था आणि ‘द्यूत’ म्हणजे मायेचा खेळ. धर्मराज मायेचा खेळ दुर्योधनाशी खेळतो आणि आपले पंचप्राणरूपी पाच गावे, स्वतःसकट पाच वृत्तीरूप बंधू आणि शेवटी कायावृत्ती द्रौपदीही पणात गमावतो. पूर्ववत् पांडव होण्याकरिता त्यांना वनात जाऊन प्रभू श्रीरामांप्रमाणे तापसी जीवन जगावे लागते. यामुळे त्यांची पूर्वीची पुण्यावस्था प्राप्त होते. यालाच व्यास १२ वर्षांचा वनवास म्हणतात. त्या काळात तपाकरिता १२ वर्षांचा काळ मान्






