लोणचे हा जेवणातील सर्वांचाच आवडता प्रकार. त्यात जेवढे लोणचे मुरलेले तेवढेच ते चवीला छान लागते. याच लोणच्याचं इंग्रजी नावाचा आधार असलेला एक खेळ भारतामध्ये पाय रोऊ पाहतो आहे. पिकलबॉल या खेळाचा प्रवास भारतात सुरु झाला असून,त्याचा प्रसार वेगाने होतो आहे. या खेळाच्या इतिहासाचा हा आढावा...
Read More
भारतात असलेल्या प्रतिभेच्या तुलनेत पूर्वी क्रीडाक्षेत्र काहीसे मागेच होते. मात्र, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून शालेय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भारतामधील प्रतिभा दिसून येत आहे. ‘खेलो इंडिया’मुळे देशातील युवा प्रतिभेला चालना मिळत आहे. ‘खेलो इंडिया’च्या यशाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांचे मनोगत...
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनावर क्रीडा विश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
क्रीडा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांना आवश्यक त्या चांगल्या सुविधा द्याव्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, २७ जानेवारी रोजी दिल्या.
‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ व कल्याण-डोंबिवली ( Dombivli Village ) महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पू) येथे आज शुक्रवार, दि. १७ जानेवारी ते रविवार दि. २६ जानेवारी या कालावधीमध्ये पुस्तक आदान-प्रदान सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने डोंबिवलीच्या वाचनसंस्कृतीचा आढावा घेणारा श्रीकांत पावगी यांचा हा लेख...
क्रीडाविश्व ( Sports world ) आणि खेळाडूंचे आयुष्य हे कायमच सामान्य जनांसाठी एक विशेष आकर्षण असते. जगात मात्र अनेक ठिकाणी या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान पायाभूत सुविधांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्वांवर मात करून, जो खेळासाठी आयुष्य वेचतो त्याला काहीच कमी पडत नाही, खेळाडूंच्या जीवनातील घडामोडींचा घेतलेला आढावा...
देशात क्रीडा क्षेत्र नवनवीन उंची गाठत आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यामागे देशांतर्गत स्पर्धांचा वाढलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. अशीच एक उत्तम दर्जा असलेली वनवासी क्रीडा महोत्सव ( Vanvasi krida mahotsav ) स्पर्धा छत्तीसगढमध्ये पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
मावळत्या २०२४ या वर्षात भारताने ( Sports ) बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यात यश मिळविले. पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक, पॅरा-ऑलिम्पिक यांसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये दणदणीत यश संपादित करत पदकांची लयलूट केली. तब्बल १७ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक टीम इंडियाला जिंकता आला. दुसरीकडे, ‘फ्रेंच ओपन’चा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालची टेनिसमधली निवृत्ती टेनिसप्रेमींच्या स्मरणात राहील. एकूणातच जगातील सर्वात युवा जगज्जेता ग्रँडमास्टर डी. गुकेशच्या अतुलनीय कामगिरीसह सरत्या वर्
भारतीय क्रीडा क्षेत्र यशाच्या उंचच उंच भरारी घेत आहे. भारतीय खेळाडू लहान वयोगटातील असो अथवा मोठ्या गटामध्ये बसणारा असो तो जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरताना दिसत आहे. ही जिद्द जशी लहान मोठ्यांमध्ये सारखीच दिसते,तशीच ती स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येही एक सारखीच दिसत आहे. त्यामुळेच भारतीय महिला आणि पुरुष खेळाडू विजेतेपदाला गवसणी घालत आहेत. याच विजेतेपदांच्या मालिकेतील काही आनंदमयी क्षणांचा घेतलेला आढावा...
आपल्या २५०व्या वर्धापनदिनानिमित्त, माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड(MDL)ने दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी माझडॉक मुंबई १०K चॅलेंजच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुंबईकरांनी सहभाग नोंदविला. या आयोजनातून एमडीएलच्या जहाजबांधणीतील २५० वर्षांच्या उत्कृष्टतेवर प्रकाश टाकण्यासोबतच नावीन्य, गुणवत्ता आणि राष्ट्रीय विकासासाठी कंपनीची सतत असलेली वचनबद्धता दर्शविण्यात आला.
देशात सध्या क्रीडा क्षेत्राला सोन्याचे दिवस आले आहेत. खेळाकडे करिअर म्हणून बघणार्या युवकांची संख्या देशात वाढते आहे. यासाठी अनेक राज्य सरकारे पुढाकार घेत आहेत. खेळासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीपासून खेळाडूंना प्रत्येक पावलावर सहकार्य मिळत आहे. या सगळ्यात हॉकीचे स्थान विशेषच. या खेळाच्या वाढत्या प्रसाराचा घेतलेला हा आढावा...
गेले काही दिवस देशात चर्चा सुरु आहे ती, निकालाचीच. निवडणुकीचा निकाल काय लागणार, अशी चर्चा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुरु असताना, बिहारमध्ये आशियाई महिला चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता टीपेला पोहोचली आहे. बिहारमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
भारतीय खेळाडू आणि त्यांचे आयुष्य हा कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. कामाच्या व्यापातूनच सर्व चाहते आवडत्या खेळाडू विषयीच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. अशाच काही घटना, भारतीय महिला खेळाडूंच्या बाबतीत दिवाळीच्या आसपास घडल्या. या घटनांचा य लेखात घेतलेला धांडोळा...
निवृत्ती ही मनाला चटकाच लावणारी असते. भारताच्या दोन सुकन्यांनी देखील निवृत्ती जाहीर केली आहे. दीपा करमाकर आणि राणी रामपाल यांनी निवृत्ती जाहीर केली असली, तरी खेळाप्रतीची समर्पण भावना संपवलेली नाही. म्हणूनच त्या आता देशाचे क्रीडा भविष्य घडवण्याकडे जातीने लक्ष देणार आहेत. या दोन्ही कन्यांच्या क्रीडा कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा...
अभिषेक मेरुरकर दिग्दर्शित क्राईम थ्रिलर चित्रपट लाईक आणि सबस्क्राईब १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एक मर्डर मिस्ट्री फलगडणार असून अमेय वाघ, अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने अमृता खानविलकरशी झालेली बातचीत नक्की पाहा...
जत्रेतल्या झुंजी आणि त्यातला इरेसरीने बोली लावून खेळला जाणारा जुगार यांची एक नशा असायची. पण, त्यांच्यावर बंदी आली. मृत्यूगोलाचा थरार तसा अजून टिकून आहे. पण, काहीतरी नवीन पाहिजे, यार! मग अमेरिकने शोधून काढलाय झुंजीच्या खेळाचा नवीन प्रकार-मोटार झुंज!
(Dharavi)धारावीतील क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या 'धारावी प्रीमियर लीग' (DPL) च्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात झाली. 'धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या लीगमध्ये धारावीतील स्थानिक खेळाडूंचे एकूण १४ संघ सामील होणार आहेत. धारावीतील 'डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'च्या मैदानावर हे सामने रंगतील. विजेत्या संघाचे पुढील सामने शनिवारी खेळवले जाणार असून अंतिम विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि १ लाख रुपयांच
भारताचा पॅरा ऑलिम्पिक संघ घवघवीत यश घेऊन परतला आहे. सध्या बुद्धीबळ आणि मुष्टीयुद्धाचे आंतराष्ट्रीय स्पर्धांचे वारे वाहत आहेत. तसेच या दोन्ही खेळांच्या एकत्रीकरणातून चेसबॉक्सिंग नावाचा नवीन क्रीडाप्रकार आला असून, भारताची स्नेहा वायकर त्यात अव्वल आहे. स्पर्धा ते राजकारण अशा क्रीडाक्षेत्राशी निगडीत घटनांचा घेतलेला हा आढावा..
Retired Sports Players 2024 काही खेळाडू त्यांच्या खेळाने क्रीडारसिकांना असे मोहित करतात की, त्यांची कारकीर्द संपूच नये असे वाटते. तर काही खेळाडू क्रीडाविश्वात उगवतात आणि निवृत्तही होतात. गेल्या काही दिवसांत असेच अनेक भारतीय खेळाडू निवृत्त झाले. या प्रत्येकानाचे भारतीय क्रीडारसिकांचे मनोरजंन केले. त्या खेळाडूंच्या निवृत्तीचा घेतलेला हा आढावा...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोराडी तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पार पडले. कोराडी तालुका क्रीडा संकुल हे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बरोबरीचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर मान्यवर उपस्थित होते.
चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील सर्वात मोठा 'योगा ऑन स्ट्रीट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ३ हजार योग साधक दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी चारकोप मार्केट, कांदिवली (पश्चिम) मुंबई येथे सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या भव्य-दिव्य अशा 'योगा ऑन स्ट्रीट' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चारकोप कल्चरल अॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी केले आहे.
अभिनेता अजय देवगण याचे सध्या चांगले चित्रपट येत नाहीत असंच काहीसं चित्र दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालेला ‘मैदान’ हा चित्रपट त्यापैकीच एक, कथानक, विषय चांगला असूनही अजयचा ‘मैदान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जागा निर्माण करु शकला नाही. त्यामुळे आता ओटीटीवर तरी आपलं नशीब आजमावण्याच्या दृष्टीने हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असून सोबत एक मोठा ट्विस्ट देखील असणार आहे.
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासह पर्यावरण आणि क्रीडासंस्कृती या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील ‘न्यास’ या संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.
चांगले खेळाडू घडवित असतानाच त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी लढणारे क्रीडाशिक्षक लक्ष्मण इंगळे त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
मुंबईतील प्रस्तारारोहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गोरेगाव पूर्व येथील नंदादीप शाळेच्या प्रांगणातील 'अरुण सामंत क्लाइबिंग वॉल' पुन्हा सुरू होणार आहे. डोंगरात आढळणाऱ्या कडे-कपाऱ्यांची हुबेहूब प्रतिकृति या भिंतीवर साकारण्यात आली आहे. त्यासाठी फेरो-सिमेंट या विशेष तंत्राचा वापर केला आहे.
शिवकालीन खेळांचा वारसा, आपली संस्कृती जपण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी सदर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये येत्या ११ फेब्रुवारी पासून १३ फेब्रुवारी पर्यंत २ लक्षणीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
२०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प घेऊन काम करणार्या मोदी सरकारने भारताचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा सातासमुद्रापार नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे, त्यांचे महत्त्व जगाला समजावून सांगत, त्याची महतीही पटवून दिली. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे योग. नुकतेच सौदी अरेबियातील मक्का येथे दुसर्या ’सौदी ओपन योगासन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मानवी विचार, कृती यांचा विषामृताचा खेळ आणि या खेळातील खेळाडू ओळखण्याचे कौशल्य आयुष्यात जितके लवकर आत्मसात करता येईल, तितकेच आयुष्य सुकर ठरेल.
लुप्त होत चाललेल्या शिवकालीन खेळांचा वारसा, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी कौशल्य विकास मंगलप्रभात लोढा यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे' आयोजन केले आहे. शुक्रवारी वरळीतील जांभोरी मैदानावर राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन पार पडले. यावेळी मंत्री लोढांनी माध्यमांशी संवाद साधला.
भारतातील राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, अध्यात्म वगैरे जवळपास सर्व क्षेत्रांतील सर्वोच्च व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच सोहळ्यात एकत्र आल्याचे उदाहरण भारताच्या इतिहासात नाही. पण, सोमवारी अयोध्येत झालेल्या प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ही गोष्ट प्रत्यक्षात घडली. भारताच्या सर्व भागांतील आणि सर्व क्षेत्रांतील दिग्गज नेते आणि कलाकार या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले होते, हीच प्रभू रामांची ताकद आणि प्रभाव...
आपल्या कला, आपला निसर्ग वगैरे आठवलं की, त्याला जोडूनच असलेल्या क्रीडेला आपण वेगळे करू शकत नाही. आपण क्रीडा क्षेत्र हे ‘वसुंधरा’अंतर्गत असलेल्या घटकांचा कसा चपखल वापर करून, आपले दायित्व प्रदान करते, ते बघण्याचा या लेखाच्या दोन भागांत क्रमशः प्रयत्न करू. ‘शुभंकर’ अर्थात ‘मॅस्कॉट’ हे सगळ्याच क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. तेव्हा क्रीडा क्षेत्रातील अशाच काही शुभंकरांविषयी...
महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन लक्ष्यवेध' योजनेची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची आता पूर्तता झाली असून, महायुती सरकारने 'मिशन लक्ष्यवेध' योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६० कोटी ४६ लाखांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आयकर विभाग अंतर्गत भरती केली जाणार आहे. आयकर विभागातील रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण २९१ रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीबाबत सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला जरूर भेट द्या. तसेच, या भरतीच्या माध्यमातून स्पोर्ट्सच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनीगोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर, सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.
पंजाबमधील पटियाला येथे नुकतेच संपन्न झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.
“देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे. तसेच,पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ’छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे,”असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
भारतात सध्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरु असताना पाकिस्तानच्या एका क्रीडा पत्रकाराची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. झैनाब अब्बास असे या पाकीस्तानी क्रिडा पत्रकाराचे नाव आहे. ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
रेल्वे रिक्रूटमेंट सेल (आरआरसी) अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर भरती ही स्पोर्टस् कोटाद्वारे होणार आहे. दरम्यान, २०२३-२४ या वर्षासाठी मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील क्रीडा कोट्यातील भरतीसाठी इच्छुक अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्जदार त्यांचे अर्ज मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर सबमिट करू शकतात.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने नेमबाजीत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान या भारतीय महिला नेमबाजी चमूने २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत सांघिक कामगिरी केली.
'एअर फोर्स स्पोर्टस कंट्रोल बोर्ड'अंतर्गत खेळाडूंची भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ०२/२०२३ च्या प्रवेशासाठी अग्निवीर वायू 'क्रीडा' या कोट्यातून भारतीय वायुसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्कृष्ट पुरुष क्रीडापटूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन, विविध देशांतले क्रीडा दिन, आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी झालेले सामने, अशा क्रीडा क्षेत्रातील ऑगस्ट २०२३ अखेर व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारा, हा माहितीपूर्ण लेख...
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील १० खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रातील मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले, ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हा
पाकिस्तानची क्रिकेटर आयशा नसीमने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती इस्लामनुसार आपले जीवन जगणार असल्याचे तिने सांगितले. आयशा नसीमचे वय अवघे १९ वर्ष आहे. तिने आपल्या निवृत्तीची माहिती 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड'ला दिली आहे.
राज्य शासनाकडून दिला जाणार्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’ची घोषणा १४ जुलै रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्राकडे समाजाचा बदललेला दृष्टिकोन आणि क्रीडा पुरस्कारार्थींची थोडक्यात ओळख करुन देणारा हा लेख...
क्रिकेटर, उत्तम प्रशासक आणि क्रीडा पत्रकार असे त्रिगुणसंपन्न क्रीडा भक्त प्रल्हाद नाखवा या ठाणेकर भूमिपुत्राविषयी....
‘मन की बात’हा कार्यक्रम म्हणजे, या खेळाडूंनी देशासाठी क्रीडाविषयक आघाडीवर केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा मंच ठरला आहे आणि आता दि. ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर होत असताना, गेल्या तीन वर्षांत, या कार्यक्रमाच्या सर्व भागांनी देशातील खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी प्रेरित करण्याचे कसे कार्य केले आहे, याचा आढावा भारतातील क्रीडाविश्वासाठी सध्या अत्यंत उत्साहवर्धक म्हणावा लागेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून जनसेवा न्यासाची स्थापना १९९७ मध्ये झाली. प्रामुख्याने समाजातील दुर्बल आणि गरजू मुलांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबन आणि प्रशिक्षण देण्याच्या हेतूने अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. नावातच लोकसेवेचा संकेत असलेले जनसेवा न्यास हे पुण्यातील नागरी परिसरात असलेल्या वंचितांच्या सेवेसाठी तत्पर असलेले संघटन आहे. अण्णा वाळिंबे आणि अतुल लिमये यांच्या पुढाकारात सुरु झालेले हे सेवाकार्य आता त्या भागातील वंचित कुटुंबात सकारात्मकतेची भावना निर्माण करते आहे.
महाराष्ट्राच्या मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचे सोमवार, दि. ६ मार्च रोजी निधन झाले. मुंबईतील अंधेरीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वि. वि. करमरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये, तर अर्थशास्त्रात एम.ए.चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले.
मोदी सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे आणि आपल्या देशाच्या वाढत्या विकासात्मक गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. भारताच्या परंपरा आणि मूल्यप्रणालींवर उभारणी करताना ‘एसडीजी ४’ सह, एकविसाव्या शतकातील शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी संरेखित एक नवीन प्रणाली तयार करण्यासाठी, नियमन आणि प्रशासनासह शैक्षणिक संरचनेच्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा करण्याचा नवीन शिक्षण धोरणाचा प्रयत्न आहे.
ठाणे जिल्ह्यात खेळाचा दर्जा प्राप्त झालेली पहिली महापालिका म्हणून कल्याण-डोंबिवलीचे नाव घेतले जाते. यासाठी योगदान देणारे आणि खेळाडूंच्या हक्कांसाठी लढणारे लक्ष्मण इंगळे यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा...