Chandrashekhar Bawankule पुणे जिल्ह्यातील भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराच्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांनंतर भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्या विरोधात पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केली.
Read More
Amit Shah तामिळनाडूमधील द्रमुक सरकारचे कुशासन आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी भाजप आणि अद्रमुक एकत्र आले असून अतिशय भक्कम युती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी चेन्नई येथे केले आहे.
( Bengal government involved in corruption Teachers protest ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ भ्रष्टाचारात सामील असून आम्हाला त्यांनी केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप दिला आहे, अशी जळजळीत टिका नोकरी गमवावी लागलेल्या शिक्षिका सुमन बिस्वास यांनी केली आहे.
एकीकडे शेजारी नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदूराष्ट्र स्थापनेसाठी जनता रस्त्यावर उतरलेली असताना, दुसरीकडे तुर्कीयेमध्येही इस्तंबूलचे महापौर आणि विरोधी पक्षाचे नेते एकरेम इमामोग्लू यांना भ्रष्टाचार आणि कुर्दिश दहशतवाद्यांना मदतीच्या आरोपांवरुन एर्दोगान सरकारने तुरुंगात डामले. त्याविरोधात तुर्कीयेवासीयांनी एर्दोगान सरकारला धारेवर धरले असून, तिथेही आंदोलनाचा भडका उडाला आहे.
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ठाकरे आज अदानींच्या नावे मुंबईकरांची दिशाभूल करतात, हा विरोधाभास जनतेच्या नजरेतूनही सुटणारा नाही!
मनात इच्छा असेल, तर मार्ग सापडतोच; मग ते काम कितीही कठीण का असेना! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक विडा उचलला आहे, महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा! मंत्रालयातील दलालांच्या कंबरड्यावर लाथ घातल्याशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे देवाभाऊंनी सर्वात आधी ‘मंत्रालय सफाई’ची मोहीम हाती घेतली. वर्षानुवर्षे मंत्री कार्यालये अडवून बसलेल्या ‘फिक्सर्स’ना घरचा रस्ता त्यांनी दाखवला. मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय साहाय्यकांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, याकडे त
Arvind Kejriwal आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभेत पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशातच शीशमहालच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली असल्याचे आदेश १३ जानेवारी रोजी देण्यात आली.
मुंबई : चीनमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एका उच्च लष्करी अधिकार्याला बडतर्फ करून, त्याची नुकतीच चौकशी सुरु करण्यात आली आहे. गेल्या जून महिन्यातच चीनने भ्रष्टाचाराच्या आरोपावरुनच काही उच्चपदस्थ लष्करी ( Chinese Army ) अधिकार्यांची हकालपट्टी केली होती.
मुंबई : “काँग्रेस ( Congress ) जिथे जिथे सत्तेत होती, तिथे तिथे तीव्र गतीने भ्रष्टाचार वाढला. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणमध्ये खोटी आश्वासने दिली आणि भ्रष्टाचार करून लोकांना लुटले,” असा घणाघात हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केला आहे. मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
Congress Samose हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारमध्ये समोसे गेले कुठे? याचा शोध सीआयडी घेत आहे. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार यांचा तसा परिचय जुनाच. त्यात हिमाचल प्रदेशमधील काँग्रसेच्या सरकारची तर्हाच निराळी. मुख्यमंत्र्यांसाठी आणलेले समोसे परस्परच कोणीतरी खाल्याने एक नवेच राजकीय नाट्य हिमाचल प्रदेशच्या राजकीय पटलावर रंगलेला बघायला मिळत आहे.
‘केंद्रीय दक्षता आयोगा’च्या निर्देशाप्रमाणे, यावर्षी दि. २८ ऑक्टोबर ते दि. ४ नोव्हेंबर, या कालावधीत देशभरात भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज सक्षम करण्यासाठी सप्ताह घोषित करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या सर्व संबंधितांना एकत्र आणून जनप्रबोधन करणे व भ्रष्टाचारामुळे पीडित असणार्या लोकांपर्यंत पोहचून त्यांना दिलासा देणे, हे या सप्ताहाचे उद्दिष्ट. त्यामुळे शासन कारभारात व सामान्य प्रशासनात नैतिकता व पारदर्शीपणाचे महत्त्व याबद्दल अधिक संवेदनशीलता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व नागरिकांच्या साहाय्याने
महाविकास आघाडीत सामील झालेल्या विश्वासघातकी नेत्यांनी सदैव आयुष्यभर प्रत्येकाची कामे बिघडविणार्या नेत्यांच्या नादी लागून लोकांचा विश्वास गमावला. शिवाय जो काही भ्रष्टाचार, अनाचार आणि अकार्यक्षम राज्य कारभार मविआने त्यांच्या अडीच वर्षांत चालविला, त्याला आता या गाण्यातील मतितार्थ चपखल लागू पडतो.
आर.जी. कार रुगणालयातील माजी प्रचार्य संदीप घोष यांना अटक झाल्यापासून, त्यांच्या मागील आरोपसत्र थांबायचं नाव घेत नाहीये.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर. जी. कार मेडीकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या कार्यालयाकडून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी पुणे लाचलुचपत विभागाकडून करण्यात येत असलेली चौकशी जुनी असून त्यांच्याशी अजित पवारांचा काहीही संबध नाही, असे कार्यालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
व्हिएतनाममधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ट्रुंग माय लॅन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दक्षिण व्हिएतनाममधील न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यासाठी त्यांना २० वर्षं तुरुंगवास आणि मृत्युदंडाची शिक्षा नुकतीच नावण्यात आली. लॅन यांच्यावर असलेल्या आरोपांवर व्हिएतनाममधील न्यायालयात सुनावणी सुरू होती.
भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागांवर विजय प्राप्त करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यक्त केला. भाजपच्या दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनास नवी दिल्लीतील प्रगती मैदानस्थित भारतमंडपम येथे प्रारंभ झाला. यावेळी सकाळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित केले. त्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
मोदी सरकारने युपीए सरकारच्या कथित गैरव्यवहारांची पोलखोल करण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी काळात झालेला भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाने ठरवले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या निर्णयाची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांची प्रतिमा पारदर्शक असली तरी याकाळात मात्र अनेक मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे चर्चेत आली. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा ,चारा घोटाळा अशा घोटाळ्य
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षी योजना मोहल्ला क्लिनिकमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या तपासणीत मोहल्ला क्लिनिकमध्ये केलेल्या हजारो चाचण्या बनावट असल्याचे आढळून आले आहे. या आधारे सरकारकडून मोठी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
गा कोणता राम खरा आणि वाल्मिकी रामायणच का खरे? मी विचारतोय मी. चालू गेमाडे! काय म्हणता, मी कोण? माझ्या बोलण्याला कुत्राही भीक घालणार नाही? हे बघा असं करू नका, माझ्या मिशांकडे तरी बघा. चारचौघात उठून दिसाव्यात, म्हणून त्या मी ठेवल्यात. त्याचा तरी मान राखा. पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून बरोबर मी जातीयतेच्या कळपात शिरतो. जाणता राजा, साहेब साहेब म्हणत त्यांची हांजी हांजी करत हजेरी लावतो.
शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची आणि सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला खरा. पण, या कारवायांचा वापर जिनपिंग यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीही रीतसर करून घेतला. ते लक्षात घेता, भ्रष्टाचाराला केवळ भांडवलवादाची देण समजणार्या साम्यवाद्यांनाही भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात अपयश आले, हेच जळजळीत वास्तव!
भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे, तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्
"देशवासीयांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या नेत्यांचे प्रामाणिकपणाचे 'भाषण' ऐकावे. जनतेकडून जे काही लुटले गेले आहे, त्याचा एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची गॅरंटी आहे." असा आशयाचे ट्विट करत मोदींनी काँग्रेस पक्षासह विरोधकांवर निशाना साधला आहे.
एक कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या अहमदनगर एमआयडीसीतील सहायक अभियंत्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. एसीबीने अटक केलेल्या संशयिताचे नाव अमित किशोर गायकवाड असे आहे. तर धुळे एमआयडीसीतला कार्यकारी अभियंता गणेश वाघ (तत्कालीन नेमणूक अहमदनगर एमआयडीसी) हा फरार आहे.
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या वतीने शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी 'दक्षता जागरूकता सप्ताहाअंतर्गत' 'वॉकेथॉन' आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता मुख्य दक्षता अधिकारी यू. दिनेश शानभाग यांच्या हस्ते या वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
अब्जोपती जॉर्ज सोरोस यांच्या अधिपत्याखालील Corruption Reporting Project (OCCRP) ही शोध पत्रकारितेच्या संस्थेने हिंडनबर्ग २.० ची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. परदेशी फंडचे ' ट्रिपलिंग' केल्याचा ठपका ही एजन्सी करू शकते. परंतु कोणत्या कंपनीचा खुलासा होणार ते कळले नाही.
भारताचे भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे कठोर धोरण आहे. भारत एक पारदर्शक आणि उत्तरदायी परिसंस्था तयार करण्यासाठी तंत्रज्ञान आणि ई प्रशासनाचा लाभ घेत आहे. कल्याणकारी योजना आणि सरकारी प्रकल्पांमधील गळती आणि तफावत भरून काढली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आज (२८ जुलै) दहावा दिवस आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या बिलावरून विधानसभेत गरमागरामीची चर्चा झाली. मुंबई महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार, कोविड काळातील गैरव्यवहाराचा भाजप आमदारांकडून पुनरुल्लेख करण्यात आला. शिवाय यावेळी भाजपा आमदारांनी ठाकरे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली.
काही वर्षांपूर्वीपर्यंत उत्तर प्रदेश हे ‘बिमारू राज्य’ म्हणून ओळखले जात होते. त्याच उत्तर प्रदेशचा पूर्ण कायापालट सहा वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. राज्यातील ५.५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. देशातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ते विकसित होत आहे
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रमुखपदावर कोणीही व्यक्ती असला, तरीदेखील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणारच; अशा इशारा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. ईडीचे विद्यमान प्रमुख संजय कुमार मिश्रा यांच्या कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. त्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी अगोदरच हिंदुत्व खुंटीला टांगले होते. आता पाटण्यात जाऊन त्यांनी ते थेट वेशीवर टांगले आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी भाजपविरोधात पाटण्यात बैठक बोलावली होती. यावेळी उध्दव ठाकरे ही उपस्थित होते. यावरुन, मुख्यमंत्री शिंदेंनी ही निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या १७८ कोटी रुपयांच्या शीशमहलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत लोक पास्टरसोबत फोटो घेताना दिसत आहेत. भाजपने 'सेल्फी विथ करप्शन पॅलेस' अभियान असे नाव दिले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये चंद्रप्रकाश शुक्ला आज जनमान्य व्यक्तिमत्त्व आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रामाणिक समाजासाठी सातत्याने योगदान देणार्या चंद्रप्रकाश शुक्ला यांचे विचार कार्य या लेखात मांडले आहेत.
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात राजधानी इस्लामाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इम्रानला आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
भ्रष्टाचार ही कुठल्याही देशाला, अंतर्गत व्यवस्थांना लागलेली कीड. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर केंद्रीय पातळीवर हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात मोडीत निघाला. राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरही त्यासाठी प्रयत्न सुरु आहेतच. त्यामुळे मोदी सरकारचे भ्रष्टाचारमुक्तीतून राष्ट्रविकासाच्या उद्दिष्टपूर्तीचे हे पॅटर्न समजून घ्यायला हवे.
जरी केंद्र सरकारच्या स्तरावर भ्रष्टाचार संपवला गेला असला तरी, राज्य आणि स्थानिक सरकारी नेते आणि प्रशासकांनी अजूनही गाव, शहर आणि राज्य स्तरावर कारवाई करणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा लोक सर्वच पातळ्यांवर भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार करतील. भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेत वेगवेगळ्या पद्धती राबवत असूनही केवळ केंद्रातील मोदी सरकार सर्वच स्तरावरील भ्रष्टाचार संपवू शकत नाही. त्यासाठी सामान्य जनतेनेही पुढाकार घेणे तितकेच गरजेचे आहे.
नवी दिल्ली : राक्षसांना सामना करताना हनुमंत अतिशय कठोर झाले होते. त्याचप्रमाण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा सामना करण्यासाठी भाजपही कर्तव्यकठोर होतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केले. भाजप स्थापनादिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
China भारताचा शेजारी देश असलेल्या चीनची कोरोनानंतरही आर्थिक स्थिती सुधारलेली नाहीच. त्यामागचे एक कारण म्हणजे चिनी उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींनी या देशातून बाहेर पडण्याचा लावलेला धडाका. कारण, जिनपिंग यांचे सरकार चीनमधील उद्योगपती आणि श्रीमंतांवर सातत्याने आपल्या वर्चस्वाचा फास अधिकाधिक घट्ट करू पाहत आहे. हे सरकारी संकट टाळण्यासाठीच चीनमधील श्रीमंत उद्योजक सिंगापूरकडे धाव घेताना दिसतात. चीनमधील अनेक बड्या उद्योगपतींनी तर अलीकडेच आपली मालमत्ता सिंगापूरच्या बँकांमध्ये हस्तांतरित केली. हा सर्व प्रकार समोर आल
मम्मा, मी अदानींना ते ‘ईस्ट इंडिया’ कंपनीसारखे आहेत असे म्हणालो. आता मीसारखे असेच म्हणत राहणार. मागे नाही का ‘राफेल...राफेल’ म्हणत होतो. नंतर मग सावरकरांविषयी असेच काहीबाही बोलत राहिलो. आता अदानी...अदानी कधीपर्यंत म्हणायचे आहे मम्मा? हो, पण तू तर राजकीय संन्यास घेतलास ना? तुला आता विचारू नको का? मग काय करू प्रियांकाताईला की वाड्रा भावजींना विचारू. नकोच मुळी.
केरळमध्ये ‘लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट’ (एलडीएफ) मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात सत्तेवर आहे. निधर्मीपणाचा आव आणत आणि स्वतःला गरिबांचा कैवारी मानत विजयन सत्तेवर आले खरे. पण, केरळमधील वाढती धर्मांधता, भ्रष्टाचार, ‘इसिस’मध्ये दहशतवादी कृत्ये करण्यास केरळमधून भरती होणारे मुस्लीम युवक, ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हजारो मुली, याबाबत ते चकार शब्द उच्चारत नाहीत. आपल्यानंतर आपला जावई मोहम्मद रियाजच मुख्यमंत्री व्हावा, अशी खेळी करण्यात ते सध्या मग्न आहेत. यासंदर्भात पिनराई आणि केरळचे वास्तव मांडण्याचा या लेखा
मुंबईकरांना सर्वोत्कृष्ट नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या कामकाजात देखील तितकीच उत्कृष्ट शिस्त राखण्यावर कटाक्ष ठेवला आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचारी बडतर्फ / सेवेतून कमी केले / सेवेतून काढून टाकले तर सदरच्या गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले ८१ याप्रमाणे एकूण १३४ कर्मचारी निलंबित करुन महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास कचरत नसल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे.
आज, रविवार, दि. 11 सप्टेंबर. हा दिवस भारतात आणि भारताबाहेरही ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा केला जातो. विश्वबंधुत्व म्हणजे नेमकं काय आणि स्वामी विवेकानंदांची विश्वबंधुत्वाची संकल्पना नेमकी काय होती याचं विवेचन करणारा हा लेख...
"मुंबईमध्ये शिवसेनेचे एकच मिशन सुरु आहे फोडा झोडा मराठी माणसाला गाडा, आणि आपला मॉल चालवा" अशा शब्दांत भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तिखट टीका केली
प्रत्येक राज्यात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी प्रयत्न करणार्या केजरीवालांना त्यांचे गुरू अण्णा हजारे यांनी नुकतेच एक खरमरीत पत्र लिहिले. या पत्राद्वारे अण्णांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या मद्य धोरणावर जोरदार टीका केली आहे
भ्रष्ट अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमताने उभे राहिलेले नोएडातील सेक्टर ९३ मधील ट्वीन टॉवर्स अखेर जमीनदोस्त झाले आहेत
बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्या संगनमताने उभे राहिलेले भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेले ट्वीन टॉवर्स रविवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात आले
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना, त्यात आता थेट पवार कुटुंबाची भर पडली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीवर ईडीचे धाडसत्र सुरु झाले आहे
रे हट त्याने नाही मीच धक्काबुक्की केली असे म्हणत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी महाविकास आघाडीला थेट इशारा दिला. ते फक्त ९९-१०६ आहेत आम्ही १६५ आहोत जर असा सामना जुंपला तर काय परिस्थिती येईल अशा शब्दांत भरत गोगावलेंनी सूचक इशारा दिला आहे
मुंबई: महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्याबाबतची निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.