डाव्यांच्या राजवटीत हिंसा, रक्तपात आणि राजकीय हत्या
काँग्रेसप्रणित पश्चिम बंगालच्या राजकारणाला १९६० नंतर 'लाल बावट्या'सह 'लाल सलाम' रूपी वामपंथी क्रांतीचे वारे जोरात धडकू लागले. याच आधाराने 'पुंजीपती' म्हणजेच काँग्रेसचे राज्य उलटवून टाकण्यासाठी 'गरिबांचे मसीहा' म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि बंदुकीच्या नळीतूनच सरकार साकार करण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन माओवादाच्या धर्तीवर चारू मुजुमदार, कानू संन्याल आणि काही आदिवासी नेतृत्वाने नक्षल चळवळ सुरू केली.





