( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्
Read More
Subjects beyond exams for students गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल संस्थेतर्फे दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याण मधील सुभेदार वाडा शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 'परीक्षेपलीकडेल विषय' या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक डॉ उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे वैभव ठाकरे आणि भाग्यश्री ठाकरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे दैनिक 'मुंबई तरूण भारत' आणि वेब पोर्टल 'महा एमटीबी' हे माध्यम प्रायोजक होते.
छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमधील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. इतिहास, विज्ञान, संस्कृती आणि कला यांसारख्या विषयांमध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी च्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
( Take aptitude test of 16 lakh students of class 10th BJP Anil Bornare demand to the Education Minister ) दहावीनंतर करिअरची दिशा ठरविणारी कलचाचणी चार वर्षांपासून बंद असून ही कलचाचणी सुरू करण्याची मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
Kashi University campus पंजाबमधील भटिंडामध्ये गुरू काशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिहार येथून आलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, बिहारमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली होती. हाडे तुटली असून विद्यार्थी रक्तबंबाळ दिसत होती आणि मदतीसाठी ओरडाओरड करत होती.
सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु असून, सर्व विद्यार्थी अभ्यासात गर्क आहेत. आता परीक्षा म्हटले की, चिंता, तणाव हे ओघाने आलेच. पण, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही परीक्षेच्या काळातील तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास, ‘परीक्षेचा काळ सुखाचा’ असे म्हणता येईल. त्यासाठी नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख...
आजपासून इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा! एव्हाना सर्व विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारीही पूर्ण झाली असेल. तेव्हा, एकूणच या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी काय करावे, पालकांची भूमिका काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख...
(Delhi Bomb Threats) दिल्लीतील विविध शाळांना बॉम्बच्या धमक्या असलेले ईमेल पाठवल्याचे प्रकरण सोडवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थी बारावीच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.
(Republic Day) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी २६ जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. तसेच याबाबत सरकारने परिपत्रकही प्रसिद्ध के
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ( Central Govt. ) ‘नो डिटेन्शन’ धोरणात बदल करून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुत्तीर्ण न करणे धोरण रद्द करण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार इयत्ता पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थीवर्गात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील वर्गात पाठविण्यात येणार नाही.
( ITI )काही विद्यार्थी आदिवासी समाजातून इतर धर्मात धर्मांतरण करून देखील आदिवासींसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेत असल्याचे २०२३ सालच्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेदरम्यान निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात सखोल चौकशीचे निर्देश दिले होते.
नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका
काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिनी नायक यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या राधिका खेरा यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Hindu Students Injustice शाळेत नमाजी टोप्या परिधान केलेल्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसायला सांगतात असा दावा विद्यार्थ्याने केला. आयशा नावाच्या शिक्षिकेवर हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप करत सुनावले आहे. शाळेत नमाजी टोप्या घातल्या जातात मात्र कपाळावर टीळा लावलेला चालत नसल्याची व्यथा स्वत: विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याचे नाव मयंक असून त्याने शाळेत सुरू असलेल्या प्रकाराबाबत सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील ही धक्कादायक घटना आहे.
Waynad Landslide Victim वायनाडमध्ये डुकरांच्या मांसविक्रीवर कट्टरपंथी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्तांना वाचवण्यासाठी केरळच्या काही कम्यिनिस्ट विद्यार्थी संघटनांनी डुकराचे मांस विकले. मिळालेल्या निधीतून भूस्खलनग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. मात्र, यामुळे आता केरळातील कट्टरपंथी तसेच काही मौलवी संतापले आहेत. डुकराचे मांस विकल्याने कट्टरपंथींच्या भावना दुखावल्या आहेत. १० ऑगस्ट रोजी कासारगोडच्या राजापुरम भागात डुकराचे मांस विकल्याची घटना घडली असून यामुळे वाद निर्माण झाला आहे.
बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता .
प्रभू रामचंद्र आणि मुघल राजा अकबर यांची तुलना करण्याचा अगोचरपणा दिल्लीतील स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षिका शुभ्रा रंजन यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शुभ्रा रंजन “प्रभू रामचंद्र प्रशासकीयदृष्ट्या अकबरापेक्षा कमजोर होते,” असे विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात.
मुंबई आणि पुणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु आहे. दरम्यान काही विद्यार्थांना पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता, ही अडचण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना सांगितली असता जे परिक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत,
बांगलादेशात आरक्षणविरोधी हिंसाचार भडकल्यानंतर ४,५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. यासोबतच परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, नेपाळमधील ५०० विद्यार्थी, भूतानचे ३८ आणि मालदीवमधील एक विद्यार्थी बांगलादेशातून भारतात पोहोचला आहे. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालय भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर पोलिसांनी मदरशात ९ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. बुधवार, दि. ३ जुलै मदरशाच्या एका हाफिज आणि मौलवीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. हाफिजचे नाव दिलनवाज, तर मौलवीचे नाव रकीमुद्दीन आहे. या दोघांनी शनिवार, दि. २९ जून २०२४ मदरशात मुलावर अनैसर्गिक बलात्कार केला.
बांगलादेशच्या बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिकणाऱ्या उत्सब कुमार ज्ञान या हिंदू विद्यार्थ्याला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून कट्टरपंथी जमावाने बेदम मारहाण केली. उत्साबने सोशल मीडिया ग्रुपवर प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आधी 'अपमानास्पद संदेश' पोस्ट केला आणि नंतर तो डिलीट केल्याचा आरोप आहे.
उत्तराखंडमधील मदरशांमध्ये बिगर-मुस्लिम मुलांना इस्लामिक शिक्षण दिले जात असल्याचे समोर आले आहे. या मुलांची संख्या १९६ असल्याचे सांगण्यात येत आहे. काही मदरशांचे सरकारी शाळांशी संबंध असल्याचेही आढळून आले आहे. तरीही सर्व सरकारी मानकांची पूर्तता करण्यात आलेली नाही. राज्यातील या मदरशांमध्ये भारतातील अनेक राज्यांतील विद्यार्थी दाखल झाल्याचे आढळून आले.
मुझफ्फरनगरमधील एका महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींनी बुरखा घालून नुकताच रॅम्प वॉक केला म्हणून, ‘जमियत-ए-उलेमा’चे मौलाना मुर्करम कासमी म्हणाले की, “त्यांनी मुसलमानांच्या भावना भडकावल्या आहेत. बुरखा हे कोणत्याही फॅशन शोचा हिस्सा असूच शकत नाही.“ चांगल्या घरच्या मुस्लीम मुलींनी पूर्ण पोषाखात रॅम्प वॉकही करायचे नाही, असे म्हणणारे लोक या समाजात आहेत.
ठाणे महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीत शिक्षण घेणार्या सात हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) ही भारतीय उपखंडातील १४० वर्ष जुनी सर्वांत मोठी पर्यावरण संशोधन संस्था आहे.
मणिपूर पोलिसांनी शुक्रवारची सुट्टी बेकायदेशीरपणे घोषित केल्याप्रकरणी एका विद्यार्थी संघटनेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. जॉइंट स्टुडंट्स बॉडी ऑफ मणिपूर नावाच्या विद्यार्थी संघटनेने दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सांगितले होते की आता राज्यात शुक्रवारी सुट्टी असेल.
ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या विवाहितेवर तिच्या पतीसमोरच ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी कॉलेजला सुट्टी संपवून पतीसोबत घरी जात होती. तसेच आरोपींनी पीडितेला मारहाण करून लुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
छत्तीसगडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सद्दाम खान आणि इम्तियाज अली फरार आहेत. दोघेही काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) शी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या निषेधार्थ ABVP कार्यकर्त्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी निदर्शने केली.
फायनान्स व अकाऊंटिंगशी संबंधित कोर्सेसमध्ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थीनींच्या संख्येमध्ये २५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे झेल एज्युकेशन या भारतातील आघाडीच्या फायनान्स व अकाऊंट्स एड-टेक व्यासपीठाने नुकतेच केलेल्या संशोधनामधून निदर्शनास आले. या वाढीचे श्रेय अनेक घटकांना जाते,ज्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वाचे वाढते प्रमाण त्यांना याच क्षेत्रामधील त्यांचे ज्ञान व कौशल्ये अधिक निपुण करण्यासाठी संधींचा फायदा घेण्यास प्रेरित करत आहे. दुसरी
ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडीओ मध्ये एनसीसी युनिट हेड विद्यार्थ्याकडुन कनिष्ठ विद्यार्थ्याना प्लास्टिक रॉडने बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. या चित्रणामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांनी छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण या शाळेतील विद्याथ्र्यासोबत गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला. अभिनव शाळेत यंदाच्या वर्षी तब्बल दोनशे नवीन प्रवेश झाले. त्याबद्दल हेमलता पवार यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा:यांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आहे.
आपल्या अल्प अशा आयुष्यामध्ये विलक्षण काम करताना जयंतरावांनी भारतीय विज्ञान तथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावरील दृष्टिक्षेप यावर मौलिक कार्य केले. भारत सरकारच्या भारतीय स्वातंत्र्याच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जयंतरावांनी हा विषय जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले.
मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.
राज्यातील बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना आता दरमहा आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ ५११ आंतरवासितांना होईल.
'समाजकंटक’ हा शब्द सगळ्यांनाच परिचित. त्यात हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगात नवनवे तंत्र आणि प्रणाली येत असल्याने नवनव्या शब्दांचीही भर पडत आहे. यात ‘माध्यमकंटक’ हा एक नवा शब्द गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. माध्यमकंटकाचे जनक काहीतरी आक्षेपार्ह मजकूर तयार करून किंवा फोटो अथवा व्हिडिओत फेरफार करून विविध प्रकारच्या समाजमाध्यमांत ते ‘व्हायरल’ करत असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील नवा भारत विकासाच्या दिशेने चांगलीच भरारी घेत आहे. सध्याचे केंद्रशासीत प्रदेश असलेले जम्मू-काश्मीरसुध्दा यात उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रस्थानी येऊ लागले आहे. मात्र आजही याठिकाणी रोजगाराशी संबंधित अनेक गोष्टींच्या उपलब्धतेत पुरेशी वाढ न झाल्याने इथली मुले काश्मीरमधून बाहेर पडत आहेत आणि मुंबई सारख्या अनेक शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. १० सप्टेंबर रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, वडाळा येथे गुलशन फाऊंडेशन, मुंबई; फाऊंडे
भारतीय बौध्द महासभेचे मुंबईचे अध्यक्ष अॅड. जयेश सातपुते यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अॅड. सातपुते यांनी अनेक समाज कल्याणकारी कामे केली आहेत.
झारखंडमधील गिरिडीह येथील सरकारी शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला दि. ९ जुलै रोजी वर्गाच्या फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याबद्दल क्रूरपणे मारहाण करण्यात आली. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील पाल्मो गावात ही घटना घडली आहे.
तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील मचन्नपल्ली आणि कोदूर या गावांदरम्यान पावसाळ्यामुळे संपूर्ण मार्ग पावसात पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यामुळे एक खाजगी शाळेची बस एका अंडरपासमध्ये अडकली होती . ही घटना शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी झाली.
‘जेईई’, ‘एनईईटी’ आणि ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांऐवजी मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’ उपलब्ध होणार आहे.
राज्य मंडळांनी दहावीच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांचे लक्ष प्रथम वर्षाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे वळणार आहे.
जम्मू-काश्मीर प्रशासनाने ‘जमात-ए-इस्लामी’शी संलग्न ‘फलाह-ए-आम’ ट्रस्टद्वारे चालवल्या जाणार्या सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन वर्षांच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर यावर्षी दि. १३ जूनला शाळा सुरू होणार असं सकारात्मक, आशावादी चित्र दिसत असतानाच, जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याची बातमी पसरली आणि परत ‘शाळांचं काय?’ असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्याच वेळी शाळा सुरू होतील, असा निर्वाळा शिक्षणमंत्र्यांनी दिलेला असला तरी तारखांमधला घोळ आणि काहीच दिवस आधी बदल होऊन नवीन उपक्रम घेण्यासाठी आलेली बातमी, यातून शिक्षण विभागात असलेला नियोजनाचा अभाव चिंताजनक आहे.
“एमआयएमला शिवसेनेनेच मोठे केले. यांच्या राजकारणासाठी, हिंदू-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठे केले. एमआयएम सतत हिंदूंविरोधात बोलत राहिली पाहिजे, ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. पण, हे करताना यांच्या लक्षात आले नाही की, आपण एक राक्षस वाढवतोय. यांच्या राजकारणात औरंगाबादमध्ये एमआयएमचा खासदार निवडून आला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली,” असा जोरदार घणाघात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केला.
मशिदीच्या बाहेरील बेकायदा लाऊडस्पीकरच्या आवाजाने हैराण झालेल्या जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी आता विरोध केला आहे. त्यानंतर जम्मूतील गांधी मेमोरियल गवर्नमेंट कॉलेजच्या जवळ सहा विद्यार्थ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांनी मशिदीबाहेर एकत्र येत हनुमान चालीसा पठण केले होते.
केवळ शिक्षकी पेशात अडकून न राहता अखंड ज्ञानदानाचा वसा घेत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान घडविणार्या डॉ. गुणवंत प्रेमराज भंगाळे यांच्याविषयी...
“आन आणि मान ठाकूर यांचे स्मारक त्या दोन वीरांना वाहिलेली केवळ श्रद्धांजली नाही, तर हे शौर्यस्थळ येणार्या अनेक पिढ्यांना स्थानिक आगरी, कोळी बांधवांचे वैचारिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत काय योगदान आहे, हे दाखवून देणारे प्रतीक असेल. पुढच्या पिढीला या स्मृतिस्थळापासून प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांना नेपोलियन माहिती आहे, पण कान्होजी आंग्रे, आन ठाकूर किंवा मान ठाकूर हे आपल्या मातीतील वीर माहीत नसतात,” अशी खंत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इतिहास मांडणाऱ्या 'ध्येय-यात्रा' या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन
शिक्षण हे राज्य अन् केंद्र अशा दोन्ही सरकारच्या अखत्यारित येत असल्याने गोंधळ अधिकच वाढलाय, आपल्याकडे. एका बोर्डाचा दुसर्या बोर्डाशी मेळ नाही. प्रत्येक राज्याचे नियम, अभ्यासक्रम वेगळे असा एकूण सावळा गोंधळ.नव्या शैक्षणिक धोरणात निदान कागदोपत्री तरी अनेक चांगल्या गोष्टी आहेत. शिकवण्याऐवजी शिकण्यावर भर, सातत्याने यथोचित मूल्यमापन, विषयनिवडीचे स्वातंत्र्य, हवे ते हवे तसे, हवे तिथे शिकण्याची सोय असे सगळे उत्तम आहे
आता सद्य:परिस्थितीपुरताच विचार करायचा, तर युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? त्यांना कुठे कसे प्रवेश द्यायचे? वैद्यकीय महाविद्यालयांच्या ज्या भरमसाठ शुल्काला घाबरून ही मुले बाहेर गेलीत, त्यांना कोणत्या सूत्राने किती शुल्क आकारायचे?
रशिया आणि युक्रेनच्या यांच्यात गेल्या सात दिवसांपासून युद्ध सुरु आहे. युक्रेनमधल्या कीव शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचं काम मोदी सरकारकडून युद्ध पातळीवर केले जात आहे. काँग्रेसकडून मात्र परराष्ट्र मंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने केल्याचे दिसून येत आहे. "प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी बेशरम काँग्रेस.", अशी जोरदार टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर केली आहे.