भारतीय हॉकी संघ सध्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतो. अशाच विजेत्या भारतीय हॉकीपटूंचा सन्मान सोहळा नुकताच ’हॉकी इंडिया’च्यावतीने नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी १९७५ साली सर्वप्रथम हॉकी विश्वचषकावर नाव कोरणार्या भारतीय हॉकी संघालाही यथोचित गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने भारतीय हॉकीविश्वाचा क्रीडावेध घेणारा हा लेख...
Read More
पहिलीवहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा ( Kho-kho world cup ) दि. १३ ते दि. १९ जानेवारीदरम्यान संपन्न झाली. भारताने मुलांच्या व मुलींच्या अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकाविले. त्यानिमित्ताने भारतीय खो-खो स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावणार्या श्रीरंग इनामदार आणि सुधीर परब यांच्या खो-खो विषयक मतांचा आणि खो-खो स्पर्धेत ‘मट टू मॅट’ चषकातला ‘खो’ कोणाला, याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने विजयाचे खाते उघडले आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयानंतर आगामी सामन्यात देखील विजय मिळवावा लागेल. महिला विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर १०६ धावांचे आव्हान दिले होते.
टी-२० विश्वकप जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या चार खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. विधान भवनात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून हे चारही खेळाडू विधानभवनाकडे रवाना झाले आहेत. T20 World Cup
आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण सुरु आहे, असे म्हणत भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चांगली खेळी करत तब्बल १३ वर्षांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. या पार्श्वभूमीवर आज मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार करण्यात येणार आहे. पण या सत्काराचे निमंत्रण नसल्याचे सांगत भाई जगताप आणि अनिल परब यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावर प्रविण दरेकर यांनी विरोधक आनंदाच्या गोष्टीतही राजकारण करत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची भुमिका
रोहित शर्मा हे टी-२० चे जगातील यशस्वी कर्णधार आहे. त्यांनी उत्तम कॅप्टनच्या परंपरेला चार चांद लावले आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीने विधानभवनात टीम इंडियाच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील चार खेळाडूंचा शुक्रवारी विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारण हे क्रिकेटसारखंच असतं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली. राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण टीमला ११ कोटी रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात दि. ४ जुलै २०२४ रोजी रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपून ही गर्दी ओसरल्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या भागात सकाळी चालण्यासाठी नित्यनेमाने येणाऱ्या मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर स्वच्छ करून उपल्बध करून देण्यात आला.
वर्ल्ड कप (T-20 World Cup) जिंकल्यानंतर आज टीम इंडिया भारतात दाखल झाली असून अख्खी मुंबई त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे.
भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देश आनंदात नाहून निघाला आहे.. अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला. या विजयानंतर भारतासह जगभरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथे सुरु असलेल्या टी-२० विश्चचषकाची स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यात भारताचा संघ जर दृष्ट लागण्याजोगी कामगिरी करत असेल, तर मग भरातीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण येते. हा होणारा विश्चचषक पहिल्यांदाच अमेरिकेत होत आहे. त्याच बरोबर अनेक गोष्टी या स्पर्धेत नव्याने होत आहेत त्याचा य लेखात घेतलेला आढावा....
युएसए व वेस्ट इंडिज संयुक्त यजमानपद टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर ८ अंतर्गत टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुध्द होणार आहे. याआधीच टीम इंडियाचे वर्ल्डकपनंतर होणाऱ्या दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडून मुलाखती घेण्यात येत आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कोण याबाबत स्पष्ट होणार आहे.
भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता युएसए संघाचा एक भाग असलेल्या सौरभविषयी नवी माहिती समोर आली आहे.
भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आतंरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधील ड्रॉप-इन पिचची चर्चा वर्ल्डकपच्या निमित्ताने क्रिकेट विश्वात रंगली आहे. दरम्यान, भारताचा तिसरा सामना युएसएसोबत होणार असून टीम इंडिया विजयासह सुपर ८ मध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुध्द बांग्लादेश यांच्यात नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात डीआरएसवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. अंपायरच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.
न्यूयॉर्क येथे झालेल्या भारत विरुध्द पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यात एक विचित्र प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. भारत-पाक सामन्याआधी राष्ट्रगीत सुरू असताना आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे साऱ्यांचे लक्ष जाताच नवे वादळ निर्माण झाले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात टी २० वर्ल्डकपचा सामना रंगणार असून न्यूयॉर्क येथे दोन संघात लढत होणार आहे. या सामन्याची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा असून चाहते सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत पाक सामना रात्री ८ वाजल्यापासून न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.
भारतीय फुटबॉलचा पोस्टर बॉय असणारा सुनिल छेत्री यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. फुटबॉल या खेळात असून देखील, त्याने भारतीयांच्या मनावर अधिराज्य केले हे नाकारता येणार नाही. सुनिल छेत्री येत्या ६ जून रोजी आपला शेवटचा सामना खेळणार आहे. भारताच्या या स्टार खेळाडूविषयी या लेखातून जाणून घेऊया....
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये दि. १ जून २०२४ पासून सुरू होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषकावर दहशतवादी धोका निर्माण झाला आहे. विश्वचषक स्पर्धेला लागलेला हा दहशतवादी धोका पाकिस्तानकडून आला आहे. या धोक्याबाबत जारी करण्यात आलेल्या सुरक्षा सतर्कतेमध्ये असे म्हटले आहे की, “प्रो-इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) मीडियाने अफगाणिस्तान-पाकिस्तान-आधारित इसिस खोरासान या दहशतवादी संघटनेने दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे.
१ जुनपासुन सुरु होणाऱ्या टि २० विश्वचषकासाठी ( t20 world cup 2024 ) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडीज आणि य़ुएसए येथे केले जाणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माच्या नेतृत्वात बिसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने भारतातील प्रत्येक नागरिकाची छाती अभिमानाने फुलून येईल अशी कामगिरी १९८३ साली विश्वचषकावर देशाचे नाव कोरत केली होती. क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूने किती परिश्रम केले होते, त्यांची आर्थिक, मानसिक स्थिती कशी होती हे सारं काही ‘८३’ या चित्रपटात दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. ‘८३’ चित्रपटाचा भाग होण्याची संधी मराठमोळा अभिनेता आदिनाथ महेश कोठारे याला मिळाली होती. नुकताच त्याचा पंचक चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला. यावेळी महाएमटीबीशी बोलताना त्याने ‘८३’ चि
"तुम्ही जे स्वप्न पाहिले होते ते तुमच्याकडून पूर्ण झाले नाही तर तुम्हाला वाईट वाटते. खरंतर, हे सोपे नाही, पण आयुष्य पुढे जात असते अशा भावना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोहित शर्मा मीडियापासून दूर गेला होता. पराभवाच्या धक्क्याविषयी त्याने भाष्य केले आहे.
आता परत एकदा ऑस्ट्रेलियाला टी-२०मध्ये पराभूत करण्याची संधी भारताला चालून आली आहे. तो आनंद समस्त भारतीयांनी आता घ्यायचा आहे. या टी-२०च्या विजयाने आपल्याला ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात नमवता न आल्याच्या जखमेवर थोडीफार का होईना फुंकर घालता येईल.
भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विश्वचषकाचे आयोजन खुप फायदेशिर ठरला आहे. विश्वचषकादरम्यान, देशातील मद्य, विमान वाहतूक आणि ऑनलाईन फूड डिलव्हरी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. विश्वचषकादरम्यान, फूड डिलव्हरी कंपन्यांच्या ऑडर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, "एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये आले आणि सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ही मोठी गोष्ट होती. यासाठी त्यांनी भारतीय पंतप्रधानांचे आभारही व्यक्त केले. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही संघ त्याच उत्साहाने खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले.
टीम इंडियाने वर्ल्ड कप २०२३ ची ट्रॉफी गमावल्यानंतर संपूर्ण भारत दु:खी असताना, पाकिस्तानमध्ये आनंद साजरा केला जात आहे. यापूर्वी अनेक कारणांमुळे वादात सापडलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने टीम इंडियाच्या पराभवावर म्हटले आहे की, भारताचा पराभव झाला हे चांगले आहे. त्यांच्या मते, असे झाले नसते तर संपूर्ण क्रिकेट भारताकडे वळले असते आणि क्रिकेटचा पराभव झाला असता.
आपण काय बोलतो, कोणाला उद्देशून बोलतो, संसदेत कसे वागतो याचे भान म्हणा प्रारंभीपासून राहुल गांधींना नव्हतेच. त्यांच्यासारख्या सर्वज्ञानीला तसे कोणी काँग्रेसमध्ये चार भल्या गोष्टी शिकवण्याचाही प्रश्न नाही आणि जिथे त्यांच्या मातोश्रीच पंतप्रधानांचा उल्लेख ‘मौदा का सौदागर’ असा करतात, तिथे मातृसंस्कारांची अपेक्षा तर शून्यच!
ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून वर्ल्डकप ट्रॉफी पटकावली. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या ट्रॉफीची काहीच किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियन कांगारू वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कागांरुंवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झालं आहे. या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही. पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे.
विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये निराशा पसरली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी यासंदर्भातील एक फोटो शेअर केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, भारताला विश्वचषक मिळावे यासाठी देशभरातील जनता प्रार्थना करत आहे. यासाठी पुजा, हवन, उपवास करण्यात येत आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मैदानात रविवारी दि. १९ नोव्हेंबर २ वाजता सामन्याला सुरुवात होत आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यातच भारतीय हवाई दलाने सुद्धा रोहितसेनेच्या उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमवर हवाई प्रात्यक्षिक दाखवले.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. . भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक अंदाजात फलंदाजी करत त्याने ३१ चेंडूंमध्ये ४७ धावावर असताना मॅक्सवेलच्या बॉलिंगवर उंच फटका मारताना बाद झाला. रोहितच्या रुपात भारताला मोठा झटका बसला आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४० धावा फलकावर लावू शकला.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. कांगारूंना पहिला झटका बसला असून डेव्हिड वॉर्नर ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. मोहम्मद शामीने त्याला स्लीपमध्ये विराटकरवी झेलबाद केले. विराटने स्लीपमध्ये तितकाच उत्तम झेल घेतला.
अहमदाबादमध्ये गांधींजींचा वारसा जपणार्या साबरमती आश्रमाला वळसा घातला की पुढे वीस मिनिटांच्या अंतरावर नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम लागते. जगातील सर्वाधिक अत्याधुनिक अशा या स्टेडियममध्ये भारताचे अकरा शिलेदार या वर्ल्डकपमधील आपला अकरावा आणि फायनलचा मुकाबला खेळायला मैदनात उतरले तेव्हा सव्वा लाख क्षमतेचे हे स्टेडियम उत्साहाने भारून गेल होते.
सलग नऊ विजयांनंतर ‘विश्वचषका’च्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयाने भारतीय क्रिकेट संघाला हुलकावणी दिली असली, तरी संघाची आजवरची ‘विश्वचषका’तील सातत्यपूर्ण कामगिरी ही सर्वस्वी कौतुकास्पदच. तेव्हा त्याचे श्रेय संपूर्ण संघाचे असले, तरी संघाचा कर्णधार म्हणून ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे नेतृत्व अव्वल ठरावे. त्यानिमित्ताने कुशल कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा हा लेख...
क्रिकेट विश्वचषक सुरु झाल्यापासून पाकिस्तानचे सध्याचे क्रिकेटपटू किंवा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वादग्रस्त विधान करत आहेत. त्यांचा भारत आणि हिंदूंबद्दलचा द्वेषला ही ते वाट मोकळी करून देत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, जो कोणी अयोध्येतील राम मंदिरात जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अकरमने सिकंदर बख्तच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला असून तो म्हणाला, नाणेफेक करताना कोणतेही विशिष्ट नियम नाहीत त्यामुळे बख्तच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे अकरमने यावेळी म्हटले आहे. तसेच, वसीम अकरमने पुढे स्पष्ट केले की, तेथे ठेवलेली मॅट केवळ प्रायोजकत्वासाठी आहे, त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांनी सिकंदर बख्त यांनी लाज काढल्याचे अकरम यावेळी म्हणाले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुध्द ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात पावसाचे व्यत्यय आल्यास काय होणार, कोणत्या नियमांनुसार निकाल लागणार हे याबद्दल जाणून घेऊया.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया हा विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या फायनल मॅचपूर्वी स्टेडियमवर अनेक कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
यंदाचा विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळविण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना येत्या रविवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी स्टेडियमवर जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
विश्वचषकातील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाकडून विशेष एअर शो देखील होणार आहे. दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर गोल्डन बॉल आणि बॅट कोणत्या खेळाडूला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
अहमदाबाद येथे रविवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी मध्य रेल्वेने क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वचषकच्या उपांत्य फेरीत भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने यशस्वी बाजी मारली. क्रिकेटचा हा सामना पाहण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामान्यांसह कलाकारांनी देखील मोठी गर्दी केली होती. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी सामन्याला हजेरी लावली नसली तरी त्यांनी केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत एका खेळाडूंचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे ते म्हणजे मोहम्मद शमी. मोहम्मद शमीला या विजयाचे श्रेय दिले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आगामी लोकसभा निवडणूक आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न विचारण्यात आले. निवडणूक काळात पक्ष मतदारांना वेगवेगळी अमिषं दाखवत आहेत. परंतु, निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षांवर आक्षेप घेतोय असं बोललं जात आहे. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं उदाहरण दिलं आहे.
ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये, पाकिस्तानी संघ ९ पैकी ५ सामने गमावून लीग फेजमधूव बाहेर पडला होता, त्यानंतर त्याला त्याच्या मायदेशी बेरंग परतावे लागले होते. यानंतर बाबर आझम यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तर पीसीबीने (पाकिस्तानी क्रिकेट संघ) आता वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर शान मसूदकडे कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.