(Cancer awareness campaign at kalyan and dombivali) राज्य सरकार आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम पार पडली. या मोहिमेला आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्या पुढाकाराने ही मोहीम पार पडली.
Read More
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरांतील रहिवासी सोसायट्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन विद्युत विभागातर्फे बनवण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरांनी क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया यावेळी कडोंमपा आयुक्तांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात आहे
( Unique initiative of Kalyan Fire Department ) आग लागल्यास कसा बचाव करावा, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कल्याण अग्निशमन दलाच्यावतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले.
( Kalyan-Dombivli Municipal Corporation presents budget of Rs 3,361 crore ) कल्याण-डोंबिवली महापालिकेचा सन 2025-26 सालचा 3 हजार, 361 कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प गुरुवार, दि. 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ केली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेल्या पवन कल्याण यांनी तमिळनाडूतील हिंदी विरोधावर टीका करताना, तमिळ राजकीय नेते ढोंगी असल्याचा आरोप केला. त्यांनी विचारले की, "तमिळनाडूतील नेते हिंदीच्या सक्तीला विरोध करतात, पण त्याचवेळी त्यांच्या चित्रपटांचे हिंदीत डबिंग करून व्यावसायिक लाभ घेतात. यामध्ये नेमका कोणता न्याय आहे?"
Hindi आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामिळनाडूवर ढोंगीपणाचा आरोप करण्यात आला आहे. ते म्हटले की, त्यांचे नेते आर्थिक फायद्यासाठी त्यांचे तमिळ चित्रपट आतापर्यंत हिंदी भाषेत डब करत होते. पक्षाच्या स्थापना दिनी बोलताना जनसेवा प्रमुख म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी भारताला तमिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे.
#rss #kalyan #dombivli कल्याण पूर्व येथील संघाच्या बाल शाखेवर धर्मांधांची दगडफेक, धर्मांधांकडून पुन्हा एकदा स्वयंसेवकांना लक्ष्य करण्याचा डाव #rss #kalyan #dombivli #BaalShakha #ratnagiri #sanchalan #swayamsevak #news #mahamtb
शिरढोण व खोणी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध; इच्छुकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
कबड्डीची आवड, मात्र आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक पाठबळ न मिळाल्याने, त्यांची संधी हुकली. पण, तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अशा या शासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय गिरविणार्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याविषयी...
स्वार्थ बाजूला ठेवून दीनदुबळे, गोरगरिबांना मदतीचा हात देणारे अनेक थोर समाजसेवक आपण आतापर्यंत पाहिले. याच समाजसेवेच्या संस्कारांडे बाळकडू आज लोकप्रतिनिधी म्हणून नावारूपाला आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका खुशबू पद्माकर चौधरी यांना लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. समाजकार्यात आघाडीवर असलेल्या चौधरींना माजी मंत्री आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त राजकारणात असूनही, समाजकार्यातून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणार्या खुश
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
( Kalyan Metro ) कल्याणमधील प्रस्तावित ‘मेट्रो’च्या मार्गाबाबत वेगवेगळे मतप्रवाह असताना आताही ‘मेट्रो’ खडकपाडामार्गे नव्हे, तर पूर्वीच्याच लालचौकीमार्गे नेण्याची मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केली आहे.
मुलांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर दररोज १५ मिनिटे वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे. त्यातून नवीन शब्द समजतात, असा सल्ला कडोंमपाच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पावसापाण्यावर चाललेला पिकांवरचा संवाद आपल्याला जुनाच! पण ‘पावसाचा परिणाम उत्पादनावर फारसा होणार नाही,’ हे कधीतरी ऐकू येईल का? तर तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील शेतीविषयक आमूलाग्र बदल वर्तवलेला ‘अन्नटंचाई ते धान्यसंपन्नता’ अशा आशयाचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला; त्याचेच हे आकलन...
मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधत, बारीपाड्याची एक आदर्श आणि स्वावलंबी गाव म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. काही वर्षांपूर्वीच चैत्राम पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारीपाड्याची ही यशोगाथा जवळून अनुभवण
दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला सामंजस्य करार करण्यात आला आहे. कल्याणी समुहाकडून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
भाजपची ताकद सध्या वाढलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि परिस्थितीनुसार नेतृत्वाने घेतलेला निर्णय या सर्वांचा परिपाक म्हणजे भाजपचा महापौर महापालिकेत बसेल, असा विश्वास भाजपचे आजी आणि माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आणि शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केला.
मुंबई आणि महानगरात सुरु असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कायमच नवनवीन विक्रम रचले आहे. अशावेळी कल्याण-तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या कामादरम्यान एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. देशातील सर्व महानगरांमध्ये सुरु असणाऱ्या मेट्रो कामांमध्ये मेट्रो १२ने डिसेंबर या केवळ एका महिन्यात ३७ पाइल कॅप उभारण्याचा अनोखा विक्रम केला आहे. देशभरात आजपर्यंतचा विक्रम हा ३५ पाइल कॅप उभारून करण्यात आला आहे, असा अंदाज हा विक्रम शेअर करत सोशलमिडीया शेअरकर्त्यानी वर्तविला आहे.
मुंबई : कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित
कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी गवळी यांना २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी या दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या दालनात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
कल्याणमधील घटनेतील आरोपी विशाल गवळी याला फाशीच होणार असून आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिली. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी त्यांनी अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
कल्याण : कल्याणमध्ये ( Kalyan Case ) मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी प्रांतवादाचा रंग देऊन परिस्थिती अधिक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, फिर्यादींच्या वकिलांनी या घटनेवर कठोर भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे.
(Kalyan) येथील योगीधाम परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना त्यांच्या शेजारी अखिलेश शुक्ला या अमराठी सरकारी अधिकाऱ्याने गुंड बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात तणावाचे वातावरण होते. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये निषेध व्यक्त केला.
नागपूर : कल्याण ( Kalyan ) येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली.
नोव्हेंबर महिन्यात कल्याणमधील वन्यजीव तस्करीमधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला इंडोनेशियाला पाठवण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता वन विभागाने पूर्ण केली आहे (kalyan orangutan). यासंदर्भातील निर्णय घेण्यासंदर्भात ही कागदपत्रे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवमान बदल मंत्रालयाने नेमलेल्या समितीकडे पाठविण्यात आली आहेत. सध्या हा प्राणी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आहे. (kalyan orangutan)
संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून रोज कामकाज बंद पाडण्याचे काम सुरू आहे. अशातच आता बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी टीएमसीचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिका करत, संसदेच्या मान मर्यादेचा भंग केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदारांनी बॅनर्जी यांच्या विरोधात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याच बरोबर अशा घटनांची पुनरुक्ती होऊ नये म्हणून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकारने ( Mamta Govt. ) ‘मनरेगा’ योजनेचा लाभ अपात्रांना दिल्याचा घणाघात केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.
Kalyan : रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. प्रसंगी प्रवाशांना आपले प्राण ही गमवावे लागत आहे. त्यामुळे दिवा ते सीएसटी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करणार आहे. कल्याण ग्रामीणचा विकास हेच ध्येय असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता ‘इंडी’ आघाडीचे ( INDI Allience ) नेतृत्व करण्यासाठी सक्षम नेत्याची गरज आहे, असे सांगून तृणमूल काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली आहे.
डोंबिवली : ’वाचाल तर वाचाल’ ही उक्ती आजच्या डिजिटल माध्यमांच्या व सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे मागे पडली आहे. नव्या पिढीला आणि जुन्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये ( Kalyan ) शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर ते रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सलग ५० तास अखंड वाचनयज्ञाचे बालक मंदिर कल्याण येथे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात वन विभागाने कल्याणमध्ये वन्यजीव तस्करीमधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला (kalyan orangutan) मूळ देशात पाठवण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिले आहेत. सध्या या प्राण्याची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली असून या प्राण्याला मूळ देशात पाठवण्याची तयारी वन विभाग करत आहे. (kalyan orangutan)
(Rajesh More) डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तेरा उमेदवार असले, तरी विद्यमान आ. राजू पाटील आणि माजी आ. सुभाष भोईर यांच्याशी मोरे यांची थेट लढत असल्याचे मानले जात आहे. आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. समोर तुल्यबळ उमेदवाद असताना राजेश मोरे येत्या विधानसभेच्या
(CM Eknath Shinde) “महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, “या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहाता महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
Rajesh More : डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती तर्फे कल्याण ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे, त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वन विभागाने कल्याणमधील पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती (kalyan exotic animal). या छाप्यामधून काही देशी प्राण्यांसह ओरॅंगोटॅनसारख्या विदेशी प्राणी ताब्यात घेतले होते (kalyan exotic animal). या घटनेतील आरोपी अजूनही फरार असून वन विभागाचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत (kalyan exotic animal). मात्र, यानिमित्ताने कल्याण, ठाणे, मुंब्रा परिसरात चालणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीचे जाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. (kalyan exotic animal
कल्याण पूर्वच्या विकासाचा एकच ध्यास! शहरातील पाणी प्रश्न, महिला सुरक्षिततेसाठी पोलिस चौकी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय करणार!, कल्याण पूर्वच्या महायुती उमेदवार सुलभा गायकवाड ( Sulabha Gaikwad ) यांचे आश्वासन
कल्याण : “कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती ही अभेद्यच असल्याचे आश्वासक असे चित्र आज दिसले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं, लहुजी सेना महायतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या खांद्याला खांदा लावत भाजप नेते नरेंद्र पवार हे निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. महायुती ही अभेद्यच असल्याचे सूतोवाच महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले. तर विश्वनाथ भोईर यांच्या विजयासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू,” असा निर्धार यावेळी नरेंद्र पवार ( Narendra Pawar ) यांनी व्यक्त केले.
‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा पुढे नेणार्या नाशिकच्या युवा कीर्तनकार अश्विनी हिरामण चौधरी यांच्याविषयी...
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केली चर्चा 15 डब्यांच्या गाड्या, महिला विशेष लोकल Kalyan Ladies Special Local सोडण्याची केली मागणी.
शहाड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लवकरच सुरू करणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने ३२०कोटी रुपयांची निविदाही काढली आहे.
क्फ सुधारणा विधेयकाविषयीच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी राडा झाला. जेपीसीचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अश्लील शब्दांचा वापर करून अध्यक्षांच्या दिशेने काचेची बाटली फोडून फेकल्याचे गंभीर कृत्य केले आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.
(Kalyan) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यापासून आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक समाजहिताच्या योजना लागू करत सामाजिक निर्णयांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या लोकोपयोगी कामांनी प्रभावित कल्याणमधील ५० लाडक्या बहिणींनी राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कोकण वसाहत परिसरात झालेल्या लाडकी बहीण सन्मान योजनेच्या कार्यक्रमा
( Kalyan Dombivli Municipal Corporation )कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बेघर व्यक्तींसाठी कल्याण पश्चिमेतील क प्रभागात, आणि डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी तसेच टिटवाळा परिसरात बेघर निवारा केंद्राची व्यवस्था केली आहे.
Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२८ वर्षापर्यंत मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सुमारे ८० कोटी लोकसंख्येस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनासह इतर योजनांतर्गत तांदूळ मिळणार आहे. नरेंद्र मोदींनी बुधवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ही घोषणा केली आहे.
(Kalyan West) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला असून त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजनाला प्रारंभ झाला आहे.