अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.
Read More
(Sanjay Patil appointed as Chief Engineer of Mahavitaran Bhandup) महावितरणच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात नवीकरणीय उर्जा विभागात मुख्य अभियंतापदी कार्यरत असलेले श्री.संजय पाटील यांची बदली भांडूप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता पदी करण्यात आली आहे. आज मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी श्री. पाटील यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. ७) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या २८ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले असून वीजदरात दहा टक्के घट होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुर्हूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना ही गोड बातमी दिली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
( Devendra Fadnavis On Mahavitaran ) ऊर्जाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात परिवर्तन करीत आहे. मागील २ वर्षांत केंद्रशासन आणि खासगी क्षेत्रातील उत्कृष्ट संस्था यांकडून महावितरणला २१ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये ‘इंडिया चेंबर कॉमर्स’, ‘स्मार्ट ग्रीन फोर्स’, ‘स्कॉच अवार्ड’ यांसारख्ये उत्कृष्ट पारितोषिकांचा समावेश आहे. शासनाचे सहकार्य लाभले तर भविष्यात महावितरण कंपनी शेअर बाजारात प्रवेश करेल. शेअर बाजारात येणारी महावितरण ही देशातील पहिली वीज आस्थापना ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट महावितरणने ८२ दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
Samajwadi Party उत्तर प्रदेशातील संभलमध्ये २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. तर दुसरीकडे वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण विभाग सातत्याने कारवाई करत आहे. गेल्या एका महिन्यात संभलमध्ये १४०० वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण १६ मशिदींचा समावेश असून आणि दोन मदरशांचा समावेश आहे. वीजचोरांकडून महावितरण विभागाने ११ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : “घरांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती ( Solar Energy ) पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून २६० कोटी, ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे,” असे ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावाचे सरपंच रविंद्र माने यांचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थाकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले.
केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुंबई : महावितरणचे कार्यकारी संचालक ( Executive Director ) (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ( Abhay Yojana ) ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
नागपूर येथील पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, आयआयटीएमएस (IITMS) प्रकल्प तसेच नागपूर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. नागपूर शहरातील ₹१३००कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन यावेळी करण्यात आले.
(MahaVitaran) माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहकसेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. दि. २६ सप्टेंबर रोजी हॉटेल हॉलिडे इन, एरोसिटी, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरवरून आणि अटल सेतूवर भेगा पडल्याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला.
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे मागच्या वर्षापासून दि. ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्यात येतो. महावितरणच्या भांडुप परिमंडलातील विविध विभागीय कार्यालयात लाईनमन दिवस साजरा करण्यासाठी भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे, तिन्ही मंडळातील सर्व विभागीय कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी भांडुप परिमंडळाचा दौरा केला. यावेळी, त्यांनी प्रामुख्याने ठाणे व वाशी मंडळाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत ताकसंडे म्हणाले कि, 'ग्राहकसेवेला प्राधान्य देऊन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. तसेच, ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयक वसुल करणे ही तितकेच गरजेचे आहे. म्हणून थकीत वीजबिल वसुली वर भर द्यावे.
महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण, वाशी व ठाणे मंडलात औद्योगिक ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने एक विशेष "स्वागत सेल"ची स्थापना केली आहे. महावितरणच्या संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या आदेशानुसार मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी सर्व मंडळांना स्वागत सेलची स्थापना करणेबाबत सूचना दिल्या होत्या. सदर स्वागत सेल बाबत औद्योगिक ग्राहकांना माहिती देण्याकरिता पेण मंडळात औद्योगिक ग्राहकांच्या प्रतिनिधीसोबत एक बैठक घेण्यात आली.
महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार दिवसीय क्रीडा स्पर्धेत भांडुप परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध खेळामध्ये यश मिळविले आहे.
हवा, पाणी सहज उपलब्ध होते त्यामुळे त्याचे महत्व जाणवत नाही. विजेचे देखील तसेच आहे, वीज असेल तर त्याची जाणीव नसते मात्र वीज नसली तर त्याचे महत्व लगेच लक्षात येते. वीज ही विकासाची जननी असल्याने तिचे अनन्यसाधारण महत्व आहे आणि वीज उत्पादनाचे राष्ट्रीय कार्य तसेच महाराष्ट्राला प्रकाशमान ठेवण्याचे काम वीज अधिकारी-कर्मचारी करतात ही अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य विद्युत वितरण कंपनीकडून लवकरच रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. महावितरणकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच राज्यातील तरुणांना शासकीय नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अर्जप्रक्रिया जानेवारीत येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. महावितरण अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता काय पात्रता असणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
नववर्षाच्या सुरूवातीलाच महावितरणकडून ग्राहकांना नवी भेट देण्यात आली आहे. ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी असल्यास आता तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीजजोडणी किंवा वीजभार देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे कार्य महावितरणकडून करण्यात येत आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्राकरीता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यातील विविध संस्थांमार्फत राबविण्यात येतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) यांच्या “विद्युत सहाय्यक” या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेमध्ये करण्यात आला आहे.
वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल आणि माहितीचे विश्लेषण करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत मदत केल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय पुरस्कार गुरुवारी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.
ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे.
'महाराष्ट्र वीज नियामक आयोगां'तर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगामार्फत यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याभरतीद्वारे, महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई मधील अध्यक्ष, अपक्ष सदस्य पदाच्या १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणेस सांगितले म्हणून ग्राहकाच्या घरातील महिला तनिशा शिंदे हिने महावितरण भांडूप उपविभाग २ येथील महिला तंत्रज्ञ सुकेशनी सदावर्ते यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याबद्दल सदर महिले विरुद्ध भांडूप पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहित १८६० च्या कलम ३५३, ३३२, ५०४ व ४२७ नुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आ
पंजाबमधील पटियाला येथे नुकतेच संपन्न झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब म्हणजेच ७ कि. मी. केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या तसेच जागतिक वारसा असलेल्या घारापुरी बेट. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर प्रथमच या बेटावर वीज २०१८ साली वीज पोहोचली असून यासाठी २२ केव्ही, सिंगल कोअर सबसी केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून टाकण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.
नवीन वीज जोडणी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री.लोकेश चंद्र यांनी सर्व परिमंडलांना दिले होते.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून विविध पदांकरिता ही संधी उमेदवारास मिळणार आहे. महावितरणमध्ये रिक्त ३६ जागांकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास भंडारा येथे नोकरीस जावे लागणार आहे. दरम्यान, महावितरणमध्ये १० वी/ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारास याकरिता अर्ज करता येणार आहे.
अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीने पारित केलेल्या आदेशामुळे राज्यातील वीज कंपन्यांना आपल्या दरात बदल करावे लागणार असून टाटा पावर या कंपनीच्या वीजग्राहकांना या आदेशामुळे फायदा होणार आहे. अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटी(एपीटीईएल)ने पारित केलेल्या अंतरिम आदेशाने टाटा पावरच्या महाराष्ट्र वीज नियामक आयोागाच्या टॅरिफ शेड्युलला स्थगिती दिली असून याचा फायदा वीजग्राहकांना होणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे वीजग्राहकांना २५ ते ३० टक्के सूट मिळणार असून २०२०च्या आदेशानुसार टाटा पावरला ग्राहकांना वीजदेयके देणार आ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या ऊर्जा खात्याची जबाबदारी हाती घेतल्यानंतर विभागात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. महावितरणतर्फे ग्राहकांच्या समस्या सोडवण्याला गती देण्यात आली असून ऊर्जामंत्री फडणवीसांच्या सुचनेनंतर दहा दिवसांत २ लाख तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत गेल्या वर्षभरात सरकारी वीज कंपन्यांनी भरीव कामगिरी केली असून ऊर्जा क्षेत्रात राज्य पुन्हा प्रगतीपथावर आले आहे, असे प्रतिपादन महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत केले.
वाडा : संततधार पाऊस ,अतिवृष्टी व पुरपरिस्थीत झाडे कोसळल्याने तुटलेल्या तारा, शार्टसर्किट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता जास्त असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीज यंत्रणांपासून सतर्क रहावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र : महापारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे परिमंडळात दि.२१ जुन २०२३ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे क्षेत्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
‘विद्युत अधिनियम, २००३’मध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून नूतनशील ऊर्जा खरेदीच्या बंधनासाठी व त्याच्या पालनासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग दर पाच वर्षासाठी विनियम, जाहीर करत असते. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नूतनशील ऊर्जा खरेदीचे बंधन त्याचे पालन व नूतनशील प्रमाणपत्र चौकटीचे कार्यान्वयन विनियम, २०१०, २०१६ आणि २०१९ असे जाहीर केले आहेत.
मुंबई : ऊर्जा ही सर्व प्रगती साध्य करण्याची मुलभूत गरज आहे. सर्व क्षेत्रांच्या प्रगतीकरिता आवश्यक तेवढी ऊर्जा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याद्दष्टीने महावितरण सध्या चांगले काम करत आहे, असे महावितरणचे नवनिर्वाचित अध्यक्ष लोकेश चंद्र म्हणाले. तसेच, गेली अनेक वर्षे महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी सातत्याने कठोर परिश्रम करत आहेत. ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत वीजपुरवठा देत वीजहानी कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र म्हणाले.
‘महावितरण’ ही सरकारी वीज वितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या रुळावर येत असून, ग्राहकांना सेवा देण्याच्या बाबतीत कंपनीने चांगली कामगिरी बजावली आहे. कंपनीच्या सुधारलेल्या कामगिरीचे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा प्रभाव हे आहे. आज ‘महावितरण’च्या स्थापना दिनानिमित्ताने ‘महावितरण’चे स्वतंत्र संचालक असलेल्या विश्वास पाठक यांचा याविषयी प्रकाश टाकणारा हा लेख...
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहे. याआधी ते मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक पदी कार्यरत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी (दिल्ली) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि एमटेक (स्ट्रक्चर्स) पदवी प्राप्त केली आहे.
मुंबई : राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली असून अधिकाधिक संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
नागपूर : महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी राज्यातील विजेच्या मागणीत उन्हाळ्यात अपेक्षित वाढ लक्षात घेऊन "मिशन औष्णिक ८००० मेगावॅट" चे उद्दिष्ट निश्चित करून दिले. राज्यात यावर्षी सर्वोच्च विजेची मागणी एप्रिल महिन्यात २९ हजार मेगावॅटच्या घरात पोहचली तर सध्या २८००० मेगावाटच्या जवळ आहे आणि येत्या काही दिवसांत ती आणखीन वाढेल असा अंदाज आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने आपल्या सर्व संसाधनांचे पुरेसे नियोजन केले आहे.
पुणे : पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणार्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे.
सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे
सौर रुफटॉप योजने अंतर्गत आलेल्या अर्जांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ग्राहकाला याचा लाभ घेता येईल असे नियोजन प्रत्येक उपविभागीय कार्यालयाने करावेत.
ठाकरे सरकरमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना आता आदित्य ठाकरेंचीही पोलखोल होणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अडीच वर्षांच्या कालावधीतील सर्व कामांचे केंद्र सरकरकडून ऑडिट केले जाणार आहे
राज्यातील वीज जोडणीप्रश्न तडीस फडणवीस - शिंदे सरकार तडीस नेणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे