नव्या युगाचे नवे संकट...
भारत सध्या एका नव्या आरोग्य समस्येच्या उंबरठ्यावर उभा असून, आजारांचा चेहरामोहराच झपाट्याने बदलत आहे. बाह्यतः निरोगी भासणाऱ्या समाजात अंतर्गत पातळीवर आरोग्याच्या समस्या मात्र झपाट्याने वाढताना दिसतात. वेगवान जीवनशैली, तंत्रज्ञानावर वाढते अवलंबित्व आणि बदललेल्या दैनंदिन सवयी यांचा मानवी शरीरावरही खोलवर परिणाम झालेला दिसून येतो. यातूनच अनेक मूक आजारांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर या आजारांचा आणि त्यावरील प्रभावी उपाययोजनांचा घेतलेला आढावा...





