आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
Read More
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जुन्या प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
( feed pigeons you will be fined Rs 500 BMC Mumbai ) मुंबईत दादर, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून जुने कबुतरखाने आहेत. या बरोबर मु्ंबईच्या उपनगर परीसरातदेखील कबुतरांना खाणे देण्यात येते. यामुळे मुंबईतील रहीवाशी परीसरात मोठ्या प्रमाणात कबूतरे आढळून येतात. कबूतरांनमुळे होणार्या ञासांवर आता उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीने उद्धव ठाकरेंना दणका देण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७ साली प्रभाग आरक्षण लागू केल्यानंतर, पुढील १० वर्षे ते कायम ठेवण्याचा ठराव मुंबई पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्याचा आधार घेत येत्या निवडणुकीतही हाच नियम लागू करण्याबाबत महायुतीने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
(Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीनं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी पक्षाचे नेते दीपक केसरकर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रामटेक बंगल्यावर पार पडली.
शंभर वर्षाहुन जुने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय कात टाकणार आहे. प्रस्तावित नविन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामासाठी देण्याचा निर्णय झाला असला तरी, तब्बल ५६० कोटी खर्चून मनोरुग्णालयाचा कायापालट होणार आहे.
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी झाला, तरी भाजपचा कसा पराभव झाला आहे, हे विरोधी पक्षनेते अजूनही ठासून सांगत आहेत. स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. भाजपचा देशभरात जनाधार वाढलेला असतानाही, हा त्याचा पराभव असल्याची अफवा आत्ममग्न विरोधक पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे काम आणि कार्यकर्त्यांच्यावरील अदम्य विश्वास यांच्या जोरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला विजयी संकल्प निश्चितच ऊर्जादायी!
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात महिलांसाठी कौशल्य विकास विभाग उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 'आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने'चा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता एकूण ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. यंदा आरोग्याकरिता ७,१९१. १३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुंबई उपनगर पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेचा सन २०२४-२५ चा एकूण ५९,९५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
मुंबईतील शिक्षकांचे लेसन प्लॅन कुणी बंद केले-अनिल बोरनारे, शाळा सुटल्यावर विनाकारण शिक्षकांना थांबवून ठेवणे कुणी बंद केले- अनिल बोरनारे, शासकीय कर्मचाऱ्यांसोबत सातवा वेतन आयोग कुणी मिळवून दिला. अनिल बोरनारे, अनेक महिला शिक्षकांना नाकारलेल्या बाल संगोपन रजा कुणी मिळवून दिल्या ? अनिल बोरनारे पे फिकसेशन स्टॅम्पिंग मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा कुणी शिकविला- अनिल बोरनारे अशा अनेक कामांबद्दल शिक्षकांनीच शिक्षकांना सांगितले.
स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते म्हणाले, प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष वेधतानाच याकरिता झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
छटपूजा उत्सव जवळ आला आहे. यानिमित्ताने मुंबईतील सुमारे ८२ छटपूजा स्थळांवर भाविकांसाठी आवश्यक त्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जात आहे. याभरतीसंदर्भात आयसीएमआरकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन, लॅव अटेंडट ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अरबी समुद्रात तयार झालेल्या "तेज" चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे मुंबई शहरास धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी "तेज" चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असून मुंबई शहर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्याने नुकतेच महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ जाहीर केले असून यामाध्यमातून सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
गणेश जशी विद्येची देवता, तशीच ती कलेची देवता. विघ्ने येऊ नयेत म्हणून विघ्नहर्त्याची पूजा लोककलावंतांनी बांधली. गणेश लोककलेत ठायी ठायी आहे. कधी तो नुसताच संकीर्तन रूपात, तर कधी साक्षात नाट्यरूपात. त्याचे हे संकीर्तन रूप आणि नाट्यरूप लोककलांमध्ये कधी रांगड्या तर कधी प्रासादिक रूपात सादर होते. तेव्हा, अशाच लोककलेतील गणेशाचे उलगडलेले हे उत्सवी रुप...
महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये दररोज असंख्य रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक येतात. रुग्णालयातील विविध विभाग माहित नसल्यामुळे त्यांची तारांबळ होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सेवार्थ एक मदतकक्ष असावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुचवले होते. यानुसार महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये 'रुग्णमित्र हेल्प डेस्क' ची सुरुवात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका विषयक वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करीत विविध विषयांवर संवाद साधला.
मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा आवाज उठवला असून यासंदर्भात ते म्हणाले, पालिकेतील खिचडी घोटाळा हा जवळपास १६० कोटी रुपयांचा असल्याचे सोमय्या म्हणाले, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा खा. संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोविड काळातील खिचडी घोटाळा संजय राऊत यांनी यांसदर्भातली कंत्राटे मिळवून आपल्या मित्रपरिवाराचा फायदा करून दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच रिक्त पदे भरणार असून अर्ज मागविण्यात येत आहेत. बीएमसीकडून नोकरभरती संदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून पालिकेअंतर्गत विविध खात्यांच्या आस्थापनेवर ‘कनिष्ठ लघुलेखक’ (इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेकरिता) या संवर्गातील एकूण २२६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांकरिता भरतीप्रक्रिया सुरु झाली असून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच, अर्ज करताना भरतीप्रक्रियेतील पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास पालिकेच्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक वरून २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत भरावयाचे आहेत. दरम्यान, सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी II (३४), सहाय्यक कायदा अधिकारी (१९)या पदांकरिता भरतीप्रक्रिया केली जाणार आहे.
मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालत्या ट्रेनमधून एका तरुणीला हल्लेखोराने बाहेर फेकून दिल्याचा प्रकार दि.७ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात घडली आहे. पुणे - मुंबई उद्यान एक्स्प्रेसमधील महिलांच्या जनरल डब्यात ही घटना घडली असून सुदैवाने या घटनेत ही तरुणी बचावली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आणि तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई भागांत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून शहराच्या विविध भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागा अंतर्गत २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन भायखळा पूर्व येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा तर प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर उपस्थित राहणार आहेत.
हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचे दोन तुकडे होऊन आता वर्ष पूर्ण झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याने आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अख्खी शिवसेना उद्धव यांच्या हातून निसटली; पण या सगळ्या घटनाक्रमांतून उद्धव ठाकरेंनी काहीही धडा घेतला हेच सत्य.
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी गुजरात, पुद्दुचेरी आणि मुंबई या प्रदेशांकरिता नव्या अध्यक्षांची नेमणूक केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप होते. त्यांची या पदावरून आता उचलबांगडी करण्यात आली असून आ. वर्षा गायकवाड या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष असतील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल करण्यात
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मोकळ्या जागांचे अपहरणाचे धोरण थांबवून दिलासा द्यावा. मुंबईतील खुल्या जागा महापालिकेने सांभाळाव्यात. याबाबतचे पत्र नागरिकांच्या गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. या नागरिकांमध्ये अनिल गलगली, अशांक देसाई, भगवान रैयानी, देबाशीष बसु, डॉल्फी डिसूजा, नयना कठपालिया, शरद सराफ, शैलेश गांधी, सुचेता दलाल, रंगा राव यांचा समावेश आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर येत असून ईडीने चहल यांना सोमवार १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही माहिती समोर आली आहे.
bmc : प्रभाग क्र. ५१ मधील स्वतंत्र चाळ, विटभट्टी, गोरेगाव पूर्व येथे लोकांना पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता. त्यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणून आमदार विद्याताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने संदीप जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या परवानगीने आणि आपल्या स्वखर्चाने या जलवाहिनीचे काम आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून केले. हा प्रश्न सोडवल्यामुळे तेथील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. किशोरी पेडणेकरांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएकडून मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एसआरएने मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकरांसाठी हा पहिला मोठा दणका आहे.
“मुंबई महापालिकेत ठाकरे परिवाराने मराठी माणसाच्या नावे सत्ता उपभोगत गेली 25 वर्ष लूटमार केली,” असा आरोप विधान परिषदेचे गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर करत त्यांचा हा धंदा बंद करायचा असल्याचे आवाहन उपस्थितांना केले. घाटकोपर येथे नुकतीच भाजपची ‘जागर मुंबईचा’ सभा पार पडली. या सभेला आ. प्रवीण दरेकर संबोधित करत होते.
महापालिकेची रुग्णालये दुरवस्थेच्या गर्तेत !
फेरीवाल्यांच्या गराड्यात अडकलेले दादर
मुंबईतील छोट्या-मोठ्या नाल्यांमधील तुंबलेला गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य वाहिन्या विभागाने बाह्या सरसावल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या प्रभाग पुनर्रचनेला भाजपनेही कडाडून विरोध केला
पवई चांदिवली भागात ३२२ कोटींचे नवीन रुग्णालय मुंबई महानगर पालिका बांधणार आहे. त्यासाठी सल्लागार म्हणून नेमलेल्या कंपनीला फक्त सल्ला देण्याचे ६ कोटी पालिका मोजणार आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल आज मुंबईमहापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प आज सादर करतील.
मुंबईत खालावत जाणारी मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या यावर कुठलाही ठोस आणि परिणामकारक तोडगा न काढता इतर खर्चिक गोष्टींना प्राधान्याने हाती घेण्याचे उद्योग मागील २० ते २५ वर्षांपासून सुरु आहेत. दादर, सायन, शिवडीत राहाणारा मूळ मुंबईकर मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर फेकला गेला याकडेही सोयीस्कररीत्या डोळेझाक करण्यात सेनेने धन्यता मानली. पालिकेच्या प्रस्तावित निवडणुकांच्या तोंडावर शहरात स्थानिक नागरिकांची मते लक्षात न घेता उर्दू भाषा केंद्राची उभारणी केली जात असेल, तर या प्रकाराला ‘भाषेच्या आडून ध्रुवीकरणा
काही आठवड्यांपूर्वी महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या, ज्यावरून बराच गदारोळ उडाला होता. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, रस्तेदुरुस्ती प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या कंत्राटदारांना ‘पावन’ करून घेण्यासाठी राज्यातील एका मंत्र्याच्या मावस भावाने कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला आहे.
खर्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना आरोग्यसेवा मिळवून द्यायची असेल तर रुग्णांना माणूस म्हणून संवेदनशीलतेने वागणूक इथे मिळायला हवी. आपली सेवा करणारे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना वेतनभत्ते सुविधा आणि तितकीच प्रतिष्ठा मिळते, त्यामुळे आपण इथे लाचार नाही तर या रुग्णालयाची जान आहोत हे रुग्णांना वाटायला हवे. पण, हे स्वप्नच राहील वाटते.
निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांसाठी एक गाजर असते. जनतेला वाट्टेल तशी स्वप्न दाखवायची आणि ती पूर्ण करता न आल्यास विविध कारणे सांगायची, ही सत्ताधाऱ्यांची नेहमीचीच पद्धत झाली आहे आणि जनतेच्याही ते आता अंगवळणी पडले आहे. मुंबई महापालिकेच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात असेच एक स्वप्न सफाई कामगारांसाठी दाखविण्यात आले.
मुंबईतील महापालिका शाळांचा दर्जा राखण्यात महापालिका प्रशासन विविध प्रकारे खटाटोप करीत असतानाचा आता तब्बल दहा शाळांमध्ये ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सोमवार, दि.१८ जानेवारी रोजी निर्णय घेण्यात आला. महापालिका शाळांची पटसंख्या राखण्यासाठी तब्बल २७ प्रकारच्या शालेय वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांचा कल लक्षात घेता, मुंबईतील दहा शाळांमध्ये ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आ
‘माय बीएमसी पॉटहोल ६८’ अॅपवर दीडशेहून अधिक तक्रारी दाखल!
पालिकेच्या अॅपवर पहिल्याच दिवशी सुमारे १७०० तक्रारी
महापालिकेच्या निर्णयावर आरे बचाव वाल्यांचा आक्षेप
गुरुवारी रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वेस्थानकाजवळील हिमालय नावाचा पादचारी पूल कोसळून सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. 35-36 जण जखमी आहेत म्हणतात. मन सुन्न करणारी ही घटना आहे. दक्षिण मुंबईतील हा परिसर अत्यंत वर्दळीचा समजला जातो. संध्याकाळी तर लोकांचे प्रचंड लोंढे या भागात लगबगीने धावपळ करीत असतात. अशात ही घटना घडावी, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे.
मार्च महिन्यात मिळणाऱ्या वेतनाबरोबर सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीमधील पहिला हफ्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.