सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने "TECH वारी - टेक लर्निंग वीक" या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञान, साधने आणि विचारसरणीने सज्ज करणारा हा उपक्रम आहे. दि. ५ ते ९ मे, २०२५ दरम्यान मंत्रालयात हा प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे.
Read More
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
(Trump freezes $2bn in Harvard funding) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना चांगलेच धक्के बसले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांबरोबरच देशाअंतर्गतही त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शिक्षणसंस्थाकडे वळवला आहे. जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १८ हजार कोटी रुपये) अधिक शैक्षणिक निधी गोठवला आहे. विद्यापीठात सातत्याने
(Pandharpur Chaitri Yatra) वारकरी संप्रदायातील महत्त्वाची यात्रा म्हणजे पंढरपूरची चैत्री यात्रा. या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी न चुकता पंढरपूरला येतात. यंदाही या यात्रेला जवळपास चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर प्रशासन आता सज्ज झाले आहे.
गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरणात वाढ झाल्याने, अनेक नागरिकांनी रोजगारासाठी शहराची वाट धरली. त्यातून जसा लाभ झाला, तसे काही तोटेही झाले. वाहतुकीची समस्या ही त्यापैकीच एक! पुण्यासारख्या शहरात ही समस्या आता उग्र होऊ लागली आहे. पुण्यातील वाहतूक समस्यांवर अधिकाधिक झोत टाकून, येथील सर्वच प्रकारच्या माध्यमांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. ‘पीएमपी’ची अवस्था अतिशय वाईट आणि प्रवाशांना त्रास होईल, अशी असल्याचे गेल्या वर्षभरापासून दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यात साजरा होणाऱ्या होळी आणि धुलीवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे तसेच जाळण्यास मनाई करण्यात आली आहे.
भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
Mumbai Milk Tanker अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसांत मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ६ हजार ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ हजार ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुरुवार, दि.१३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारताच, निर्णयांचा धडाका लावला आहे. अमेरिकेतील निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी, वेगवान निर्णय घेण्याची सुरुवात ट्रम्प प्रशासनाने केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेताच, अवैध घुसखोरांना बाहेर पडण्यास सांगितले होते. त्याचबरोबर अन्य काही लोकप्रिय निर्णयही त्याच दिवशी त्यांनी घेतले. असंख्य लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका ट्रम्प यांनी कायम राखला आहे. ट्रम्प यांच्या या धडाक्यामध्ये अजून एका निर्णयाची भर पडली. ट्रम्प या
( Beed Case ) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असताना आता बीड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हवेत गोळीबार करून त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यामध्ये कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेचा ( Municipal Corporation ) आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल ५४१.०८ कोटी मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. दि. २३ डिसेंबर रोजीपर्यंतच्या या वसुलीत अव्वल ठरलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने १८७.४५ कोटी वसूल केले असून, सर्वात कमी म्हणजेच १८.४८ कोटींची वसुली मुंब्रा येथे झाली आहे. तरी थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी ठाणे पालिकेने फोन, ‘एसएमएस’द्वारे थकबाकी भरण्यासाठी केलेल्या आवाहनाचा सका
राज्यातील ८८४ खासगी 'नर्सिंग होम्स'नी परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याची धक्कादायक माहिती ‘कॅग’(CAG)च्या अहवालातून उघड झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) नियमित तपासणी होत नसल्याकडेही या अहवालातून लक्ष वेधण्यात आले आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आता नवनिर्वाचित मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने ( government residences ) आणि कार्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चित्रकुट, तर विखे पाटलांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे.
अहिल्यानगर : शिर्डीतील साईमंदिर ( Shirdi Sai Mandir ) ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्रभर खुले राहणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मंदिर परिसरात फटाके आणि वाद्य वाजवायला बंदी करण्यात आली आहे. यावेळी भाविकांसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
(Chhattisgarh) महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच छत्तीसगडमध्येही महतारी वंदन योजना सुरु आहे. मात्र काहीजण या योजनांचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना दिसतात. दरम्यान एका काँग्रेस नेत्याने चक्क अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने या योजनेतून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ठाणे : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्री पदी वर्णी लागल्यानंतरना. सरनाईक पहिल्याच दिवशी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत ( ST Administration ) रविवारी (दि.२२ डिसे.) पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरावस्था,अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली, तसेच पहिल्याच दिवशी कारवाई टाळत असल्याचे स्पष्ट करून एक महिन्याचा अल्टीमेटम देताना चुकीला क्षमा नाही असा इशाराही प्रशासनाला दिला आहे.
कुर्ल्यात बेस्ट बस अपघातानंतरही मुंबई महानगरपालिकेडून अतिक्रमणे हटविण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होतो आहे. कुर्ला (प) स्थानक ते स.गो. बर्वे मार्ग- रॉयल हॉटेल पर्यंत तसेच कुर्ला (प)हॅप्पी होम ते श्रीकृष्ण चौक आणि सेंट जोसेफ हायस्कुल ते मार्केट पर्यंतचे सर्व फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने कायमस्वरुपी हटविणेबाबत भाजप जिल्हा सचिव व्यंकट बोद्दुल यांनी मुंबई महानगरपालिका एस विभाग आणि कुर्ला वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे. तसेच ही अतिक्रमणे न हटविल्यास शुक्रवार, दि.२० रोजी महापालिका कार्या
बेस्टच्या व्हायरल व्हिडिओ मागचं भयाण सत्य काय? कशी चालतेयं कंत्राटी कामगारांची व्यवस्था? भाजप नेते रवी राजांनी ( Ravi Raja ) दाखवला बेस्ट प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेचा काळा चेहरा!
मुंबई : दिवाळी, छटपूजेसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीचा काळ संपल्याने दि. ९ नोव्हेंबर रोजीपासून फलाट तिकीट ( Platform Ticket ) विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दिवाळी, छटपूजेसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीचा काळ संपल्याने ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
Nashik district hospital : बाळांची अदलाबदल? नाशिकच नाही मराठवाड्यातही घडले असे प्रकार!
(Nashik District Hospital) नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या अदलाबदलीच्या प्रकरणातील एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नोंदवहीतील चुकीच्या नोंदीमुळे हा प्रकार घडल्याचे माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बाळांची अदलाबदल झालीच नसल्याचा अहवाल दिला आहे.
नाशिक : (Nashik District Hospital) मुलाला प्रसुती दिलेल्या महिलेच्या हातात मुलगी ठेवल्याचा प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे. हा प्रकार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडला आहे. येथे एका महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र डिस्चार्ज घेताना रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून त्यांच्या हातात मुलगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. पण, डिस्चार्ज घेताना मुलगी झाल्याचे सांगत बाळ हातात देण्यात आले. रुग्णालयाच्या नोंदव
रस्त्यांवरील खड्डे भरण्यात कडोंमपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे कडोंमपा आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील खाद्यपदार्थांच्या दुकानांबाहेर हॉटेल मालकाचे नाव लिहिण्याचे प्रकरण अद्याप निकाली लागले नसून जयपूर महापालिकेनेही याबाबत आदेश जारी केल्याचे समोर आले आहे. प्रत्येक मांसाच्या दुकानाबाहेर हलाल मांस दुकानात मिळते की झटका हे स्पष्टपणे लिहावे, असे महापालिकेने आदेशात म्हटले आहे.
'नीट’चा घोटाळा संपला नाही, तोवर आता ‘यूपीएससी’ची निवड हा नवीन वादाचा विषय चर्चेत आला आहे. आतापर्यंत ‘आयआयटी’, ‘सिव्हिल सर्व्हिसेस’ या परीक्षा, निवडपद्धती आदर्श, अचूक मानल्या जात होत्या. पण, कोणतीही व्यवस्था संपूर्ण स्वच्छ, पारदर्शी नसते, हे आता सिद्ध झाले आहे.
वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उन्नत रस्तेबांधणीला मुंबईत वेग आहे. याच पार्श्वभूमीवर आता मढ - वर्सोवा दरम्यान केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
मनपाचे माजी प्रशासन उपायुक्त घोडे-पाटील यांच्या काळात ’जम्पिग’ पद्धतीने पदोन्नत्यांची खिरापत वाटल्या गेल्याविरोधात उपअभियंता रवींद्र पाटील उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर न्यायालयाने बांधकाम विभागामधील कार्यकारी व उपकार्यकारी अभियंता पदोन्नतीस स्थगिती दिली होती.
महापालिकेत होणार्या नोकरभरतीसाठी नाशिक पालिका प्रशासनाने ’टीसीएस’ कंपनीशी करार केला आहे. गेल्या महिन्यात मनपाने शासनाकडे नोकरभरतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला असून, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे चित्र आहे.
कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला रहिवाश्यांनी अंगावर रॉकेल ओतुन वेठीस धरल्याचा प्रकार ताजा असतानाच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांना दिव्यात फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनधिकृत बाबींवर कारवाई करणारे पालिकेचे अधिकारी पुन्हा एकदा टार्गेट होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बसमार्ग क्र. ए -४४१ आणि ए -४४२ च्या बसगाड्या शिवनेरी वसाहत मार्गावर मुंबई महानगरपलिकेतर्फे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे बुधवार , दि. १४ फेब्रुवारीपासून या मर्गिकेतील अप दिशेने मजास आगार आणि सदभक्तिकडे जाणाऱ्या बसगाड्या कै. शंकरराव महाडिक मार्गाने पीएमजीपी ते नमस्कार बसथांब्यादरम्यान वळवण्यात आल्या असून डाऊन दिशेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता एकूण ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गेली सलग दोन वर्षे मुंबई महापालिकेच्या निवडणूका झाल्या नसल्यामुळे प्रशासकांच्या हाती कार्यभार देण्यात आला आहे.
वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करताना या परिसरात बांधलेल्या तळघराच्या चाव्या वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिम पक्षकारांनी तळघराच्या चाव्या देण्यास नकार दिल्या होत्या. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दि. १८ जानेवारी २०२४ रोजी हा निर्णय दिला.
सरकारी नोकरीत असूनही दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
दिवाळी, छटपूजा आणि यानंतर सुरु होणाऱ्या सणासुदीच्या दिवसात अनेक चाकरमान्यांसह पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जातात. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली असून एकूण ७० अधिक फेऱ्यांमध्ये गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. यात वलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या), उधना-मंगळुरु जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष ( ३६ फेऱ्या) , इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष (१८ फेऱ्या) या गाड्यांच्या
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण, पश्चिम रेल्वेने खार रोड ते गोरेगाव दरम्यान, ६ व्या रेल्वेमार्गिकेकरिता २९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टल स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे तब्बल २ हजार जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, या शक्तिशाली भूकंपामुळे अफगाणिस्तानातील ग्रामीण घरे उध्वस्त झाली तर भूकंपाने भयग्रस्त झाल्याने शहरातील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.
अफगाणिस्तानातील हेरात प्रांताच्या राजधानीच्या वायव्येस ३० किमी अंतरावरील भागांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या धक्क्यामुळे तब्बल २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यु झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने मोठा निर्णय घेतला.
औद्योगिक न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला आपल्या कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दराने बोनस देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना २०११-१२ आणि २०१२-१३ मध्ये बोनस देण्यात आलेला नाही. बेस्ट एम्प्लॉईज युनियनने याला अन्याय म्हणत प्रशासनाविरोधात खटला दाखल केला होता. ज्यावर औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिला आहे.
सध्या सर्वत्र सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, कोजागरी पौर्णिमा, ईद-ए-मिलाद, नववर्ष स्वागत अशा अनेक सणांमध्ये गोडधोड पदार्थ बनवले जातात. पण, आपण हे गोडधोड पदार्थ म्हणून भेसळयुक्त पदार्थ तर सेवन करीत नाही ना? याकडे जरा गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
मासिक पाळी येऊ नये, यासाठी मुलींना गरोदर राहण्याची जबरदस्ती करणारे जगाच्या पाठीवर खरंच कुठे असतील, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे प्रत्यक्षात घडले ते आफ्रिकेतील मोरोक्को देशात. मोरोक्कोमध्ये दि. ८ सप्टेंबर रोजी भयंकर नैसर्गिक आपत्ती ओढवली.
महाराष्ट्र शासनाच्या चंद्रपूर फॉरेस्ट अकादमीमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 'चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन – डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट' अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून चंद्रपूर फॉरेस्ट अकादमीने कंत्राटी पध्दतीने अभ्यासक्रम संचालक आणि विषयतज्ज्ञ (मॅटर एक्सपर्ट) पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ते टी एच कटारिया मार्ग परिसरामध्ये माटुंगा लेबर कॅम्प ते माटुंगा वेस्टर्न रेल्वे (तरंगता पूल) शाहूनगर बीट क्र.३, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बहुतेक विद्युत खांबातील लाईटी बंद पडलेली आहे. गेल्या अनेक दिवसपासून विद्युत खांबामधील लाईटचं गायब आहे.वारंवार पालिका व बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील अद्यापही काही कारवाई झालेली नसल्याचे स्थानिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका विषयक वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करीत विविध विषयांवर संवाद साधला.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून लोकलच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आला असून यापूर्वी पहाटे ५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून सुटणारी पहिली जलद लोकल गुरुवार दिनांक १० ऑगस्ट पासून पहाटे ४.३५ वाजता सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ४.१९ वाजता पहिली कसारा लोकल सुटते. मात्र पहिली जलद लोकल ही कल्याणकरिता पहाटे ५.२० वाजता सुटते. परंतु ही वातानुकूलित अर्थात एसी लोकल असल्यामुळे प्रवाशांना ५.४६ च्या कर्जत जलद लोकलसाठी थांबावे लागत होते.
स्पेनलगतच्या समुद्रात जानेवारी ते जून यादरम्यान किती लोक मृत्युमुखी पडले, याचा नुकताच एक अहवाल जाहीर झाला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये स्पेनमध्ये जाता-जाता ९५१ लोक मृत्युमुखी पडले, त्यात ४९ बालकांचाही समावेश आहे. हे लोक समुद्रामार्गे बोटीने स्पेनमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. मात्र, स्पेनमध्ये जाण्यापूर्वी वाटेतच त्यांचे जहाज समुद्रात बुडाले किंवा फुटले किंवा आणखी कोणत्यातरी कारणाने हे लोक मृत्युमुखी पडले. कॅनरी आईसलॅण्ड मार्ग, अलबोरन समुद्री मार्ग, अल्जेरीयन रूट, जिब्राल्टर मार्ग या चार मार्गा
वेळ पडली तेव्हा आईचे दागिने गहाण ठेवले. काठीने सराव केला. तिने तलवारबाजी हा खेळ घरोघरी पोहोचवला. जाणून घेऊया भारताची पहिली आंतरराष्ट्रीय तलवारपटू भवानी देवीविषयी...
मुंबई : मागच्या वर्षी बेस्ट प्रशासनाने २१०० सिंगल डेकर बसचा करार टाटा मोटर्सने घेतलेल्या आक्षेपामूळे रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य ठरवल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा आणि इव्हे ट्रान्सच्या इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने ई-बसेसची संख्या वेगाने वाढेल.
पुणे : महानगरपालिकेने पुणे शहरामध्ये आठवड्यामधून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. दर गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असून अल निनोच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. येत्या १८ मे पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे.