जयंतराव म्हणजे ‘योजक:स्तत्र दुर्लभ:’ या व्याख्येत बसणारे व्यक्तित्व होते. ते शोधक होते. तर्कशुद्ध मांडणी करणारे तत्वज्ञान जगणारे आणि कोणत्याही गोष्टीच्या मूलभूत उत्पत्तीकडे जाणारे ते व्यक्तिमत्व होते. जयंतराव कालिदासाने वर्णन केलेली संत ही संकल्पना जयंतरावांना तंतोतंत लागू पडते. प्रचारकी जीवनाचा ते आदर्श होते. अनुशासन, संघटन कौशल्य, शिस्त याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी काढले.
Read More
पुण्याला बालेवाडीमध्ये तीन दिवसांचे घोष शिबीर होतं. नक्की साल आठवत नाही. त्यावेळेस मी पणव वादक म्हणून भाग घेतला होता. वसई तालुक्यातून घोष शिबिरात गेलो होतो. तिथे जयंतरावांची ओळख झाली. मी जुने प्रचारक अनंतराव देवकुळे, शिवरायजी तेलंग, वसंतराव केळकर, दामू अण्णा दाते यांसारखे प्रचारक अगदी जवळून पाहिले आहेत. जयंतराव अशाच जुन्या प्रचारकांसारखे मला वाटले. त्यांचे साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी एखाद्याचे मन सहज जिंकून घेत असे.
जयंतराव आज गेले, आपल्यातून गेले... हे वाक्यच इतक्या वेदना देणारं आहे. पण, त्यांनी सुमारे दहा महिने जी झुंज दिली, तीही तितकीच क्लेशकारक होती. केवळ त्याला आशेची सावली होती इतकच! अनेक कार्यकर्ते, डॉक्टर्स आणि संघ व्यवस्थापन यांनी शर्थीचे प्रयत्न केले. खरं तर ज्यांना इतका मोठा काळ ’जयंतराव बरे होण्यासाठी प्रयत्न करणे’ हे एकच ध्येय समोर होते. त्यांना आज ही पोकळी खूपच जाणवत असेल. आता केवळ एकमेकांचं सांत्वन करणं इतकच आपल्या हातात...
पहिल्याच भेटीत जयंतराव इतके भावले की, कित्येक वर्षं मी त्यांना भेटत आलोय असं वाटायला लागलं. समोरच्याने कितीही रटाळ, निरुपयोगी, पाल्हाळ लावलं तरी ते शांतपणे, मनापासून ऐकून घ्यायचं; कुणी आगपाखड करत बोलत राहिला तरी त्याला पूर्ण ऐकून घ्यायचं आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याला शांत करायचं, असा त्यांचा स्वभाव होता. ते कुणावर चिडलेले, संतापून काही बोललेले किंवा त्यांच्या बोलण्यातून कधी कटुता आलेली कुणी कधी बघितली नाही.
स्वयंसेवकांचे प्रेरणास्थान, मृदू स्वभाव, कुशल संघटक, विचारक, कोकण प्रांत प्रचारक असताना अथक प्रवास करणारे जयंतराव सहस्रबुद्धे. दि. २ जून रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विज्ञान क्षेत्रात उभे केलेले कार्य सर्वस्वी अद्भुतच. वैज्ञानिकांच्या सहज संवादातून हृदयस्थ संबंधांचे रुपांतर त्यांनी ‘विज्ञान भारती’शी जोडण्यात केले. जयंतरावांचा स्वभाव धीरगंभीर. मोजकेच पण परिणामकारक बोलणारे. असा हा भारतमातेचा नररत्न गमावल्याची खंत आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असेल.
ज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंतराव सहस्रबुद्धे यांचे नुकतेच देहावसान झाले. आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहेच! जयंतराव यांचा सहवास लाभलेले महाराष्ट्रात अनेक संघ स्वयंसेवक तथा ’विज्ञान भारती’चे कार्यकर्ते आहेत, अशा सर्वांची जयंतराव यांच्याशी असलेली आपुलकी, प्रेम व जिव्हाळा नेहमीच संस्मरणीय राहील.