युद्ध आणि शांतता या गोष्टी आपण सहसा राजकारण, रणनीती किंवा इतिहासाशी जोडतो. पण, प्रत्येक संघर्षाच्या मुळाशी आणि प्रत्येक शांततेच्या प्रयत्नामागे असतो एक महत्त्वाचा घटक, मानवी मन. मानसशास्त्रज्ञांनी हे मनोविज्ञान सखोलपणे अभ्यासले असून, माणसाला युद्धाकडे काय ओढते आणि शांततेकडे तो कसा वळतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा अभ्यास सांगतो की, आपली विचारशक्ती, भावना आणि सामाजिक वर्तन यांचा अभ्यास केल्याने अधिक शांततामय समाज घडू शकतो. विसंगती वाटेल, पण युद्ध काही लोकांसाठी मानसिक आणि सामाजिक गरजा पूर्ण क
Read More
मानवी आयुष्याला अधिक सुखी करण्यासाठी दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. मात्र, पाश्चात्य तंत्रज्ञान हे मानवी शरीराच्या श्रमपरिहाराचे लक्ष्य ठेवूनच निर्माण झाले असल्याने, ते मानवी शरीराचाच विचार करते, तर भारतीय संस्कृतीत सुखाच्या व्याख्येत पंचकोशीय शरीराचा विचार करण्यात आला आहे.
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन ' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल, त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी समाजात आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक करावे असे, आवाहन भाजपचे अखिल भारतीय संघटन महामंत्री व्ही. सतीश यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव अंतर्गत सर्व धर्मीय अध्यात्मिक साधकांच्या संवादाचा विशेष कार्यक्रम रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
राज्यभरात येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून शासनाच्या सर्व विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या मानवी हल्याच्या घटना थांबता थांबत नाही आहेत (chandrapur tiger attack). मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रहिवासी मारुती बोरकर हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले (chandrapur tiger attack). जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात वाघाच्या हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाला असून २०२४-२५ सालात मानव-वन्यजीव संघर्षात ६७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (chandrapur tiger attack)
Manav Sharma suicide उत्तर प्रदेशातील आग्र्यात आयटी कंपनीच्या टीएसमध्ये भारती व्यवस्थापक असलेल्या मानव शर्मा (Manav Sharma suicide) यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्नीच्या छळाला कांटाळून आत्महत्या केली. मानवने गळ्यात गळफास बांधत आत्महत्या केली आहे. या घटनेसंबंधित ६.५७ मिनिटांचा व्हिडिओ बनवला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नांदेड : मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या संशोधनाला अमेरिकन पेटंट ( Research Got US Patent ) मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम सखाराम माने व डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने हा शोध लावला. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन हा ऊर्जानिर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतो हे त्यांनी या संशोधनातून सिद्ध केले. मानवी मूत्राचा वापर करून कार्बन पदार्थाची निर्मिती केली जाणार आहे आणि या पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. मानेंनी कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठात पोस
कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) मानवी बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकत नाही, या मतावर सुरुवातीच्या काळात अनेकजण ठाम होते. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ने अल्पावधीतच अनेकांना त्यांचे हे मत बदलायला लावले. ‘एआय’ अस्तित्वात आल्यानंतर, एकामागोमाग एक अशा अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घ्यायला सुरुवात केली. इतके सगळे होत असतानाही साहित्यक्षेत्रात ‘एआय’ शिरकाव करू शकणार नाही, असे काहींना वाटत होतेच. कारण, साहित्यात बुद्धिमत्तेची जितकी गरज असते, तितकीच भावनिकतेची असते. साहित्य म्हणजे बुद्धि
V Ramasubramaniam सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम (V Ramasubramanian) यांची सोमवारी २३ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC चे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून रोहिंटन नरिमन यांची नियुक्ती न झाल्याने काँग्रेसनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणाचे पत्र आता समोर आले आहे.
"सर्व धर्मांचा जो एक धर्म आहे, जो शाश्वत आहे, तो सनातन हिंदू धर्म आहे. जगाचाही तोच धर्म आहे, मात्र जग त्याला विसरले. या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य ज्या सेवाधर्माचे पालन करतात, तो सेवा धर्म म्हणजेच मानवधर्म." असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहनजी भागवत यांनी काढले. Sarsanghachalak on Sanatan Dharma
मुंबई : एस.एन.डी.टी. ( SNDT ) महिला विद्यापीठाच्या मानवी विकास विभागाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (एनईपी-२०२०) अंतर्गत पूर्वप्राथमिक बालकांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १९ व २० डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
"बांगलादेशातील हिंसाचार प्रकरणी चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा आहे. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर वेगळे उपाय शोधावे लागतील. हिंदूंवर होणारे अत्याचार आता सहन केले जाणार नाहीत. बांगलादेशातील अत्याच्यार थांबवण्यासाठी विश्वशक्तीला संघटित व्हावे लागेल!", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. Sunil Ambekar on Bangladesh
मानवाधिकार दिनानिमित्त जारी केलेल्या एका परिपत्रकातून बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांनी एक अजब दावा केला आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार प्रत्येक नागरिकाचे मानवी हक्क जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी 'मानवाधिकार दिन' बांगलादेशात साजरा केल्यानिमित्त हे परिपत्रक काढण्यात आले आहे. Muhammad Yunus Human Rights Day
न्यूयॉर्क : ( Hamas ) हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने वर्षभरापूर्वी गाझा पट्टीवर हल्ले चढविले होते. आता जवळपास ८० टक्के गाझापट्टीतील इमारती विदीर्ण अवस्थेत आहेत. हमासचे दहशतवादी या हल्ल्यांचे लक्ष्य असताना गाझातील ७० टक्के महिला आणि मुले या युद्धात ठार झाल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव? | Psychology of Violence | Dr. Nandu Mulmule | MahaMTB Gappa मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा...
बहराइच येथील झालेल्या हिंसाचारात आरोपींच्या घरावर बुलडोझरच्या कारवाई होत आहेत. हे प्रकरण आता मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील डॉ. गजेंद्र सिंह यादव यांनी आयोगात याचिका दाखल करून आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्यास बंदीची मागणी केली आहे. असे कृत्य केल्यास मानवी हक्कांचे उल्लंघन असेल असे ते म्हणाले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक प्रा. श्याम मानव यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आयोजित कार्यक्रमात हिंदू साधू, संत व महापुरुषाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. यादरम्यान त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील करण्यात आली. या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने तहसीलदार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. Shyam Manav insult Hindu Sadhu
जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (यूएनएचआरसी) ५७ व्या अधिवेशनात जयपूरच्या मुस्लिम महिला फैजा रिफत यांनी भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) पाठिंबा दर्शविला आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांसाठी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा करण्याचे सीएएचे उद्दिष्ट रिफत यांनी यावेळी अधोरेखित केले. (Indian Muslim Women Support CAA)
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
"तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) हे आजही त्या समितीवर कार्यरत आहेत. संतांवर जातीयवादी टीका करणार्या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा!", अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने नुकतीच शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव हे येत्या विधानसभा निवडणूकीत इंडिया आघाडीचा प्रचार करणार आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकशाही धोक्यात असल्यामुळे विधानसभेत इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
निवडणूक जवळ आल्याने श्याम मानव यांना जाग आली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा. त्यानंतर तुम्ही ईडीच्या प्रकरणातून सुटाल, असा दबाव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकण्यात आल्याचा दावा श्याम मानव यांनी केला होता. यावर आता केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले.
एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला आहे. ईडीच्या आरोपांमधून सुटका मिळवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्रांवर सही करण्याचा अनिल देशमुखांवर दबाव आणण्यात आला होता, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. यावर आता फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-या
साने गुरुजींनी आग्रह केला म्हणून तिने लिहायला सुरुवात केली. तसं लेखन हा तिचा प्रांत नव्हता. ती होती अभ्यासक. पाहून, वाचणं, निरीक्षण करणं, ती नोंदवून त्या आधारे आपले विचार मांडणं आणि त्यातून व्यक्त होणं ही सर्वसाधारण तिच्या लेखणीची पद्धत. एखादी व्यक्तिरेखा मूल्य वैशिष्ठ्यांच्या मापावर तोलून खुलवून सांगणे तिचे वैशिष्ट्य. संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर
केंद्र सरकारने सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी ह्युमन गॅमेट्स म्हणजेच प्रजनन पेशींच्या आयातीवर बंदी घातली आहे. याआधी सरकारने २०१५ मध्ये मानवी भ्रूण आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आता प्रजनन पेशींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग करुन भारत दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आपल्या गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणी सुरू करणार आहे. या चाचणीसाठी विकसित केलेल्या अंतराळयानातून अंतराळवीरांना बाहेर काढणारी यंत्रणा 'क्रू एस्केप सिस्टीम'ची चाचणी घेण्याची योजना आहे.
या जगाचा अन्नदाता, पालनपोषणकर्ता जो परमेश्वर त्याचे नाव मुखाने घेऊन त्याच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करावी. भगवंताचे रामाचे नाव आदराने कृतज्ञापूर्वक भावाने घेण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाही. ते फुकाचे आहे. म्हणजे अक्षरश: फुकट आहे. फक्त तेथे अतीव आदर व कृतज्ञताभाव यांची आवश्यकता असते.
बागेश्वरधाम सरकार पिठाधिश्वर धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या विरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे प्रा. श्याम मानव नागपूरमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कायद्यानुसार तक्रारही दाखल केली. मात्र, नागपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा केला असे चौकशीअंती स्पष्ट दिसत नाही, असा निर्वाळा दिला. पुढे शास्त्री आणि मानव या दोघांनीही एकमेकांना आव्हान दिले. या घटनेचा उहापोहकेल्यानंतर काही प्रश्न मनात आले, ते या लेखात विचारण्याचा प्रयत्न केला आहे.
मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कार्यरत आहे. समाजामध्ये याबद्दल जाणीव जागृती व्हावी, या हेतूनेच 'राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत' ही संकल्पना समोर ठेवून सुनावणी आयोजित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना या माध्यमातून त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
‘एकात्म मानव दर्शन - संकल्पना कोश’(Ekatma Maanav Darshan - Glossary of Concepts)या एका विशेष कोशाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे प्रकाशन सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती होती. सदर कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘एकात्म मानव दर्शन - संकल्पना कोश’ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय चिंतनावर आधारित या कोशाविषयी...
पठाण चित्रपट अनेक कारणांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. हिंदू संघटनांनी भगव्या रंगाचा अपमान केला या कारणामुळे चित्रपटाच्या गाण्याबाबत निषेध व्यक्त केला. तर अर्धवस्त्र परिधान करून नृत्य करणारी अभिनेत्री पाहून हा पठाण समाजाचा अपमान आहे असे मुस्लिम संघटनांचे म्हणणे होते. त्यानंतर आता भगव्या रंगाचा वापर अर्धवस्त्रासाठी करण्याला मुस्लिम संघटनांचाही विरोध असल्याचे निदर्शनास येत आहे. आरटीआय आक्टिविस्ट डॅनिश खान यांनी या रंगावर आक्षेप घेतला आहे.
ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह या कृत्यात सहभागी असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्याना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली होती
संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले. गेल्या अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या यासंबंधीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. आता तो अहवाल समोर आला आणि चीन वगळता स्वतःला मानवाधिकारवादी, उदारमतवादी वगैरे म्हणवून घेणार्या देशांमध्ये खळबळ माजली.
नगर जिल्हयात एका हिंदु महिलेचे जबरदस्तीने बेकायदेशीर धर्म परिवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवधिकार परिषेदेने उघडकीस आणून या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाईसाठी आणि पीडितेला न्याय देण्यासाठी लढा उभारला आहे.
प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणी त्यांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. नुकतेच त्याला न्यायालयाने दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. १५ वर्षांपूर्वी दिलर मेहंदीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात असलेल्या कोळसा या गावाची पुनर्वसन प्रक्रिया दि. २८ जून रोजी पूर्ण झाली आहे. या गावातील सगळ्या गावकऱ्यांचे मूळ तेह्सीलमधील गोलाभूज गावात करण्यात आले आहे. यामुळे ताडोबामध्ये १२५ हेक्टरपेक्षा जास्त अधिवासाची भर पडली असून गावकऱ्यांना नवीन जीवनाची संधी उपलब्ध झाली आहे.
ज्यांचे मानसिक कल्याण परिस्थिती चांगली असे लोक दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगतात. उत्तम गुणवत्ता वा दर्जा असलेले आयुष्य या लोकांना जगणे अधिक सोपे जाते, शिवाय अशा लोकांच्या सामाजिक समस्यांशी फारसा संबंध नसतो. मानसशास्त्रात असे आढळून आले आहे की, उच्च पातळीवरचे मानसिक आरोग्य जगणार्या लोकांमध्ये गुन्हेगारी किंवा व्यसनाधिनता यांचा धोका फार कमी प्रमाणात आढळतो. सकारात्मक मानसिकतेमुळे अशी लोक उच्च प्रतीची कमाई करतात.
योग हा सर्वांसाठी खुला आहे. इथे कोणत्याही प्रकारची संकीर्णता किंवा भेदभाव अजिबात नाही, जो अगदी अंतःकरणपूर्वक श्रद्धेने अष्टांग योगाचे अनुष्ठान करेल, त्याला सर्व सुखाचा लाभ होईल.
गेल्या दहा वर्षात रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे जवळपास 186 हत्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.अशातच आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांचा शोध घेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये तुटपुंज्या उपाययोजना केल्या जात आहेत. अलीकडील काळात, महाराष्ट्रातही रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.
नागपूर विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी दि. ११ रोजी पाहटे एका प्रौढ वाघाचा मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास एका प्रौढ वाघाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. गोंदिया-बल्लारशाह सेक्शनवरील वाडेगाव-अरुणनगर दरम्यानच्या रूळाजवळ सुमारे चार वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला. ही धडक इतकी भीषण होती की वाघाचे दोन्ही मागचे पाय तुटले होते. अंगावर जखमा झाल्या होत्या आणि चेहरा व कवटी चक्काचूर झाली होती.
विवाह हा तर मानवी जीवनाचा महत्त्वाचा संस्कार. याच संस्काराच्या माध्यमातून वधू-वर आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात करतात. मग अशावेळी अग्निहोत्र का नको? अग्नी म्हणजे प्रगतिशीलता. अग्नी म्हणजे उर्ध्वगमन. अग्नी म्हणजे प्रकाशाचे प्रतीक. म्हणूनच अग्निहोत्राविना हा मौलिक असा विवाह संस्कार कदापि पूर्ण होऊ शकत नाही.
शरद पवारांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या आरोपांवरुन फार्मासिस्ट निखिल भामरेविरोधात सहा ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या अनुषंगाने केंद्रीय मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. मात्र, “या सुनावणीत राज्य सरकारच्यावतीने मानवाधिकार आयोगासमोर देण्यात आलेली उत्तरे, ही केवळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची दिशाभूल करणारी आहेत,” अशी टीका भाजप खासदार आणि मुंबई भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.
या सगळ्याला ‘शिबीर’ असे गोंडस नाव दिले जाते. कित्येक वर्षे चिनी उघूरांचा प्रश्न चीनमध्ये कायम आहे. मात्र, त्याबद्दल कधी मुस्लीम राष्ट्रांनी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी, पाकिस्तान आणि पाकची भाषा बोलणार्यांनी आवाजस उठवला नाही. तेव्हा उघूरांबद्दलची उदासिनता ही मानवाधिकारांच्या नावाखाली जागतिक दुटप्पीपणाचे दर्शन घडविणारीच म्हटली पाहिजे.