ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते. भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईतील रोड शोने भारताच्या आर्थिक केंद्रातून गुंतवणूकदारांचे प्रचंड लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के. संगमा आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, पूर्वोत्तर राज्यांतील सरकारी अधिकारी उपस्थित होते.
Read More
आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केला आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
समाजातील प्रश्नावर आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे असे सेबीने म्हटले आहे. विशेषतः कंपन्यांनी सामाजिक क्षेत्रातील घटकांना गुंतवणूक करूनआर्थिक मदत केल्यास त्यांना कराचा लाभ मिळावा असे सुचवले आहे.सोशल स्टॉक एक्सचेंज (Social Stock Exchange) नोंदणीकृत असलेल्या मध्ये विना नफा सेवाभावी संस्थांच्या (Non Profit Organisation) कंपन्यांनी झिरो कुपन झिरो बाँड मध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना करात सवलत मिळावी असा सल्ला सेबीने दिला आहे.
भारताच्या विदेशी मुद्रेत (Foreign Exchange Reserves) मध्ये ६५१.५ अब्ज डॉलर्सने आतापर्यंत सर्वाधिक वाढ झाल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलताना सांगितले आहे. मे २०२४ पर्यंत ६४६.६७३ अब्ज डॉलर्सचा अंतिम अहवाला नंतर आता एकूण विदेशी मुद्रेची संख्या ४.८३ अब्ज डॉलर्सने वाढलेली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलता ना, 'हा नवा उच्चांक' असल्याचे स्पष्ट करत ३१ मे पर्यंत ६५१.५ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक वाढ झाल्याचे त्यांनी आज सकाळी प तधोरण जाहीर करताना सांगितले आहे.
म्युच्युअल फंड गुंतवणूकीत आकर्षक वाढ होत आहे. त्यामानाने इंट्राडेपेक्षा कमी रिस्की व बँकेच्या व्याजापेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणूकीत जास्त पैसा जास्त मिळतो. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,स्मॉलकॅप फंडात गुंतवणूक करण्यासाठी 'हे ' बेस्ट म्युच्युअल फंडाने जास्त परतावा दिला आहे. विशेषत: स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करताना काळजीने गुंतवणूक करणे आवश्यक असते. पुढील फंड गुंतवणूकदारांना निरीक्षणासाठी महत्वाचे ठरणार आहेत.
‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ (ईटीएफ) हा म्युच्युअल फंडासारखाच गुंतवणुकीचा एक प्रकार. ‘सेबी’ अर्थात ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या १९९६ च्या कायद्याअंतर्गत म्युच्युअल फंडाची एक योजना म्हणून ‘ईटीएफ’ ओळखला जातो. म्युच्युअल फंड रेग्युलेशनच्या नियमन २(१) जेबीनुसार, ‘ईटीएफ’ अशी एक म्युच्युअल फंड योजना आहे, जी शेअर बाजारात व्यवहार होणार्या रोख्यांच्या निर्देशांकांच्या प्रमाणात संबंधित रोख्यांमध्येच गुंतवणूक करते. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
गेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूकीत फायदा झालेला असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.देशातील परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीची संख्या आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
' बिझनेस स्टँडर्ड ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप पश्चिम आशियातून २.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात आणून आपल्या ग्रीन हायड्रोजन, एअरपोर्ट या प्रकल्पासाठी आणू शकते. परदेशी सोव्हरिन फंडिंगची तरतूद करून अदानी समुहाकडून आगामी प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी हा निधी वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही गुंतवणूक २०२४ चा मध्यावर भारतीय बाजारात महत्वाची ठरणार असल्याचे आकलन तज्ज्ञांच्या मते केले गेले. याबाबत नक्की कधी गुंतवणूक येईल याबाबत प्राथमिक माहिती निश्चित झाली नाही. मार्च २४ च्या त
उच्च व मध्यमवर्गातील गुंतवणूकदारांचा ओढा पेन्शन अर्थात निवृत्तीवेतन योजनांकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विमा पेन्शन योजना दीर्घकाळ भांडवलवृद्धी व हमी परतावा देत आहेत. जे इतर कोणतीही गुंतवणूक साधने देत नाहीत. कोणत्याही वृद्ध व्यक्तीसाठी, निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी हमी परतावा हा मानसिक आधार आहेच, त्याचबरोबर काही गुंतवणूक योजनाही उपलब्ध आहेत, त्याविषयीचा लेखाजोखा...
युको बँकेच्या एका चुकीमुळे तात्काळ पेमेंट सेवेच्या माध्यमातून काही बँक खात्यांमध्ये ८२० कोटी रुपये जमा झाले. बँकेला आपली चूक लक्षात येताच त्यांनी पैसे वसूलीची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत बँकेने ६४९ कोटी रुपये वसूल केले आहेत. ही रक्कम एकूण रक्कमेच्या ७९ टक्के आहे. अद्याप २१ टक्के रक्कम वसूल होणे बाकी आहे.
जोखीममुक्त गुंतवणुकीला प्राधान्य देणार्या भारतीय गुंतवणूकदारांचा कल सध्या म्युच्युअल फंडांकडे वाढलेला दिसून येतो. त्यानिमित्ताने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतील संधी आणि जोखीम याविषयी मार्गदर्शन करणारी अजय अर्गल, उपाध्यक्ष आणि वरिष्ठ पोर्टफोलिओ व्यवस्थापक, इमर्जिंग मार्केट्स इक्विटी - इंडिया, फ्रँकलिन टेम्पलटन यांची ही विशेष मुलाखत...
आर्थिक साक्षरता वाढीबरोबरच भारतीय आता निवृत्ती नंतरचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुखकर जाण्यासाठी आर्थिक नियोजन करु लागले आहेत. अशी माहिती पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड रिटायरमेंट रेडिनेस सर्व्हे २०२३ मधून समोर आली आहे. या सर्व्हेनुसार निवृत्ती नियोजन करण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. २०२३ मध्ये ६७ टक्के भारतीय सेवानिवृत्ती नियोजनासाठी मानसिकरित्या तयार असल्याची आकडेवारी या सर्व्हेतून समोर आली आहे. २०२० मध्ये फक्त ४९ टक्के भारतीय सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करण्याविषयी विचार करत होते.
ओटीटीवरील जगातील पहिला एंजल गुंतवणूक शो ' इंडियन एंजल्स 'चा बहुप्रतिक्षित प्रीमियर उद्या ३ नोव्हेंबर रोजी जिओसिनेमावर प्रसारित होणार आहे. उद्यापासून सुरू होत असलेला शो दर आठवड्याला दोन एपिसोड्स प्रसारित करेल, ज्यामधून प्रेक्षकांना सहभागी असलेल्या स्टार्टअप्सशी संलग्न होण्याची संधी देण्यात येईल.
क्वान्टम एएमसीने (Quantum AMC) क्वान्टम स्मॉल-कॅप फंडासह नवीन फंड ऑफर (NFO) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हे सोमवार 16 ऑक्टोबर 2023 रोजी सदस्यत्वासाठी उघडेल आणि शुक्रवार 27 ऑक्टोबर, 2023 रोजी बंद होईल. ही एक ओपेन-एंडेड इक्विटी योजना आहे जी प्रामुख्याने स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते. याचे सह-व्यवस्थापन चिराग मेहता – मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि अभिलाषा सटाले करतील.
इन्शुरन्सदेखो या भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक कंपनीने सध्या चाललेल्या सीरिज बी निधीउभारणी फेरीतून ६ कोटी (६० दशलक्ष) डॉलर्स एवढा निधी उभा केला आहे. भारतावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बीम्स फिनटेक फंडने या फेरीचे नेतृत्व केले. तर जपानमधील दिग्गज कंपनी मित्सुबिशी यूएफजे फायनान्शिअल ग्रुप इंक (‘एमयूएफजी’) आणि विमा कंपनी बीएनपी परिबास कार्डिफ या कंपन्या त्यांच्या युरोपातील गुंतवणूक कंपनी युराझिओद्वारे व्यवस्थापित इन्शुअरटेक फंडामार्फत तसेच योगेश महान्सारिया फॅमिली ऑफिसमार्फत नवीन गुंतवणूकदार म्हणून कंपनीमध्ये दाखल
फ्रेयर एनर्जी, भारतातील आघाडीची तंत्रज्ञानक्षम छतांवर बसविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा सुविधा (रूफटॉप सोलर) कंपनीने रू. 58 कोटींची इक्विटी गुंतवणूक सुरक्षित केली आहे.भारतातील किरकोळ ग्राहकांसाठी (घरमालक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) सौरऊर्जेशी निगडीत संक्रमणाला गती देणाऱ्या शाश्वत बदलांत फ्रेयर एनर्जी आघाडीवर आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये स्थिरता ठेवून दरात कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे जागतिक स्तरावरील अर्थकारणावर देशभरात या निर्णयाचे स्वागत पहायला मिळाले. आर्थिक स्तरावरील अपेक्षा, रुपयांचे अवमूल्यन, चढे महागाई दर यामुळे बँक व आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. यावरून नक्कीच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना म्युच्यअल फंड गुंतवणुकीचे काय करावे हा प्रश्न मनात आला असेल.
ऑटो स्क्रॅप सेंटर उभारण्यासाठी गुंतवणूक आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना केले आहे. स्वयंचलित पद्धतीने चालणारी टेस्टिंग सेंटर व वाहन स्क्रॅप सुविधेसाठी ही गुंतवणूक आवश्यक असून यात वाहन स्क्रॅप करण्यात येणाऱ्या वाहनमालकाला किंमतीत सूट द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने ते ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस (Glenmark Life Sciences) मधील 75 टक्के भागभांडवल निरमा (Nirma) ला विकणार आहेत.हा करार 5,651 कोटी रुपयांना झाला असून याद्वारे 615 रुपयांना शेअर्सची विक्री केली जाईल.ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (GPL) ने त्यांच्या उपकंपनी ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमधील 75 टक्के स्टेक निरमा लिमिटेडला 615 रुपये प्रति शेअर या दराने विकण्यास सहमती दर्शवली आहे,ज्याचे इक्विटी मूल्यांकन 7,535.4 कोटी रुपये आहे. ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह 6
गणरायांचे आगमन झाले आहे!तब्बल 10 दिवसांचा हा सण आनंद, उत्सव आणि सर्वांना एकत्र येण्याचे एक शुभपर्व आहे. लोकांच्या घरात, सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात आणि अतिशय धुमधडाक्यात साजरा होतो.‘गणपती बाप्पा मोरया!’चा गजर आणि ‘मोदका ’चा गोड प्रसाद या उत्सवाचा आणि मंगलमय वातावरणाचा आणखी उत्साह वाढवतो.हिंदू परंपरेत गणरायांना विशेष स्थान आहे.त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणजेच भक्तांवरील संकट अथवा अडथळे दूर करणारे बाप्पा म्हणून ओळखले जातात.
सध्या ऑडिओ प्लॅटफॉर्म व पॉडकास्ट इंडस्ट्रीची चर्चा सर्वत्र चालू असताना त्यातील आघाडीचे नाव 'कुकु एफएम ' ने २५ मिलियन डॉलरची गुंतवणूक नुकतीच प्राप्त केली आहे.कुकु एफ एम मध्ये सिरीज सी फंडिग राऊंड अंतर्गत The Fundamentrum Partnership, International Finance Corporation ( IFC) व Vertex Ventures यांच्या संयुक्त विद्यमानाने ही गुंतवणूक केली गेली आहे.कंटेट इकोसिस्टीम सक्षम करण्यासाठी हा निर्णय कंपनीच्या वतीने घेण्यात आला आहे.वाढती स्पर्धा, वाढलेला खर्च आणि त्यासाठी आवश्यक गुंतवणूक यासाठी हे कॅपिटल इनफ्यूजन करण्
साक्षी मेडटेक अँड पॅनल्स लि.ने प्राथमिक समभाग विक्री योजना अर्थात आयपीओ सोमवारी,२५ सप्टेंबर रोजी दाखल करण्याची घोषणा केली आहे.हा आयपीओ २७ सप्टेंबर रोजी बंद होईल. कंपनीच्या शेअरची नोंदणी NSE,BSE प्लॅटफॉर्मवर केली जाणार आहे.या इश्यूसाठी हेम सिक्युरिटीज लि. ची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.ची रजिस्ट्रार म्हणून निवड करण्यात आली आहे.
चंद्रयानच्या ३ पार्श्वभूमीवर इस्त्रो ( Indian Space Research Organisation) ने आदित्य एल १ चे उड्डाण यशस्वीपणे केले आहे. यावेळी आदित्य मिशन सूर्यावर प्रयाण करणार आहे. ISRO च्या माहितीनुसार सूर्यावर पोहोचण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अमेझॉन भारतात निसर्गावर आधारित प्रकल्पांमध्ये ३० लाख डॉलरची गुंतवणूक करणार आहे.आशिया पॅसिफिक (एपीएसी) मधील निसर्ग-आधारित प्रकल्पांसाठी कंपनीने दिलेल्या 15 दशलक्ष डॉलर्सच्या निधीचा हा भाग असेल.
चांगल्या अपेक्षेने कर्ज काढले तरी त्याचा हप्ता उतारवयात फेडणे हे कठीण जाते. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी उतारवयात कर्जाच्या भानगडीत न पडलेले उत्तम. अर्थात, विशिष्ट वयानंतर बँका कर्ज देत नसल्या तरी अलीकडे आलेल्या खासगी आर्थिक संस्थांची लाट पाहता ज्येष्ठ नागरिकांनी यापासून सावध राहायला हवे.
एकीकडे उत्तर प्रदेशची वाटचाल ‘बिमारू राज्य’ आणि ‘गुन्ह्यांचे आगार’ यावरून वेगवान आर्थिक विकास व चोख कायदा व सुव्यवस्था असलेले राज्य अशी होत आहे. त्याचवेळी बिहारमधील जंगलराज संपवून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचा दावा करणारे आणि स्वत:ला ‘सुशासनबाबू’ म्हणवून घेणार्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारची वाटचाल पुन्हा एकदा जंगलराजकडे होताना दिसते.
“अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर गेल्याचे अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. आमचे सरकार सत्तेवर येण्याआधी गुजरात आणि कर्नाटक ही दोन राज्य आपल्या पुढे होती. पण, नव्या गुंतवणुकीमुळे आपण पुन्हा पहिल्या स्थानावर आलो. या अधिवेशनात उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे धाडस आमच्या उद्योगमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक आणणारे सरकार म्हणजे महायुती सरकार आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कधीही घराबाहेर पडले नाहीत. ‘कोविड’चे निमित्त करुन त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार घरातच होते. मविआच्या कारकिर्दीत राज्याच्या विकसासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प स्थगित करण्यात आले. त्यामुळे ते ‘स्थगिती सरकार’ असल्याची नोंद झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे ‘डबल इंजिन सरकार’ गतिमान आणि विकासाभिमुख कार्य करणारे सरकार म्हणून लोकाभिमुख झाले आहे. या सरकारची वर्षपूर्ती दि. ३० जूनला होत आहे.
‘बॅरॉन’च्या अमेरिकन फायनान्समधील १०० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पाच महिला अधिकार्यांची नावे झळकली आहेत. ‘बॅरॉन’च्या चौथ्या वार्षिक यादीमध्ये ‘जेपी मॉर्गन’च्या अनु अय्यंगार, ‘एरियल इन्व्हेस्टमेंट्स’च्या रुपल जे भन्साळी, ‘गोल्डमन सॅक्स ग्रुप’च्या मीना लकडावाला-फ्लिन, ‘फ्रँकलिन टेंपलटन’च्या सोनल देसाई आणि ‘बोफा सिक्युरिटीज’च्या सविता सुब्रमण्यन यांचा समावे
सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, यूएस व युरोपियन बाजारपेठेतील मंदीचे वातावरण व जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढत्या व्याजदरातील अस्थिरता, यूएस आर्थिक स्थितीत घट असे घटक सोन्याची किंमतीत वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.माल्या यांनी पुढे सांगितले की, डॉलरची वाटचाल वस्तूंची दिशा ठरवण्यामध्ये लक्षणीय भूमिका ब
एकाच बँकेत सर्व ठेव ठेवण्याची चूक करू नये. अनेक बँकांत ठेवी असतील आणि त्यापैकी समजा एखाद्या बँकेच्या व्यवहारांवर नियंत्रणे आली, तरी इतर बँकांतील पैसा तुम्ही गरजेसाठी वापरू शकता. सार्वजनिक उद्योगातील बँकांतच ठेवी ठेवण्यास प्राधान्य द्या. दुसरे प्राधान्य न्यू जनरेशन बँकांना द्यावे.
'डॉरमन्ट' म्हणजेच वापरात नसलेली बँक खाती. तेव्हा, अशाप्रकारे आपले खाते डॉरमन्ट होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी? ते 'डॉरमन्ट' झाल्यास बँकेकडून आपल्या खात्यातील रक्कम कशाप्रकारे परत मिळविता येते, यासंबंधी मार्गदर्शन करणारा आजचा लेख...