कल्याण करी रामराया...
मराठी संतपरंपरेत भक्ती, वैराग्य, राष्ट्रधर्म आणि पुरुषार्थ यांचा अद्वितीय संगम घडवून आणणारे तेजस्वी संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा केंद्रबिंदू होता, श्रीरामभक्ती. समर्थांच्या दृष्टीने श्रीराम हे केवळ मंदिरातील पूजनीय देव नव्हते; तर ते मानवतेचा, धर्मनिष्ठ राजकारभाराचा आणि पराक्रमाचा मूर्तिमंत आदर्श होते. म्हणूनच समर्थांनी आपल्या वाङ्मयातून आणि जीवनातून रामभक्तीला एक व्यापक सामाजिक व राष्ट्रीय स्वरूप दिले. आज श्रीराम नवमी आणि रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्ताने समर्थांच्या रा





