मुंबई : कोरोनाकाळात ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्या’ची ढाल पुढे करून मुंबई पालिकेतील सत्ताधार्यांनी विनानिवादा कंत्राटे काढली. ‘कोविड’ सेंटरची उभारणी, रेमडेसिवीर इंजेक्शन, खिचडीवाटप, पीपीई कीट, ऑक्सिजन पुरवठ्यात प्रचंड भ्रष्टाचार केला. या काळात पालिकेत तत्कालीन शिवसेनेची ( UBT ) सत्ता होती. त्यांच्या पक्षाचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष होते. बहुमताच्या जोरावर नियम धाब्यावर बसवून भ्रष्टाचाराला बळ देण्यात आले, असा गौप्यस्फोट भाजप नेते तथा मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. दै. ‘मुंबई तरु
Read More
Uddhav Thackeray एकाबाजूला माझे हिंदुत्व हे वेगळे आहे आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे असे अनेक मुस्लिम बांधवांना वाटते असे वक्तव्य भरसभेत उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र आता यापार्श्वभूमीवर महायुतीने उद्धव ठाकरे सरकारच्याकाळात केलेल्या कामांवर सवाल उपस्थित केले आहेत. उद्धव ठाकरे सरकार असताना कोरोनाकाळात दुकाने चालु करण्यात आले होते, मात्र मंदिर बंद करण्यात आल्याने उद्धव ठाकरे सरकारवर टीका करण्यात आल्या होत्या.
Uddhav Thackeray मवाळपणाचा दिखावा करणार्या उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला. हातात सत्ता नसताना ही स्थिती,चुकून सत्ता आली तर यांचा उन्माद न आवरणारा असेल, हे वेगळे सांगायला नको!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्ह
कोरोना महामारीदरम्यान आरोग्य व्यवस्थेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. केवळ अविकसित आणि विकसनशील देशांतच नाही, तर विकसित देशांमधील आरोग्य व्यवस्थाही महामारीशी प्रारंभी दोन हात करण्यात सपशेल अपयशी ठरली. त्यानंतरही प्रतिबंधात्मक लसी, त्यांच्या चाचण्या, लस कंपन्यांचे राजकारण आणि अर्थकारण याचा फटकाही विकसनशील देशांना बसला. पण, एकूणच या महामारीने जागतिक आरोग्य व्यवस्थेला जोरदार हादरे दिले.
अवघे जग कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी लसनिर्मितीला प्रोत्साहन दिले. प्रत्येक भारतीयाला लसीचे सुरक्षा कवच देतानाच, जगभरातील गरजवंत देशांना लसपुरवठा केला. त्यामुळे आज १०० हून अधिक देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लशीमुळे आम्ही जिवंत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी केले.
कोरोना महामारी, उघूर मुस्लिमांचा नरसंहार, दक्षिण चीन समुद्रातील दंडेलशाही, छोट्या देशांभोवती कर्जाचा विळखा, अशा एक ना अनेक कारणासाठी चीन जगभरात बदनाम आहेच. पण, त्याच चीनने आता जागतिक पातळीवरील सर्वांत महत्त्वाची संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाला ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचल्याचे समोर आले आहे . ड्रॅगनच्या याच नापाक खेळीचे विश्लेषण करणारा हा लेख...
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबीमध्ये दि. 26 ते 29 फेब्रुवारीदरम्यान, ‘जागतिक व्यापार संघटने’ (थढज)ची 13वी मंत्रीस्तरीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये 166 देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेत, जागतिक व्यापारात अडथळा ठरणार्या, विविध विषयांवर चर्चा केली. त्याबरोबरच या परिषदेमध्ये चीनचा कुटिल डाव हाणू पाडण्यातसुद्धा भारतीय कूटनीतीला यश आले. त्याचाच घेतलेला हा आढावा...
केंद्र सरकारने अखेर देशातील शालेय शिक्षणाशी संबंधित असलेल्या, इयत्ता दहावीपर्यंतच्या वर्गांसाठीच्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गासाठी प्रवेश देता येणार नाही, अशा स्वरुपाची मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जाहीर केली आहेत. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांवरील ताण आणि त्या तणावाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी, पावले उचलण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रयत्नाचा भाग म्हणून त्याकडे पाहावे लागेल.
संपूर्ण जग सध्या भारताकडे विश्वबंधु म्हणून पाहत आहे, भारताकडून संपूर्ण जगास अपेक्षा आहेत. या प्रवासात युएई हा भारताचा भक्कम साथीदार असून भारत आणि युएई एकविसाव्या शतकाचा नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अबुधाबी येथे केले. भारतीय समुदायास संबोधित करताना ते बोलत होते.
कोरोनाकाळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. शर्मिला ठाकरेंनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावर निशाणा साधला.
छत्रपतींच्या घराण्याकडुन देण्यात येणारा पहीला छत्रपती शिवाजी महाराज शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व या वर्षी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण होण्याच्या निमित्ताने सातारा येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
बहुचर्चित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप यांची ईडीने चौकशी केली. कोरोना महामारीच्या काळात खिचडी वितरणात गुंतलेल्या एका फर्मकडून संदीप राऊत यांना पैसे मिळाल्याचा आरोप आहे.
चीनने ‘कोरोना’ पसरवण्याचे पाप करून, संपूर्ण जगाला ‘कोरोना’च्या विळख्यात ढकलले, हे तर आता जगजाहीर. नुकत्याच अमेरिकन काँग्रेसच्या शोधकर्त्यांनी चीनचे पितळ उघडे पाडले. या शोधकर्त्यांच्या अहवालानुसार, ‘कोरोना’ पसरवण्यात चीनचा मोठा हातभार असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या शोधकर्त्यांच्या अहवालानुसार, चिनी संशोधकांनी डिसेंबर २०१९च्या अखेरीस ‘कोरोना’ला कारणीभूत असलेल्या विषाणूचे मॅपिंग केले. कमीतकमी दोन आठवड्यांपूर्वी ’जागतिक आरोग्य संघटने’ने संसर्गजन्य विषाणूमुळे उद्भवलेल्या धोक्याचे प्रमाण कमी केले होत
राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांनी शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी समाचार घेतला. 'कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नव्हे, तर तळीरामाचे भक्त आहेत', अशी खरमरीत टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. उबाठा गटात हिंमत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
कोरोनाच्या जे.एन-१ प्रकारातील बाधित रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. पैकी सर्वाधिक ९१ रुग्ण पुण्यातील आहे. विशेष म्हणजे ३ जानेवारीपर्यंत ३२ वर असलेली जे.एन-१ रुग्णसंख्या एका दिवसात ७८ ने वाढल्यामुळे भिती व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जे.एन-१ बाधितांची संख्या ११० इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यातील ९१ रुग्ण एकट्या पुण्यात, तर ठाणे ५ आणि बीडमध्ये ३ रुग्णांची नोंद करण्यात आली. दुसरीकडे गुरुवार, दि. ४ जानेवारी रोजी १७१ नवीन कोरोनाबाधित आढळले. तर, दिवसभरात २ रुग
‘चला एकत्र कल्पना करू या’ अर्थातच ही कल्पनाच सुचली चार वर्षांपूर्वी. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, कोणत्याही कारणाने त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी या कल्पनेनुसार ‘लेटस इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’ काम करते. गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करायला हवे, असे वाटणारे अनेक समविचारी लोक संस्थेशी जोडली गेली. संस्थेच्या या संकल्पना कार्याचा मागोवा इथे मांडला आहे.
सी व्होटर सर्व्हे असो किंवा झेड व्होटर असो, फक्त मोदीजींचीच हवा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुणे येथे सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दलदेखील चर्चा केली.
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ते पुण्यातील घरी क्वारंटाईन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भारतातील बेरोजगारी वाढत असून त्यावर सत्ताधारी भाष्य करत नाहीत, असा आरोप हा नित्याचाच. पण, विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे? याबाबतचे सरकारी तसेच अन्य संस्थांचे आकडे काय सांगतात? यांचा उहापोह करणारा हा लेख....
गोरगरीब कामगार जनतेला कोविड काळात पोटाची खळगी भागवता यावी यासाठी मुंबई महापालिकेने खिचडी वाटप निर्णय घेतला होता. मात्र, यातूनही गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिसकावत स्वतःची तुंबडी भरवण्याचे काम करण्यात आले असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पालिका प्रशासन आणि संबंधितांवर केला आहे. विधानसभेच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते तेव्हा त्यांनी हा आरोप केला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्ही गटांमध्ये समतोल साधण्यासाठी आरंभिलेल्या ‘कबाड से जुगाड’ या लोकहितैषी उपक्रमांतर्गत झटणार्या मनोज बंड यांच्याविषयी...
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
जागतिक महामारी ‘कोरोना’ विषाणूच्या विळख्यातून मानवजातीची जेमतेम सुटका होत असतानाच, चीनसह अमेरिकेतही गूढ न्यूमोनियाचे संकट उभे राहिले आहे. या आजारामुळे मुले आणि वयस्कर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जवळपास दोन महिन्यांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालणार्या गूढ न्यूमोनियाने जागतिक चिंता वाढवली आहे.
चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूमुळे संपुर्ण जग हादरल्यानंतर आता तिथे न्यूमोनिया आजार पसरला असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये H9N2 प्रकारातील न्यूमोनिया विषाणू पसरल्याची माहिती मिळताच सगळीकडे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळी भेट दिली. त्यांनी केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेची प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन दिले जाते. दिवाळीचा सण आठवडाभरावर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून ऑक्टोबरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीने रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
‘इन्फोसिस’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे, अशा स्वरुपाचे अलीकडेच केलेले विधान चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यानिमित्ताने कर्मचार्यांच्या कामाच्या तासांचे गणित, त्यांची उत्पादकता आणि त्यासंबंधीचे नियम-कायदे यांसारख्या विविध मुद्द्यांचा उहापोह करणारा हा लेख...
श्री शिव छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमान. २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५०वे वर्ष. या निमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने महाराष्ट्रातील विविध ३५० गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
चार वर्षांआड होणार्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धा’ यावेळेस चीनमधील हांगझाऊ शहरात १९व्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धा हांगझोऊ २०२२’ अशा नावाने संपन्न झाल्या. चीनमधली आताची ही तिसरी स्पर्धा, आधी २०२२ मध्ये नियोजित होती. पण, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे तेव्हा न होता, त्या स्पर्धा दि. २६ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपन्न झाल्या. फुटबॉलच्या स्पर्धा मात्र आपल्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजे दि. १९ सप्टेंबरलाच सुरू झाल्या, तर त्यातील महिलांच्या ‘टी-२०’ क्रिकेट स्पर्धा दि. २१ सप्टेंबरपासून व पुरुषांच
आधी कोरोना आणि आता रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी एकीकडे संघर्ष करीत असताना, भारताने महागाई तर नियंत्रणात ठेवलीच; पण त्यासोबत आपल्या आर्थिक विकासाचा वेगही मंदावू दिला नाही. त्यातच जागतिक बँकनेही नुकतेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ६.३ टक्के राहील, असे भाकीत वर्तविले आहे. तसेच भारताच्या याच आर्थिक यशाची ग्वाही भारतीय शेअर बाजारानेही मागच्या सहा महिन्यांत दिलेली दिसते. त्याचेच हे आकलन...
‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र’ या संस्थेच्यावतीने कोरोनानंतरचे सर्वात मोठे राज्य संपादणूक सर्वेक्षण मार्चअखेर करण्यात आले होते. कोरोनानंतर विद्यार्थ्यांची विविध विषयांत अध्ययन क्षती झाल्याचे सातत्याने यापूर्वीच्या विविध सर्वेक्षणात समोर आले होते. त्यामुळे या शासकीय सर्वेक्षण अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. अखेर सर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राज्याची शैक्षणिक संपादणूक राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर उंचावत असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याचवेळी भाषा
चीनच्या हांगझाऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारताने आतापर्यंत ५ पदकांची कमाई केली आहे. २०२२ साली कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे या स्पर्धेस रद्द करण्यात आले होते. तीच स्पर्धा आता घेण्यात येत आहे. यात भारताने यशस्वी घोडदौड सुरू केली असून ३ रौप्यपदकांसह ५ पदके मिळविली आहेत.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. याकरिता उन यांनी रशियापर्यंत त्यांच्या वैयक्तिक रेल्वेने दोन दिवसांचा प्रवास केला. या भेटीमुळे रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियादेखील सहभागी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उन आणि पुतीन यांची ही बैठक सामान्य गोष्ट नसून या भेटीला अनेक पैलू आहेत. कोरोना काळानंतर उन याचा हा पहिलाच परदेश दौरा होता. उन २०११ साली सत्तेत आला आणि त्यानंतर त्याने २०१८ साली म्हणजेच तब्बल सात वर्षांनंतर पहिला परदेश दौरा केला. उन
माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दिलासा मिळालेला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षणाची विनंती केली होती.
दि. १ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली एसटी धावली. या घटनेला यंदा दि. १ जून रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. अर्थात, एसटीचे हे अमृत महोत्सवी वर्धापन वर्ष आहे. त्यानिमित्त ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या आजवरच्या प्रवासाचा आणि आधुनिकतेकडे सुरु झालेल्या वाटचालीचा आढावा घेणारा हा लेख...
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. बॉडी बॅग किट खरेदीत गैरव्यवहार प्रकरणात २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईओडब्ल्यूला दिले आहेत. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या तर्फे अटकपूर्व जामिन अर्ज दाखल करण्यात आला होता.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीही अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीही किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.
राज्यात अनेक दिवसांनंतर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मागील महिन्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लागण झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज (४ ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, यावेळी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आमचं सरकार २४ तास काम करणार आहे. फेसबूक LIVE किंवा वर्क फ्रॉम होम करणार नाहीय. आपल्या पंतप्रधान मोदींनी ९ वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही. असा टोला शिंदेंनी यावेळी ठाकरेंना लगावला.
जपानमधील लोकांना कोरोना महामारीच्या काळात मास्क लावण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांना आता हसण्यासाठी सेशनमध्ये जावे लागते. जपानमधील लोक हसता यावे म्हणून 'स्माइलिंग सेशन'मध्ये सहभागी होत आहेत. खरं तर, पूर्व आशियाई देशांमध्ये चेहरा झाकणे सामान्य आहे. कारण, हंगामी आजार आणि ताप याशिवाय संसर्गाचाही लक्षणीय परिणाम झाला आहे. कोरोनानंतर लोकांनी मास्क अधिक व्यवस्थित घालायला सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेकाचे निमित्त साधून शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये कोणते उपक्रम राबवले जावेत, या काळात विद्यार्थ्यांसमोर शिवचरित्राचे अनेक ज्ञात-अज्ञात पैलू मांडण्यात यावेत, पण ते कशा प्रकारे मांडावे हे मी माझ्या आकलनाप्रमाणे या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीचा आणि नंतरचा इतिहास आपण त्यासाठी अभ्यासायला हवा.
बीजिंग : चीनमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. कोरोनाचे नवे ‘व्हेरिएंट’ टाळण्यासाठी चीन सध्या अतिशय वेगाने लस तयार करण्यात व्यस्त आहे. नवीन लाटेमुळे, जूनच्या अखेरीस, चीनमध्ये दर आठवड्याला कोरोनाचे ६.५ कोटीपेक्षा जास्त ‘कोविड’ रुग्णांची नोंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच ‘ओमिक्रॉन’चा नवा ‘व्हेरिएंट’ही सक्रिय झाला आहे.
करोना महामारीच्या सर्वंकष परिणामांचा अनुभव या जगातील प्रत्येकानेच घेतला. अगदी वैयक्तिक ते देशाच्या अर्थकारणाला हादरे देण्यापर्यंत या महामारीचे विविधांगी पदर हळूहळू उलगडत गेले. कोरोनाचे मूळ समजण्यापासून ते लसीकरणापर्यंत विकसित देशांपासून ते अगदी अविकसित देशांपर्यंत प्रत्येकाची कसोटी पाहणारा हा काळ होता. अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे ओसरलेला नसून, चीनमध्ये पुन्हा एकदा नव्या ‘व्हेरिएंट’ने थैमान घातल्याचे वृत्त झळकले.
कर्नाटकमध्ये होणार्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मतदारांना आवाहन केले आहे. त्यात कर्नाटकला विविध क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य बनविण्याचे आश्वासन दिले आहे.“मतदानाच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मतदारांना एका व्हिडिओ संदेशाद्वारे कर्नाटकच्या जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. गुंतवणूक, इनोव्हेशन व उद्योगांत कर्नाटकला क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी भाजपला मतदान करा,” असे ते म्हणालेत.
मनुष्याच्या शरीराचे तापमान हे ९८ डिग्री फॅरनहाईटच्या आसपास असते. बाहेरील तापमान कमी असो वा जास्त असो, शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्याची सुंदर रचना मानवी शरीरात आहे. तापाची इतरही अनेक कारणे आहेत. तेव्हा, सध्या घराबाहेर उन्हाचा ताप आणि घरातही या अशा विचित्र वातावरणामुळे डोके वर काढणारा ताप... अशा या तापाचे स्वरुप, विविध प्रकार यांची माहिती देणारा हा लेख...
चीन आणि तैवान असा संघर्ष पेटवून अमेरिकेला तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षण सामग्री विकावयाची आहे. अशा आक्रमणाची भीती दाखवून तैवानच्या शेजारी असणार्या देशांना ही संरक्षण सामुग्री विकण्याचा अमेरिकेचा मनसुबा आहे
पुणे, नाशिक आणि कोल्हापूर येथे होणार्या मविआच्या तीन वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे म्हणतात की, ऊन खूप आहे. उन्हाचा जोर ओसरला की, सभा घेतल्या जातील. पण, याआधी मुंबईत आणि ठाण्यातपण ऊन होतेच, तरीसुद्धा वज्रमूठ सभा झालीच. मग तशाच प्रकारे पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये या सभा होऊ शकल्या असत्या. पण, आता वज्रमुठीची झाकली मूठ सव्वालाखाची झाली आहे.
‘एमएसएमई’ क्षेत्रास निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक उपायांचा फायदा होणार आहे. नवीन व्यापार धोरणाच्या व्याप्तीमध्ये, ई-कॉमर्स निर्यातदार आता इतर निर्यातदारांना नव्या धोरणाद्वारे देण्यात आलेल्या सर्व तरतुदींचा लाभ घेता येणार आहे. याद्वारे ‘एमएसएमई’ क्षेत्रास परदेशी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करणे सोपे होणार आहे.