समाजजीवनाच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दत्तोपंतांनी स्थापन केलेल्या संस्था आज प्रतिष्ठाप्राप्त आणि एकूण धोरणांना इष्ट वळण देण्याची क्षमता असलेल्या संघटना या नात्याने सुप्रतिष्ठित झाल्या आहेत. ‘दाही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने, या भूमीचा स्वर्ग करू’ अशी अत्यंत उदात्त विश्वासक प्रेरणा हे दत्तोपंत ठेंगडी यांच्या सार्थक जीवनाचे शाश्वत सार आहे.
Read More