देशाची सर्वांगीण प्रगती साधण्याकरिता त्या-त्या देशात ब्रह्मशक्ती आणि क्षत्रशक्ती यांचा समन्वय असणे अत्यंत मोलाचे आहे. कारण, राष्ट्राचे अस्तित्व सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर तेथील व्यवस्था या दोन्ही तत्त्वांनी संयुक्तिक असाव्यात.
Read More
सध्याच्या भौतिकव्यवस्थेत सारे जग बाह्य झगमगाटात वावरत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचे सर्वांचे प्रयत्न केवळ शारीरिक भरण-पोषण, गृहसजावट आणि सांसारिक सुविधा वाढविण्याच्या कामी खर्च होत आहेत. आत्मशक्ती व ब्रह्मशक्ती या दोन चैतन्यतत्त्वांच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. म्हणूनच वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे केवळ बाह्य भौतिक सुविधांमध्ये न गुरफटता शाश्वत सुख व आनंदासाठी प्रयत्न करावयास हवेत.