"आदित्य ठाकरे यांनी आता नवीन मतदारसंघाचा शोध सुरु केला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर जसे वायनाडच्या शोधात निघाले होते, तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील आपला वायनाड शोधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आता वरळीतून लढणार नाहीत," असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाने बाजी मारली. पण उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मात्र आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली. दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विजय मिळवला
Read More
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मागील दोन दिवस येथील नागरिकांशी भेटून संवाद साधत आहेत. जनतेच्या सेवेसाठी काय करायला हवे याबाबत नागरिकांची मते जाणून घेणे आणि त्यांच्या काही समस्या असल्यास त्यासाठी उपाययोजना करणे हा उद्देश मंत्री लोढा आपल्या भेटीतून साध्य करत आहेत. तसेच ते या लोकसभा क्षेत्रातील सर्व स्तरातील नागरिकांना महायुतीच्या उमेदवारास मतदान करण्यास प्रोत्साहित करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोसायटी बैठक मोहीम हाती घेतली आहे. मंत्री लोढा हे स्वतः या माध्यमातून दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रातील विविध सोसायटीमधील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका