( Case registered against 43 Bangladeshis for registering bogus births and deaths in Jalgaon ) राज्यात बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बोगस जन्म-मृत्यूनोंदणीचे प्रकार गाजत असताना आता जळगाव महानगरपालिका हद्दीत बोगस जन्मनोंदप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथे ४३ बांगलादेशींवर विविध कलमांन्वये शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
Read More
जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी दिले आहेत.
train accident जळगावातील परांडा रेल्वेस्थानकावर रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली होती. या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक रेल्वेने पुष्पक रेल्वेला धडक दिली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याचे वृत्त आहे. ही घटना दि : २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात दोन गटांमध्ये राडा झाल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून पाळधी गावात दोन गटांत वाद निर्माण झाला आणि या वादाचे रुपांतर तोडफोड आणि जाळपोळीत झाले.
(Jalgaon Accident News) गुजरातहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा जळगावजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत एक महिला जागीच ठार तर, पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(Jalgaon) जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार झाल्याची माहिती पुढे आली आहे. अहमद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे. सोमवारी पहाटे ते झोपले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर ३ राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येत आहे.
नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला असून वायूसेनेच्या विमानाने त्यांना शनिवारी नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
३१ ऑगस्टपर्यंत ज्यांचे ज्यांचे अर्ज आले आहेत, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे देणार आहोत आणि या महिन्यात नाही मिळाले तर सप्टेंबरमध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. मंगळवारी जळगाव येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
लाडकी बहिण योजनेच्या निमित्ताने देण्यात येणारे पैसे हे फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी नाही तर वर्षभर दिला जाणारा माहेरचा आहेर आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. जळगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
जळगाव लोकसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून याठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या स्मिता वाघ या जळगावमधून विजयी झाल्या आहेत. त्यांनी जवळपास दोन लाखांनी विजय मिळवत उबाठा गटाला धक्का दिला आहे.
दादरची ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ ही संस्था कारागृहातील बंदिवानांसाठी काम करते. जळगावच्या ‘कोशवस्मृती सेवा संस्था समुहा’ने ‘रामचंद्र प्रतिष्ठान’सह आणखी दोन संस्थाना ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा’ पुरस्काराने सन्मानित केलेे. त्या निमित्ताने ‘रामचंद्र प्रतिष्ठान’च्या आगळ्या वेगळया कार्याचा इथे आढावा घेण्यात आला आहे
निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी महाभकास आघाडीतील उबाठा सेनेतील अस्वस्थता वाढताना दिसते. हिंदू आणि मुस्लीम मतदारांना एकाच वेळी गोंजारण्याचे हे धोरण म्हणजे दोन दगडांवर पाय देण्यासारखे आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याच मतदाराच्या मनात या पक्षाबद्दल विश्वास निर्माण झालेला नाही. वैयक्तिक सत्ताकांक्षेमुळे उबाठा सेना हा पक्ष ना हिंदूंचा राहिला, ना मुस्लिमांना तो आपला वाटतो. या अविश्वासाची मोठी किंमत या पक्षाला निवडणुकीत चुकवावी लागेल.
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
जळगावमधून भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर 'उबाठा' गटात दाखल झालेल्या उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरें उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्याऐवजी करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांतर करूनही उन्मेष यांच्या पदरी निराशाच पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे ९७वे वर्षं. पुढील तीन वर्षांत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ही साहित्य चळवळ शंभरी गाठेल. एके काळी दिग्गजांनी गाजवलेले हे व्यासपीठ आज नेमके कुठे आहे, याचा वेध घेताना संमेलनाविषयी होणारी ओरड आणि त्याची कालसुसंगतता तपासणेही तितकेच क्रमप्राप्त. त्यानिमित्ताने अमळनेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चा विविध आयामातून आढावा घेणारा हा लेख...
जळगावचे यशस्वी उद्योजक केशव लक्ष्मण क्षत्रिय. प्रामाणिक कष्ट आणि समाजशीलता जपत केशव यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...
राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५७ हजार ६८८ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात ४५ हजारापेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. तर धुळे जिल्ह्यात ३१ हजार ४५३ नोंदी सापडल्या आहेत.
योग हा आरोग्य आणि मनःशांतीसाठी उपयुक्तच. तथापि, कर्करोगाशी लढा देणार्या व्यक्तीसाठी योगासने किती लाभकारक असतात, हे सिद्ध करणार्या डॉ. मनीषा सोनवणे यांच्याविषयी...
जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
निसर्गाचे बालपणापासून आकर्षण असलेल्या रवींद्र फालक यांनी या कार्यात रमताना माणसाला जंगल, प्राणीसृष्टी वाचविण्याचा संदेश दिला. त्यांच्या या जीवसृष्टी संवर्धनाच्या कामाचा आढावा घेणारा हा लेख...
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथल्या गोंडगावात ९ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून ठेवला. तीन दिवसांनी मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेने संपूर्ण जळगाव हादरलेलं असताना, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या पिडीत कुटुंबास भेट दिली. गोंडगावात ९ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची निघृण घटना अक्षरशः मनाला चटका लावणारी आहे. असं वाघ यांनी म्हटलं आहे.
कोरोना काळात नोकरी गमावलेल्या असंघटित कर्मचाऱ्यांना मनरेगाने पुन्हा नोकरी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या योजनेतंर्गत आता जळगावात नोकरीची संधी उपलब्ध होणार असून या माध्यमातून जवळपास १०० हून अधिक पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठवर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीचे घर दोन दिवसात पाडण्यात येईल, याबाबत आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना आदेश दिले असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जमावासमोर केली. शासनाचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक बाप म्हणून आपण एवढेच सांगतो, त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. असेही ते म्हणाले. यामुळे आता मध्य प्रदेशातील आणि उत्तर प्रदेशातील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात येणार आहे.
भडगाव तालुक्यात एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काकाच्या घरी टीव्ही पहायला गेलेली ८ वर्षाची चिमुकली तिच्या घरी परतलीच नाही. तीन दिवसानंतर चिमुकलीचा गुरांच्या गोठ्यात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेतील संशयीतास अटक केली आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याची कबूली संशयिताने दिल्याची माहिती समोर आली आहे.
भडगाव तालुक्यात एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काकाच्या घरी टीव्ही पहायला गेलेली ८ वर्षाची चिमुकली तिच्या घरी परतलीच नाही. तीन दिवसानंतर चिमुकलीचा गुरांच्या गोठ्यात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेतील संशयीतास अटक केली आहे. या आरोपीचे नाव स्वप्निल पाटील असे आहे. शेजारीच राहणाऱ्या मुलाने हे कृत्य केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
एकनाथ खसडेंनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे पण काळे झेंडे दाखवून काय मिळणार आहे. खसडेंचं असं झालंय की त्यांना नवीन मालक मिळाला आहे ते सांगतील तसं खडसेंना वागावं लागतं. असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी खडसे यांच्याकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. त्यावर फडणवीसांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
संत-महापुरुषांच्या ५००हून मूर्ती घडविणारे, वाहतूकबेटांना शिल्पांनी सुशोभीत करणारे, वास्तववादी अन् संकल्पना शिल्पकलेला वेगळी उंची देणारे आधुनिक शिल्पकार यतिन पंडित यांचा कलाप्रवास.
बिहारमधुन महाराष्ट्रात तस्करीसाठी आणलेल्या सुमारे ५९ मुलांची रेल्वेपोलिसांनी सुटका केली आहे. जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे. दानापूर- पुणे एक्सप्रेसमध्ये ही मुले आढळुन आली. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची किती आणि तुमची उंची किती ? याचा विचार करा आणि मग त्यांच्यावर टीका करा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती तुफानाला उद्धव ठाकरे घाबरले असून, मोदीजींचे हे तुफान जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील." असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर केला आहे. ठाकरेंनी मोदीजींचा वारंवार एकेरी उल्लेख टाळायला हवा होता. ते पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक चुका करत असून हे प्रकार जर थांबले नाहीत तर कधी ना कधी स्फो
जळगावात उध्दव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. परंतु, यापुर्वीच जळगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. मंत्री गुलाबराव पाटलांसह जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची आज भव्य जाहीर सभा होणार आहे. पाचोरा येथील सावा मैदानात सायंकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार असून या सभेत खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे, शुभांगी पाटील यांच्यासह ठाकरे गट
पालकमंत्री बालक मंत्र्यांसारखे वागत असतील तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे हिंदुत्वाच्या नावाने बेगडी प्रेम दाखवलं जात आहे. नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणता येत नाही. असं ही त्या म्हणाल्या.
निवडून दिलेले गद्दार, पण निवडून देणारे माझ्यासोबत आहेत. असं म्हणत उध्दव ठाकरेंनी शिंदेंसह आमदारांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा सुरु आहे. पाचोऱ्याच्या सभेतील गर्दी पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, "पाकिस्तानला पण माहितीय शिवसेना कोणाची आहे. कोणालाही कळेल शिवसेना कोणाची परंतु मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल."
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जळगाव जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. याच पार्श्वभुमीवर या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंचं स्वागतच आहे. परंतु, संजय राऊतांनी या सभेत चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार. असं थेट आव्हान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात मराठी नाटकांना २५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने घेतला आहे. गेल्या महिन्यांत सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाट्यगृहांच्या अव्वाच्या सव्वा भाडेवाढीवरुन तक्रार केली होती. दामले यांनी मराठी नाट्यसृष्टी टिकवण्यासाठी परवडणारे दर असावे, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी शासनाच्या सांस्कृतिक विभागाला त्यानुसार सूचना केल्या. त्यामुळे नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी नाटकांना
गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे जिवाची काहिली होत असतानाच आता राज्यावर अवकाळीचे संकट भेडसावू लागले आहे. राज्यातील काही भागांत गारपिटीसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे. मराठवाड्यात गेल्या चोवीस अनेक ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. असून, राज्यात विविध भागात १८ मार्चपर्यंत अवकाळी संकट असणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीतच खच्चीकरण सुरू झाले असून त्यातुनच जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसेंच्या विरोधी गटातील संजय पवार यांची निवड झाली. हा पराभव एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागल्याचे म्हटले जात आहे.
जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात शुक्रवार, दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १०.३५ वाजता ३.३ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असून सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
प्रा. राजेंद्र महाजन हे व्यासंगी कलाशिक्षक जसे आहेत, तसे ते सृजनशील दृश्यकलाकार म्हणून अधिक रमणारे व्यक्ती आहेत. प्राचार्य महाजन सरांच्या माध्यमातून आणखी एका स्थायी शिक्षकाची संख्या, महाराष्ट्रातील कलाध्यापकांच्यातून कमी होणार आहे. वैयक्तिक प्रा. राजेंद्र महाजन यांच्या कलाध्यापनातील विविध कंगोरे शोधण्याबरोबरच त्यांच्या कलोपासनेतून साकारलेल्या कलाकृतींबद्दल मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान २०१५-२०१९ या कालावधीत राबविण्यात आले होते व ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. आता नव्याने सुरु होणाऱ्या या अभियानात येत्या ३ वर्षात सुमारे ५ हजार गावे नव्याने समाविष्ट केली जातील.
"नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरी तो चावतोच", असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदेगटातील आमदारांवर टीका केली आहे. बुधवारी (दि. ३ ऑगस्ट) जळगावमधील शिवसैनिक मातोश्रीवर आले असता त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान शिवसेना जळगावचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे 'एक गुलाब गेलं पण दुसरे गुलाबराव आपल्यासोबत आहेत.', असेही ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले.
केळीच्या बागेत आपला परिवार वाढवणारे आणि वेड्या बाभळीच्या जंगलात अधिवास करणारे आमचे वाघ आहेत, जळगाव जिल्ह्यातील बागायतदार वाघांना अद्याप ओळख मिळालेली नाही. म्हणून जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी त्यांना ‘दारिद्य्ररेषेखालील बागायतदार वाघ’ म्हणतात. आता ‘मुक्ताई भवानी वन्यजीव अभयारण्य’ घोषित केल्याने या वाघांना रेशनकार्ड तर मिळाले, आता हे क्षेत्र संकटग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र घोषित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगरला स्वतंत्र गाव म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या भाषणांतूनब्रिटिश राजवटीविरोधातील त्यांचे प्रखर विचार आणि राष्ट्रजागरणातील योगदान यांचा आढावा घेणारा हा लेख...
वाचनातून निर्माण झालेला पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून त्याला शास्त्रीय नोंदीची जोड देणारे हाडाचे पक्षि निरीक्षक अश्विन लिलाचंद पाटील यांच्याविषयी...
"जेम्स लेन या लेखकाने त्याच्या 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात जे लिखाण केलं, त्यासंदर्भात बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरला केलेल्या भाषणात त्याचं कौतुक केलं होतं. जेम्स लेन हा चांगला शिवअभ्यासक आहे. असे बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते.", असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) जळगाव दौर्यावर असताना एका पत्रकार परिषदेत केला. तसेच शिवजयंतीचा मुद्दाही त्यांनी समोर आणत आणखी एक दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे द काश्मीर फाइल्स चित्रपट बघायला आलेल्या एका दाम्पत्याला समाजमाध्यमावर कथित पोस्ट टाकल्याबद्दल शिवसैनिकांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे
जळगाव जिल्ह्यातील पक्षीविविधतेची नोंद करून हतनूर धरण जलाशयातील पक्षीविविधता अबाधित राखण्यासाठी झटणारे पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांच्याविषयी...
जळगाव जिल्ह्यातून विंचूच्या (scorpion) नवीन प्रजातीचा शोध लावण्यात महाराष्ट्रातील तरुण संशोधाकांना यश मिळाले आहे. त्याचे नामकरण 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस' (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आले असून 'कॉमसोबुथस' या जातीमधील महाराष्ट्रात आढळलेली ही पहिलीच प्रजात आहे. या संशोधनामुळे संशोधनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या विंचवासारख्या जीवाचे महत्व अधोरेखित झाले आहे.
वयाच्या ७१ व्या वर्षीदेखील प्रतिभाग्रज रवी पाटील आनंदी जीवन जगत आहेत. तसेच इतरांनाही आनंदी जीवन जगण्यासाठी प्रबोधनार्थ एक आध्यात्मिक संघटन स्थापन करून जागृती अभियान चालवित आहेत. इतरांना आनंदी जीवन जगण्यासाठी अभियान चालविणार्या रवी यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा म्हणून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही मैदानात उतरले आहेत. एसटी कामगारांना आपण आजूबाजूच्या राज्यांपेक्षा अधिकची पगारवाढ दिली असल्याचे सांगत संप मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.