वनवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नयेत, या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती व आदिवासी एकता परिषदेच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला. यावेळी अदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी, आदिवासी नेते हंसराज खेवरा आदीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने वनवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. भर दुपारी गगनभेदी घोषणा देत साकेत मैदानातुन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच करीत मोर्चेकऱ्यानी मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दि
Read More