गीतासार ( भाग १२)
कर्णाने प्रतिज्ञा केली की, दुसरा दिवस उजाडताच तो पांडवांना ठार मारेल. हे ऐकून दुर्योधन त्या रात्री सुखाने झोपला; कारण त्याचे शत्रू पांडव मारले जाण्याची शक्यता अधिक बळावली होती. पांडवांच्या शिबिरात ही बातमी पोहोचली आणि त्यामुळे पांडव बेचैन झाले. कर्ण जे बोलेल त्याप्रमाणे करेल, कारण कर्ण युद्धशास्त्रात परमवीर आहे. पांडवांनी श्रेष्ठबुद्धी भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि त्यांनी पांडवांना सुयोग्य मार्गदर्शन केले. श्रीकृष्णास माहीत होते की, कर्ण मोठा दानशूर आहे. थोडी स्तुती केल्यानंतर आणि प्रातःकाली कोणाही ब्





