पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून होत असलेल्या फसवणूकीप्रकरणी मुख्यमंत्र्याशी चर्चा करून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करू, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, ८ एप्रिल रोजी दिली.
Read More
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्या सर्वाना नियमाप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
( Farmers become fuel providers in the future Union Minister Nitin Gadkari ) आपल्या देशात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जैविक इंधन तयार करण्याचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. जैविक इंधनाचे 400 प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यातील 60 प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता, हवाई इंधन दाताच नव्हे, तर बिटुमेन दाताही होणार आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण ऊर्जा आयात करणारे नाही, तर निर्यात करणारा
Farmers राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट २ हजार ५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ हजार ८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
( maximum compensation to farmers in national highway land acquisition Minister Chandrashekhar Bawankule ) शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा विचार असून भूसंपादनाबाबत याबैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
AAP government पंजाबमधील शेतकरी प्रतिनिधींच्या गेल्या आठवड्यात छावण्या पाडण्यात आल्या असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता पोलिस आणि पंजाब आप सरकारवर सामानाची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रमुख निदर्शके जगजीत सिंग दलेवाल यांचे उपोषण रविवारी ११८ व्या दिवशीही सुरू होते. ट्रॅक्टर, ट्रेलर, अगदी रेफ्रिजरेटर, एसी, इन्व्हर्टर, पलंग आणि गॅस सिलिंडर - पोलिसांच्या निगराणीखाली असलेले सर्व काही आता आप आमदारांच्या समर्थकांच्या घरात सापडले असल्याचा आरोप बीकेयूचे सचिव असलेले सचिव गुरदीप सिंग चहल यांनी केला आहे.
Chandrashekhar Bawankule राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या जमिनींच्या मालकी हक्कावरून मोठा गोंधळ आहे. याबाबत एक समिती नेमण्यात आली असून त्यानंतर देवस्थान इनाम जमिनींबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधान परिषदेत दिली.
Chandrashekhar Bawankule शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा केल्यास, हस्तांतरणास निर्बंध या अटीवर ही जमीन त्यांना परत करण्यात येईल. याचा लाभ राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'कडून कोकणात राबविण्यात येणाऱ्या कालवे पालन प्रकल्पासाठी 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'ने (सीएमएफआरआय) गुणवत्ता पूर्ण कालवे बीजांचा पुरवठा केला आहे (Maharashtra tribal farmers). कालव पालन प्रकल्पातील उत्पादन क्षमता वाढवून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळावा म्हणून केरळमधील 'सीएमएफआर'च्या कालवे बीच निर्माण केंद्रामधून १ लाख बीजांचा पुरवठा करण्यात आला आहे (Maharashtra tribal farmers). हे बीज लवकरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील कालवे पालन प्रकल्पामध्ये
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण, गेल्या काही दशकांत शेतकर्यांना फक्त आश्वासनांची भुलथापच मिळाली. कधी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्यांना फसवले गेले, तर कधी दलालांच्या जाळ्यात अडकवून शेतकर्यांना कर्जबाजारी केले गेले. मोदी सरकारने मात्र हे चित्र बदलण्याचा निर्धार केला असून, ‘ई-नाम’ या कृषी डिजिटल मंडईची निर्मिती एप्रिल २०१६ साली झाली. आता या मंडईच्या विस्तारासह दहा नवीन कृषी वस्तूंचा समावेश करून सरकारने शेतकर्यांना भेट दिली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ( Central Government ) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन पीकविमा योजनेचा विस्तार केला आहे. त्याचप्रमाणे डीएपी खतांसाठीदेखील अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून नावारुपाला येत असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील शेती चांगलीच बहरली आहे. आंबट गोड चवीची फळे काढणी योग्य झाली असून, त्यांच्या रंगाने संपूर्ण परिसर गुलाबी आणि लालेलाल झाल्याचे नजरेस पडत आहे. वाढत्या थंडीबरोबर जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा हंगाम चांगलाच बहरला आहे. शरीरासाठी आरोग्यदायक लालचुटूक स्ट्रॉबेरीची सप्तशृंगगड, वणी आणि सापुतार्याच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेतकर्यांकडून विक्री केली जात आहे. दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्याच्या घाटमाथ्यावर
शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'च्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घ काळाचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
मुंबई : राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज ऊपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री ( CM ) देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज ( Climate Change ) वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
ठाणे : पर्यावरण संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील (युपी) चार तरुण जगाला संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर निघाले आहेत. युपीतील एका लहान गावातील हे चारही तरूण शेतकरी ( UP Farmer ) असुन मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी 'विश्व पदयात्रा' काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केले आहे. २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे तरूण ठाणे जिल्हयात जनजागरण करणार आहेत.
नवी दिल्ली : राज्यसभा सभापतींच्या विरोधात महाभियोग प्रस्तावाच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत गदारोळ झाला. यावेळी सभापती जगदीप धनखड ( Vice President ) आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
Farmers protest पंजाब येथे शेतकऱ्यांनी रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी शंभू सीमेवर शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव केल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. दिल्ली येथे जाण्यासाठी ज्या १०१ शेतकऱ्यांची यादी दिल्ली पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आली आहे, त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून पांगवण्यासाठी काही पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
Waqf Board देशमुखांच्या लातूरमध्ये वक्फ बोर्डाने १०३ शेतकर्यांच्या तब्बल ३०० एकर वडिलोपार्जित शेतजमिनीवर दावा केला आहे. आता या शेतकर्यांना स्वतःच्याच जमिनीची मालकी न्यायालयीन लढ्यातून सिद्ध करावी लागणार आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आताच का आणले, असा प्रश्न संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित केला होता, त्याचे हे उत्तर आहे.
Farmers protest शेतकरी आणि पोलिसांमध्ये पंजाब-हरियाणा येथील शंभू सीमेवर ताणाव निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ रोजी दिल्ली येथे गेलेल्या मोर्चासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले असता शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांनी तोडून जाण्याचा प्रयत्न केला असून आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या २१ गोळ्या झाडण्यात आले. यावेळी प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर करण्यात आला असून या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून सहा शेतकरी जखमी झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या दहा महिन्यातच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागलं. २०१५मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच प्रमाण कमी होतं, परिणामी २०१५च्या ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोर जाण्याची वेळ आली. शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे पीक घेता येत नव्हती तर दुसरीकडे पाण्याअभावी पीक जाळून गेली. जनावरांना पुरेसा चारा, पाणी नव्हतं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामन
लासलगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेल्या थंडीची तीव्रता कमी झाल्यामुळे लासलगाव व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ व दमट वातावरण निर्माण झाले आहे. कांदा तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे. या पिकांवर औषध फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढत असून शेतकरी ( Farmers ) वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी २ डिसेंबर रोजी संसद भवनच्या परिसराकडे मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर कोंडी झाली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नुकत्याच लागू झालेल्या कृषी कायद्यांतर्गत लाभ आणि नुकसानभरपाईच्या त्यांच्या पाच मागण्यांचा पाठपुरावा या आंदोलनाद्वारे करायचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला सध्या वेग आला असून, पेरणीपूर्व कामांची शेतकरी ( Farmer ) वर्गाकडून लगबग सुरु झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील सर्वच भागात गहू आणि हरभर्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषकरुन थंडीच्या दिवसात पिकांच्या लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मशागतीला वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच यंदा पावसाळा लांबल्याने रब्बी हंगामाला काहीसा उशीर होत आहे. त्यात गहू, हरभरा पिकांसाठी आवश्यक असणारी थंडी ही उशीरा सुरु झाली. त्यामुळे या पिकांचा हंगाम काहीसा लांबल्याच
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यावर लगेचच सोयाबीनला सहा हजार प्रतिक्विंटल भाव देण्याची घोषणा केली आहे. शेतकर्यांच्या पिकाला योग्य भाव नसल्याची ओरड विरोधक कायमच करत असतात. पंतप्रधान मोदींच्या घोषणेने विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून घेतली आहे.
निवडणुका आणि मतदान जवळ येताच, विरोधकांकडून अपप्रचाराची, ‘फेक नॅरेटिव्ह’ची एक पद्धतशीर मोहीमच राबविली जाते. ‘संविधान खतरे में हैं’ प्रमाणेच मोदी सरकार कसे शेतकरीविरोधी आहे, हे सिद्ध करण्यासाठी आटापिटा केला जातो. त्यासाठी कृषी कायदे, पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचाही प्रसंगी आधार घेतला जातो. महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या अपप्रचाराला ऊत आला आहे. त्यानिमित्ताने कृषी क्षेत्रातील मोदी सरकारचे योगदान अधोरेखित करुन, विरोधकांच्या नॅरेटिव्हला सुरु
भारत सरकारने ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’, राज्य सरकारने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केलेल्या मराठवाड्यातल्या विद्या रूद्राक्ष यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोलापूर येथे करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी २७७३ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
पाकिस्तानातील (Pakistan) सिंध येथे एक हिंदू शेतकरी आणि त्याची तीन मुले मृतावस्थेत आढळून आली आहेत. उमरकोट जिल्ह्यातील पल्ली मोरजवळील आंब्याच्या बागेत एका ३२ वर्षाचे एका ३२ वर्षीय शेतकरी, चमन कोल्ही आणि त्याच्या तीन मुलांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. ८ वर्षांचा भागचंद्र, ६ वर्षांचा हिरो आणि ४ वर्षांची सोनी अशी या मुलांची नावे आहेत. ही घटना ४ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे. सोमवारी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हंगामाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात उन्हाळी कांद्याची दरवाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.
केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखावून जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. केंद्र सरकारने कांदा, सोयाबिन आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
"कृषिपंपाच्या वीज ( electricity ) कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल," असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाचे वाचन सुरू केले. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
१८ महिन्यात ९ हजार मेगाव्हॅटचे कृषी फीडर सोलरवर जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, दि. २८ जून २०२४ आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अतंरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्यासोबतचं शेतीमाल ठेवण्यासाठी गाव तिथे गोदाम या योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील खरीपाचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांना कर्ज नाकाराल तर एफआयआर दाखल करणार, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना दिला आहे. मंगळवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसोबत राज्य सरकारची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान देशातील ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसै जमा होणार आहेत. पीएम सन्मान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार असून देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारचे या योजनेसाठी २०००० कोटींहून अधिक निधी खर्च होणार आहे.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावरच सरकारने नवीन निर्णय घेतला आहे. सत्तेत आल्यावरच लगेच शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना पारित केली आहे. या योजनेतून ९.३ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. १७ हप्त्यात या २०००० कोटींची योजना असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयात पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे २० हजार कोटी रुपये जारी करण्याच्या पहिल्याच निर्णयावर स्वाक्षरी केली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. याअंतर्गत २० हजार कोटी रुपये जारी करण्यात य
गेल्या दहा वर्षात झालेल्या परिवर्तनामुळे भारताच्या बँकिंग क्षेत्राचा निव्वळ नफा इतिहासात प्रथमच ३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. बँकांचे आरोग्य सुधारल्याने गरीब, शेतकरी आणि एमएसएमई यांच्यासाठी कर्जाची उपलब्धता सुधारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप हाताळता यावा यासाठी सरकार काम करत आहे. सरकारच्या पोर्टलमार्फत पंप व्यापारी यांच्याशी शेतकरी थेट संपर्क करू शकतात. यापूर्वी सरकारने सोलार टॉप योजना आणली होती ज्या मध्ये घराघरात सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले होते. याच योजनेत आता सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप प्रकल्पाचा आधार मिळावा यासाठी सरकारने ही नवी योजना आखली आहे.
शेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या कासरा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. शेती, शेतकरी या विषयावर आजवर अनेक चित्रपट झाले असले, तरी कासरा वेगळा ठरणार असून, सकस कथानक, उत्तम अभिनय असलेला हा चित्रपट २४ मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम असूनही केंद्र सरकारने नुकताच शेतकरी हिताचा निर्णय घेऊन तब्बल ९९ हजार, १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकर्यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
एकीकडे सांगली लोकसभेवरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मतदारसंघात एन्ट्री घेतली आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता स्वाभिमानी संघटनेने इथे आपला उमेदवार जाहीर केल्याने विशाल पाटलांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
देशातील ८१.३५ कोटी नागरिकांच्या अन्नसुरक्षेची ‘गॅरेंटी’ केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करुन आजवर दिली. शेतमालाच्या खरेदीबरोबरच सामान्य कुटुंबाच्या अन्नसुरक्षेची राष्ट्रीय जबाबदारीही सरकारने यशस्वीरित्या निभावली. त्यामुळे संपुआ सरकारप्रमाणे सबसिडीतून घोटाळेबाजी नव्हे, तर गरीब कल्याणाचा वस्तुपाठच मोदी सरकारने प्रस्थापित केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. याचा घोषणेचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी १५ मार्च रोजी केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
पतीच्या निधनानंतर अजिबात खचून न जाता, शेतीतला कुठलाही अनुभव नसताना, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेती करणार्या संगीता पिंगळे यांची ही यशोगाथा...
अभिनेते अनुपम खेर सामाजिक, राजकीय अशा अनेक विषयांवर त्यांचे परखड मत मांडत असतात. आजवर त्यांनी बऱ्याच चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच त्यांचा 'कागज २' चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना अनुपम यांनी गेला अनेक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन दुसऱ्यांच्या सुविधांना ठेच पोहचवू नये”,