सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वरायमेंटने (सीएसई) केलेल्या सर्व्हेक्षणात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. यंदा एल-निनोमुळे उशिराने मोसमी पाऊस सक्रीय होणे, अतिवृष्टी, पूर, गारपीट, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षभरात देशात २,९२३ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर, अतिवृष्टीमुळे, पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे देशातील १८.४ हेक्टर सुपीक जमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पूर, दुष्काळी स्थिती आणि भूस्खलनामुळे ९२, ५१९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, त
Read More
आर्थिक नियोजन आणि मालमत्तेचे संरक्षण करताना गृहविम्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण, गृहविमा हा देखील तितकाच महत्त्वाचा. गृहविम्यामध्येच गुंतवणूक करणे पारंपरिक जोखीम व्यवस्थापनाशी निगडित असले, तरी कुटुंबाच्या भविष्यालासुरक्षितदेखील करते. अशा या गृहविम्याचे महत्त्व विशद करणारा हा लेख...
राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाने सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दमदार पाऊस झाला असून विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना भरघोस मदत देण्यात आली आहे. दरम्यान, काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरीधारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विध
भारतीयांच्या स्टार्टअप क्षेत्रातील आजवरच्या यशस्वी कामगिरीचा परिणाम ‘जी २०’अंतर्गत स्टार्टअप समूहावर होणे अपरिहार्य ठरते. यातील पहिल्या टप्प्यातच सुमारे ३० देश आणि त्यांचे प्रशासक-प्रतिनिधी यांनीच नव्हे, तर ‘इंटरपोल’सारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थेने भारतीय स्टार्टअप कंपन्यांकडून सहकार्य-समन्वयाच्या भावनेतून विशेषत: नैसर्गिक आपत्ती, अवघड व भीषणप्रसंगी अद्ययावत संवाद-संपर्कासह करावयाच्या उपाययोजना व तोडगा शोधणे यासारखे प्रशिक्षण घेण्याची तर पूर्वतयारी सुरू केली आहे.
पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या वाढावी, त्यांना विनासायास भक्ष्य मिळत राहावे, यासाठी चांदोली अभयारण्यात वाघांचे भक्ष्य चितळ प्रजनन केंद्र सुरु करण्याचा वनविभागाने घेतलेला निर्णय स्तुत्यच! चांदोली अभयारण्यातील झोळंबी परिसरात चितळ प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन नर आणि मादी चितळांच्या जोड्या सागरेश्वर अभयारण्यातून सोडण्यात आल्या. सध्या याठिकाणी ३२ चितळ आहेत. आता ते ३६ झाले आहेत.
मुंबई : "सततचा पाऊस" ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
‘पंतप्रधान पीक विमा योजने’मध्ये पीक निर्देशांक आणि नुकसानभरपाई विमा यांचा संयोग करण्यात आला आहे. पीक उत्पन्ननिर्देशांकात विविध संकटे अंतर्भूत असतात आणि वैयक्तिक शेती नुकसानाचा अंदाज घेताना स्थानिक संकटांचा विचार केला जातो.
नैसर्गिक आपत्तीकाळात मदतीसाठी तरतूद करणे, एखादी योजना तयार करणे आणि मदतकार्यामध्ये प्रासंगिक अधिकार्यांची साहाय्यता करणे, हे सरकारचे दायित्व असते, परंतु, पाकिस्तान सरकार असे करण्यात अपयशी ठरत आहे.
५.५ रिश्टर स्केलच्या भूकंप; गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप
ई-कचऱ्यातून तब्बल ६०० ड्रोन बनवत जगभरात ‘भारताचा युवा वैज्ञानिक’अशी ख्याती कमवणाऱ्या केरळमधील २३ वर्षीय एन. एम. प्रताप याच्याविषयी...
जपानची राजधानी टोकियो येथे सुपर टायफून हगिबिस वादळामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. या वादळामुळे आत्तापर्यंत १४ जण ठार तर १६ जण जखमी झाले आहेत. त
भारतीय राजकारणाच्या ज्वालामुखीतील धगधग आता लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे भलतीच वाढली आहे. मात्र, दुसरीकडे दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशात मात्र खऱ्याखुऱ्या ज्वालामुखीची धगधग भलतीच वाढली आहे. बुधवार, दि. १३ मार्च रोजी सकाळी पेरू देशातील ‘सबान्काया’ या ज्वालामुखीतून स्फोटक राख तब्बल २६ हजार फुटांपर्यंत वाढल्याचे वृत्त तेथील स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थांनी दिले आहे.
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी मराठीत एक म्हण आहे. परंतु आजकाल अनेकवेळा ठेच लागूनही पुढचा काही शहाणे होण्याचे नाव घेत नाही आणि मागच्याची अवस्था मात्र ‘जैसे थे’ अशीच राहते. या म्हणीचा संदर्भ येथे देण्याचे कारण म्हणजे ‘त्सुनामी’.
अमेरिकेसारखा ‘बिग ब्रदरपणा’ मात्र भारताने कधीही कुठल्या राष्ट्रावर लादला नाही की विनाकारण कुठल्याही देशामध्ये ढवळाढवळ केली नाही
नुकतेच केरळमध्ये प्रलयंकारी महापुराने थैमान घातले. संपूर्ण जनजीवन विस्कळीत करणारे आणि जीवित-वित्तहानीची परिसीमा गाठणारे असे जलरौद्र रूप भारताने या निमित्ताने पाहिले.
नैसर्गिक आपत्तींमुळे भारताला दरवर्षी साधारण ८० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागते
मुुंबईला दिलेला अतिवृष्टीचा इशारा टळल्याने मुंबईकरांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला