भारतीय खेळाडूंचे पथक पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींनी शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४ खेळाडूंची खास भेट घेतली आणि त्यांना विजयाचा मंत्र दिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यावेळी भारताचे १२० खेळाडू सहभाग घेत आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताच्या १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने भालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलेल्या सुवर्णपदकासह एकूण सात पदके जिंकली होती. यावेळी भारतीय चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
Read More
नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादित केले व भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि२३ कांस्यपदकांची कमाई केली. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा घेतलेला हा विस्तृत आढावा...
भारतीय नेमबाजांनी व्यक्तिगत स्पर्धेत रौप्य आणि कांस्य जिंकले