पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत देश प्रगतीची नवनवीन शिखरं गाठत असतानाच, भारताच्या शिरपेचात अजून एक मनाचा तोरा खोवला गेला आहे. डोमिनिका या देशाचा सर्वोच्च सन्मान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. कोव्हीड काळात ज्या वेळेस महामारीचे तांडव सुरू होते, त्या वेळेस भारतीयांच्या रक्षणासाठीच नव्हे, जगाच्या पाठीवर लोकांना वैक्सीन पोहोचवण्याचे कार्यकेल्याबद्दल मोदींचा सन्मान केला जातो आहे.
Read More
‘लोकल ते ग्लोबल’ होण्याच्या शर्यतीत आणि जागतिकीकरणाच्या चढाओढीत या जगालाच जणू निसर्गाचा, पर्यावरणाचा आणि पर्यायाने होणार्या अपरिमित नुकसानाचा विसर पडतोय का, असा प्रश्न उपस्थित केला तर तो अजिबात वावगा ठरू नये. मोठमोठ्या कंपन्या, प्रचंड प्रदूषण निर्माण करणारे कारखाने यांची संख्याही वाढत असताना, यावर फेरविचार केला जातोय का, हाही एक प्रश्नच.
भारताचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर 'पिनाका'ला खरेदी करण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील दोन देशांनी रस दाखवला आहे. भारतीय सैन्य दलासाठी या रॉकेट लाँचरची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने केलेली आहे. या रॉकेट लाँचरमधून १२० ते २०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करता येतो.
दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशाने सार्वमताने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील संरक्षित क्षेत्रामध्ये भविष्यातील सर्व खनिज तेलासाठीचे ‘ड्रिलिंग’ थांबवण्याचा निर्णय नुकताच घेतला. इक्वेडोरच्या पूर्वेकडील अॅमेझॉनमधील यासुनी नॅशनल पार्कमधील ठरावीक जागेवर कच्च्या तेलाचे उत्खनन करावे का करू नये, हे ठरवण्यासाठी लाखो लोकांची देशव्यापी जनमत चाचणीत घेण्यात आली.
राष्ट्रीय आणीबाणी म्हंटलं की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेली आणीबाणी भारतीयांना स्मरावी. खरं तर अंतर्गत सुरक्षा, परकीय आक्रमण किंवा मोठ्याप्रमाणात उद्भवलेले आर्थिक संकट अशा काही आपात्कालीन घटनांमुळे त्या-त्या राष्ट्राकडून आणीबाणी घोषित केली जाते. दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकतीच देशभरात आणीबाणी घोषित केली.
एकविसाव्या शतकात बरेचदा प्रत्यक्ष युद्धापेक्षा अप्रत्यक्ष युद्धावरच भर अधिक दिसतो. एकापेक्षा एक सरस अण्वस्त्रे जरी भात्यात असली तरी, एकतर अर्थव्यवस्थेद्वारे स्थानिक बाजारपेठ संपवली जाते अन् दुसरे म्हणजे समोरील देशातील तरुण पिढीला नशेद्वारे बरबाद तरी केले जाते. जगाच्या पाठीवर चालणारी नशेच्या पदार्थांची तस्करी आणि महासत्तेकडे वाटचाल करणार्या भारतावर याचा होणारादूरगामी परिणाम याची त्यानिमित्ताने चिकित्सा होणे महत्त्वाचे आहे.
काँ‘ग्लोबल साऊथ’ म्हणविल्या जाणार्या गटातील एक महत्त्वाचा देश म्हणजे कोलंबिया. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला वसलेला हा एक प्रमुख देश. या देशाची भूराजकीय, भूव्यापारीदृष्ट्या जागाही तितकीच मोक्याची. उत्तरेला कॅरेबियन समुद्र तर पश्चिमेला अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर
‘ब्रिक्स’ देशांनी मिळून एखादे सामायिक चलन सुरू केले तरी भारताचा त्यातील सहभाग नाममात्र असेल. द्विपक्षीय किंवा बहुराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरच्याऐवजी स्थानिक किंवा अन्य चलन वापरण्याचा पर्याय खुला असला तरी वेळोवेळी मूल्याच्या निर्धारणासाठी त्यांची अमेरिकन डॉलरशीच तुलना करण्यात येईल. त्यामुळे अमेरिकेवर दबाव येऊन तिच्याकडून आर्थिक शिस्त पाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील.
प्लास्टिकपासून अनेक वस्तू बनतात हे खरे. परंतु, प्लास्टिकचा खडक आढळणे ही बाब तशी आश्चर्यचकित करणारी. परंतु, होय हे खरे आहे! ब्राझीलच्या ट्रिनडेड ज्वालामुखी पर्वतावर प्लास्टिकचे खडक आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, याठिकाणी कुठलीही मानवी वस्ती वा मानवाचा वावर नसतानाही हे खडक मोठ्या प्रमाणावर आ
भारताचे आज जगभरातील देशांसोबत उत्तम परराष्ट्र आणि व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले दिसतात. खासकरून 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परराष्ट्र धोरणाची चक्रही वेगाने फिरू लागली. पंतप्रधानांच्या दौर्याइतकेच महत्त्व परराष्ट्र मंत्र्यांच्या दौर्यांना, त्यांनी देशविदेशात मांडलेल्या भूमिकांना प्राप्त झाले. आधी सुषमा स्वराज आणि सध्या एस. जयशंकर यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणनिर्मितीत आणि त्याच्या प्रत्यक्ष कृतिपरिवर्तनात मोलाची भूमिका बजावली. नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण अमेरिकेतील
दक्षिण अमेरिकेतील लोकांच्या मनात भारताबद्दल आकर्षण असले तरी परराष्ट्र संबंधांच्या बाबतीत अनेकदा आपली अवस्था ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ अशी असते. परस्पर सहकार्यातून समृद्धीच्या अनेक संधी असूनही भारत आणि दक्षिण अमेरिकेतील मोठे अंतर, दळणवळणाचे मर्यादित पर्याय, वेगळ्या भाषा आणि दक्षिण अमेरिकेतील राजकीय अस्थिरता यामुळे आपण या क्षमतेला न्याय देऊ शकलो नाही.
२०१४ साली व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकूमशहा असल्याचा आरोप करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी शेजारी देश अर्थात अमेरिका आणि विरोधक तयारच होते.