साहित्य संस्था लोकाभिमुख असणे आवश्यक : डॉ. धनश्री साने
साहित्य, संस्कृतीची, प्रबोधनाची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात येणार्या काळात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनदेखील पुण्यात संपन्न होणार आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’च्या माध्यमातून या संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. या संमेलनात साहित्य परिषदेच्या विविध शाखांचा सुद्धा सहभाग असेल. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या डोंबिवली शाखेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. धनश्री साने यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...





