दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणिगणना ही ‘सॅम्पलिंग सर्वे’ म्हणून जरी योग्य असली तरी अंदाज आणि ‘जनरलायझेशन’ हा याचा मुख्य पाया आहे. पौर्णिमेच्या दिवशी मचाणवर बसून विविध ठिकाणी पाणवठ्यावर येणारे वन्यजीव मोजताना आणि त्यावरून संपूर्ण क्षेत्रातील वन्यजीवांच्या संख्येचा अंदाज बांधताना अनेक चुका होणे सहज शक्य आहे. म्हणून नवनवीन तंत्रज्ञान, ट्रान्सेक्ट लाईन सर्वे आणि ट्रॅप कॅमेराचा अधिकाधिक वापर करून अचूकतेकडे वाटचाल करणारे अंदाज बांधणे अधिक योग्य ठरेल.
Read More