अहंकार नसावा असे लोक सांगतात; पण आपला मान ठेवून लोकांनी पाया पडावे, असा अहंकार असतोच, यासाठी लोकांनी बोलावे तसेच आपले आचरण ठेवले पाहिजे. बोलणे एक आणि वागणे भलतेच, अशी मानसिकता नसावी. यासाठी परमेश्वरी सत्तेची सतत जाणीव ठेवून, परमेश्वराचे अनुसंधान ठेवावे लागते. त्याने वागण्यात फरक पडतो. भगवंताशिवाय कुणीही सर्वज्ञ नाही, हे एकदा मान्य केल्यावर आपल्या ज्ञानाचा गर्व राहणार नाही आणि आपले आचरण सुधारेल. परमेश्वरी सत्तेची जाणीव सतत राहावी म्हणून ‘भक्तिपंथेचि जावे’ तोच एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
Read More