उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आणि बच्चेकंपनीला सुटी लागली की, अनेक पालकांना पर्यटन आणि भ्रमंती खुणावते. नोकरदारवर्गासोबतच तरुणाईलाही भटकंतीचे वेध लागतात. त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षांतील पर्यटन व्यवसायातील बदलत्या ट्रेंड्सचे आकलन करणारा हा लेख...
Read More
( The responsibility of constructing the Shiv Smarak in Agra falls to the Tourism Department Devendra Fadanvis ) आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीदिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वित आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत देत राज्याच्या विकासाला आपली पसंती दर्शविली. हे पाहता केंद्र सरकारकडून राज्यभरात विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ आगामी काळात रोवली जाणार आहे. आठवडाभरात कोट्यवधींचे रेल्वे आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना देणारे प्रकल्प केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आले आहे.
अंबरनाथ येथे असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या रेल नीर प्लांटमध्ये लवकरच नवीन पाण्याची लाइन जोडली जात आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल. उन्हाळ्यात मुंबईतील बहुतांश लोकल रेल्वे स्थानकांवर पाण्याची मागणी वाढते आहे. अनेक वेळा ही मागणी आयरसीटीसीकडून पूर्ण होत नाही. प्लांट सध्या दररोज २ लाख एक लिटर रेल नीरच्या बाटल्या तयार करतो, ज्या १४,००० बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन लाईन जोडल्यानंतर ही क्षमता दररोज २०,००० बॉक्सपर्यंत वाढेल.
केरळच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पहिल्या सी प्लेनचे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पार पडले आहे. कोचीच्या बोलगट्टी मरिना येथून सी प्लेनने उड्डाण केले आणि इडुक्की येथील मट्टुपेट्टी धरणावर सहज उतरले. केरळचे पर्यटन सचिव के बिजू, विमान वाहतूक सचिव बिजू प्रभाकर, जिल्हाधिकारी एन एस के उमेश आणि इतर पर्यटन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी १७ आसनी विमानाचे यशस्वी उड्डाणानंतर आगमन होताच स्वागत केले.
'एक्सेल लंडन’ येथील जागतिक पर्यटन बाजारमध्ये भारत सहभागी होणार आहे. दि. ०५ ते ०७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान भरणाऱ्या जागतिक पर्यटन बाजारात केंद्रीय पर्यटन मंत्रालय सहभागी होणार आहे. भारत सहभाग नोंदविताना पर्यटकांमध्ये ब्रिटनमधून येणारे पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत, याकडे विशेष लक्ष वेधले आहे.
(Ajanta Caves) महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटकांना विनाअडथळा अजिंठा लेणीपर्यंत नेण्यासाठी २० इलेक्ट्रिक बसेसचा ताफा सुरू केला आहे, अशी माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने दिली.
देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कोविड महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा अजूनही मागे आहे. जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे ४७.८ लाख परदेशी पर्यटक देशात आले, अशी माहिती पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत सर्वाधिक पर्यटक बांगलादेश आणि अमेरिकेतून आले आहेत.
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मराठीतील प्रसिद्ध प्रवासवर्णनपर पुस्तकांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.
देशांतर्गत पर्यटनवाढीसाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असते. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत परदेशी पर्यटकांच्या आगमनात मोठी वाढ दिसून आली आहे.
राज्याच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह (लोगो) तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते मात्र या पुढे राज्यातील पर्यटन विभागाला एकच महाराष्ट्र टुरिझम हे बोधचिन्ह (लोगो) व महाराष्ट्र अनलिमिटेड ( टॅग लाईन) असे घोषवाक्य असणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी पार पडले. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जगभरात ख्याती असणारी आणि भारतीय संस्कृतीत पौराणिक महत्व असणारी देवभूमी म्हणून ओळख असलेली उत्तराखंड नगरी होय. हे पाहता आयरसीटीसीने उत्तराखंड टुरिझमच्या सहकार्याने उत्तराखंडमधील विविध पर्यटन स्थळांसाठी आध्यात्मिक प्रवासाची मालिका सुरू केली आहे. या मालिकेत अविश्वसनीय शांत मंदिरे आणि नयनरम्य लँडस्केप्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला उत्तम प्रतिसाद आहे. मात्र पावसाळा सुरु होणार असल्याने या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद ठेवण्याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
चंड वाढलेली महागाई, वीजटंचाई आदी मागण्यांसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत. आज जम्मू-काश्मीरकडे पर्यटनाच्या दृष्टीने आपण स्वर्ग म्हणून पाहतो, परंतु पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत असे म्हटल्याचे कधी समोर आले नाही. पाकव्याप्त काश्मीरसुद्धा तितकाच निसर्गसौंदर्याने नटलेला भूभाग.
मुंबई आणि पुणेमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.
'कांदळवन कक्ष' आणि 'कांदळवन प्रतिष्ठाना'कडून रत्नागिरीतील नाचणे आणि पावस गावामध्ये कांदळवन निसर्ग पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे (pawas nachane mangrove) . मंगळवारी या प्रकल्पाचे लोकापर्ण करण्यात आले (pawas nachane mangrove). यामाध्यमातून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना कांदळवन सफारी, पक्षीनिरीक्षण आणि कयाकिंग करता येणार आहे. (pawas nachane mangrove)
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर निसर्गसौंदर्यतेने नटलेले गणपतीपुळे हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. कोकणातील जुनी मंदिरे आणि विशाल समुद्रकिनारे पाहण्यसाठी पर्यटक हमखास गणपतीपुळेला पहिली पसंती देत आहे. गणपतीपुळेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाल्याने पर्यटकांचा ओघ अजूनच वाढू लागला आहे. कोकणातील मंदिर स्थापत्य शैलीचे दर्शन घडवणाऱ्या गणपतीपुळेला आता वाढत्या पर्यटनामुळे नवी ओळख मिळाल्याची माहिती गणपतीपुळे येथील ‘वेस्ट बे रिसॉर्ट एन्ड स्पा’ रिसॉर्टचे संचालक चैतन्य तेंडुलकर यांनी दिली आहे.
प्रवास मनुष्याला समृद्ध बनवतो. या प्रवासाची वर्णनेही अगदी अनादिकालापासून मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली. आपला प्रांत सोडून जाऊ न शकणार्यांना ही प्रवासवर्णने दृष्टी देतात. परंतु, अजूनही हा साहित्यप्रकार मुख्य प्रवाहात म्हणावा तेवढा रुळलेला दिसत नाही. नुकताच ‘मराठी भाषा गौरव दिन’ संपन्न झाला. तेव्हा, प्रवासाचे आणि साहित्याचे नेमके नाते काय, हे उलगडून सांगणार्या पर्यटनाशी संबंधित काही लेखकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया...
केंद्र सरकार लक्षद्वीपच्या विकासासाठी ₹३६०० कोटींहून अधिक खर्च करणार आहे. वास्तविक, केंद्र सरकार आपल्या वेगवेगळ्या बेटांवर विविध प्रकारच्या सुविधा विकसित करणार आहे. यामुळे भारतीय पर्यटकांना परदेशात न जाता आपल्या देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटता येणार आहे. केंद्र सरकार लक्षद्वीपला पर्यटन केंद्रात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे.
‘इंडिया आऊट’ अशी मोहीम राबवत, मालदीवमध्ये सत्तेवर आलेल्या मोहम्मद मोइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीयांची माफी मागावी, असे आवाहन तेथील विरोधी पक्षनेत्यांनी केले. तसेच मोइज्जू यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जात असून, महाभियोग चालविला जाईल. त्यामुळे भारताविरोधी मुजोरी आणि चीनच्या अंधसमर्थनातून सुरु झालेले हे प्रकरण आता थेट मोइज्जूंच्या महाभियोगापर्यंत येऊन ठेपलेले दिसते.
ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई फेस्टिव्हल २०२४ च्या समारोप प्रसंगी सर्वांना दिली. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही पर्यटन मंत्री महाजन यांनी केले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी १४ जानेवारीला अयोध्येत पर्यटनाशी संबंधी मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे. या App मुळे राममंदारात य़ेणाऱ्या भाविकांसाठी आहे. या अॅपला 'होली अयोध्या' असे नाव देण्यात आले आहे.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचा समाविष्ट असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे भारतीयांनी मालदीवला चांगलाच झटका दिला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंनी पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांवर आणि नस्लभेदी टिप्पणी करणाऱ्या लोकांवर सडकून टीका केली आहे. बॉलिवूड कलाकारांनी भारतीय समुद्र किनाऱ्यांचे फोटो शेयर करत, येथे भेट देण्याचा सल्ला दिला आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणऱी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यातील किरकसाल या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गावामध्ये आता निसर्ग पर्यटनाची ( kiraksal ) सुरूवात होत आहे. पुण्या-मुंबईतील पर्यटकांना किरकसालची (kiraksal) जैवविविधता पाहता यावी तसेच स्थानिकांना ही रोजगाराच्या संधी मिळाव्या या दृष्टीकोनातून निसर्ग पर्यटनाची सुरूवात करण्यात आली आहे. (kiraksal)
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे कंबरडे मोडल्यामुळे आता राज्यामध्ये पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. तब्बल १.८८ कोटी पर्यटकांनी काश्मीरला २०२२ मध्ये भेट दिल्याची आकडेवारी समोर आली असून, विशेष म्हणजे हा गेल्या ७५ वर्षांतला सर्वात मोठा विक्रम म्हणावा लागेल. त्यानिमित्ताने केंद्र सरकार, सैन्यदलातर्फे जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन विकासासाठी सुरु असलेले प्रयत्न आणि याबाबतीत उपलब्ध असलेल्या अनेकानेक संधी यांचा आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचालित पर्यटक निवास म्हणून कार्यान्वित झाले आहे. तसेच खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टॉरंटही पूर्णतः महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे.
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल व्यासपीठाने आज एम्बेडेड संरक्षणासाठी इन्शुअरटेक कव्हर जिनियससोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली. कव्हर जिनियसचे पुरस्कार-प्राप्त जागतिक वितरण व्यासपीठ एक्सकव्हरला समाविष्ट करत इझमायट्रिपचे ग्राहक त्यांची तिकिटे बुक करताना कॅन्सल फॉर एनी रिजन (सीएफएआर) ट्रॅव्हल प्रोटेक्शनसह एम्बेडेड सर्वसमावेशक ट्रॅव्हल प्रोटेक्शनचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना एक्सकव्हरच्या एण्ड-टू-एण्ड ग्राहक अनुभवामधून फायदा मिळेल, जे सुरूवातीच्या सेलपासून व
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने त्यांची नवीन ऑफरिंग ईझीदर्शन लाँच केले आहे. हे समर्पित व्यासपीठ भारतभरात सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र पॅकेजेस् प्रदान करत पर्यटकांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहे.
गणितज्ज्ञ, सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपणार्या त्याचबरोबर देश-विदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या डॉ. निता पाटील यांनी संघर्षावर मात करीत यशोशिखर गाठले त्यांच्याविषयी...
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत २१ सप्टेंबर, २०२३ रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी ग्लास स्कायवॉक उभारण्यात यावा आणि मावळ तालुक्यातील कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील रिक्त जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून या अर्जप्रक्रियेस मुदत वाढ देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.
शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर पुढील वर्षी दि. २० जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग या दोन्हींतील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. शासनाकडून यासंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी या नोकरभरतीसाठी अर्ज करावयाचा आहे. यासंदर्भात शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, सरळ सेवा भरतीतून ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. याकरिता अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
स्वातंत्र्य दिन जवळ आला असून यावेळी भारतीय पर्यटकांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठा वीकेण्ड देखील मिळणार आहे. यादरम्यान भारतीय पर्यटकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले असून आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याला त्यांचे प्राधान्य असल्याचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकच्या फ्लाइट सर्च डेटामधून पाहायला मिळाले आहे
यंदा जवळपास दोन आठवडे उशिराने दाखल झालेला वरुणराजा सरासरी गाठत असतानाच, पावसाळी पर्यटनालाही उधाण आले आहे. ‘विकेंड’ला धबधबा आणि तलाव क्षेत्रात तुफान गर्दी जमा होत असून, धोकादायक ठिकाणी पाण्याच्या खोलीचा किंवा प्रवाहाचा अंदाज न येताच अनेकजण पाण्यात उतरण्याचे धाडस करतात. त्यातूनच दरवर्षी एक ना अनेक दुर्घटना घडत आहेत. त्यात वाढ होत जाणे ही अभिमानाची बाब नक्कीच नाही. गेल्या तीन वर्षांत पावसाळी पर्यटनाचे सरासरी ५० पेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत.
रानभाज्या रायगड जिल्ह्यात सर्वत्रच मिळतात असे नाही. रसायनी, पेण, रोहा, कर्जत-पाली या परिसरात जिथे पूर्वापार जंगल व डोंगर आहेत. तिथेच या रानभाज्या अस्तित्व राखून आहेत. रायगडमधील वनवासी बांधवांच्या आयुष्यात रानभाज्यांच्या माध्यमातून आर्थिक आणि त्याद्वारे इतर स्वावलंबनाची पहाट उमलू शकते, त्याचा घेतलेला मागोवा...
पश्चिम किनारपट्टीभागात पावसाचा जोर वाढत असतानाच राज्यातून पर्यटक विविध ठिकाणांना भेट देत असतात. पावसाळी सहली काढण्याचा हा काळ असल्याने पर्यटकांना तिकडे ओढा दिसून येत असतो. दरम्यान, गोव्यातील पर्यटनस्थळे पावसाळी सहली काढण्यासाठी पहिली पसंती ठरतो. त्यातच आता गोव्यातील प्रमुख धबधब्यांवर जाण्यास तेथील प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. गोव्यात काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडताना दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घालण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापूर शहरात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याकारणाने जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार, अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. दरम्यान, येथे प्रथमच सुरू झालेल्या हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचेही पर्यटनमंत्री लोढा यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या वतीने या कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.
भारतात एकूण ४० जागतिक वारसास्थळे आहेत, ज्यापैकी ३२ सांस्कृतिक, सात नैसर्गिक आणि एक मिश्र प्रकारात मोडतात. यातून भारताच्या वारशाचे वैविध्य आणि समृद्धी दिसून येते. केवळ गेल्या नऊ वर्षांतच जागतिक वारसास्थळांच्या यादीत दहा नव्या स्थळांची भर पडली आहे.
'अतिथी देवो भव' या तत्त्वावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २१ जून रोजी G-20 प्रतिनिधींना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भारत भेटीसाठी आणि 'लोकशाहीचा उत्सव' पाहण्यासाठी आमंत्रित केले. गोव्यात दि. २१ जून रोजी झालेल्या G-20 पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्रात मोदींचा रेकॉर्ड केलेला हा संदेश प्रसारित करण्यात आला. आपल्या संदेशात पंतप्रधानांनी 'दहशतवाद देशाला तोडते तर पर्यटन जोडते', असे अधोरेखित केले. पर्यटनाची परिवर्तनीय शक्ती विचारमंथनातून साकार होईल आणि ‘गोवा मॉडेल’ आणि सामूहिक प्रयत्
क्रूझविषयी आपण ऐकून असतोच. तेव्हा, आजच्या या लेखात क्रूझ पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना आणि या पर्यटनाचे विविध प्रकार यांची माहिती करुन घेऊया...
मुंबई : महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय तसेच मुंबईतील गोराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कौशल्य संग्रहालय (वॉर म्युझिअम ) बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय, भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क आणि छत्
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन स्वराज्याच्या इतिहासाला वेगळ्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ६ ठिकाणी शिवसृष्टि आणि संग्रहालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण कामाला एक महिन्यात सुरुवात होणार असून कामासाठी ४१० कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
नाशिक जवळील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या दोन ते तीन आठवड्यांपर्यंत काजव्यांचे दर्शन मोठ्या प्रमाणावर होते. हा काळ काजव्यांचा प्रजनन हंगाम असल्याने याच काळात निसर्गाच्या लखलखत्या, तेजस्वी कीटकांचे समूहाने अद्भुत दर्शन होत असते. लाईटच्या माळा लावाव्या त्याप्रमाणे काजवे लयबद्धरित्या एकाचवेळी चमकून अद्भुत सौंदर्य निर्माण करतात. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, यांच्यातर्फे यंदा दि. ३ व ४ जून रोजी भंडारदरा येथील पांजरे ग
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याबद्दल आपल्या भविष्यातील पिढ्यांना माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून दि. २१ मे ते २८ मेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ‘वीरभूमी परिक्रमा’ याअंतर्गत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रातील पावन झालेली शहरे ‘वीर सावरकर सर्किट’अंतर्गत पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त
पुणे : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताहात मी येसुवहिनी या समिधा पुणे प्रस्तुत एक सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम सेवासदन या शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या अभिवाचनावेळी अवघे सभागृह भारावून गेले होते.