Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन
Read More
दिग्दर्शक अनुराग कश्यप त्यांच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे कायम चर्चेत असतात. कश्यप यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय चित्रपटांमधून अनेक कलाकारांना चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. काही काळानंतर स्वत:च अभिनयाची सुरुवात करत त्यांनी अनेक कलाकारांना मागे टाकलं. मात्र, सध्या चित्रपटसृष्टीची अवस्था पाहता कश्यप यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आता थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाठली आहे. एकीकडे धर्मवीर २ ची तयारी प्रवीण तरडे करत असून दुसरीकडे ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य चित्रपटात ते विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांनी सध्या प्रेक्षकांना भलतीच भूरळ घातली आहे. २०२४ मधील प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस आलेला चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman). अभिनेता तेजा सज्जा (Teja Sajja) याची प्रमुख भूमिका असलेला हा 'हनुमान' (Hanuman) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शिवाय जिओ आणि झी५ या ओटीटी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असूनही तिथेही या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहेत. आता आणखी एका ओटीटी वाहिनीवर हनुमान चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांचा आवडता अभिनेता तर आहेच. एकीकडे 'थेरी', 'मास्टर', 'बीस्ट', 'वरिसू', 'खुशी', 'लिओ' अशा दर्जेदार चित्रपटांच काम करत असलेल्या विजय यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. थलपती विजयच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल गेले काही दिवस चर्चा सुरु होत्याच. आता या चर्चा सत्य झाल्या असून त्यांनी आपल्या राजकीय पक्षाची देखील घोषणा केली आहे. 'तमिलेगा वेट्ट्ररी कझागम' असे थलपती विजयच्या राजकीय पक्षाचे नाव आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प दि.३१ फेब्रुवारी रोजी मांडला. यावेळी अपेक्षेप्रमाणेच लोकप्रिय घोषणा टाळण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षात देशात झालेल्या आर्थिक परिपर्तनाचा लेखाजोखा अर्थसंकल्पात बघावयास मिळतो.पंरतु अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी केंद्रावर दक्षिण भारतीय राज्यांना निधी न दिल्याचा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. याच क्रमाने पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणजेच दि. १९ जानेवारीला तामिळनाडूला भेट देणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चार दिवसांत पंतप्रधान मोदी तिसर्या दक्षिणेकडील राज्याचा दौरा करणार आहेत.
मदुराई येथे एका रेल्वेच्या बोगीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. या आगीत संपूर्ण बोगी पूर्णतः जळून खाक झाली. लखनौ-कन्याकुमारी असा दक्षिण भारताचा प्रवास करणाऱ्या एका रेल्वेच्या टूरिस्ट बोगीला ही आग लागली असून घटना घडली तेव्हा मदुराई रेल्वे स्थानकातच उभी होती.
जानेवारी महिन्यात चहाचे उत्पादन १४३.१२ मिलियन हून १३७.८५ मिलियन पर्यंत खालावले आहे.टी बोर्ड प्रोव्हीजनल डेटा नुसार,चहाच्या उत्पादनात जून २३ मध्ये ३.७ टक्क्याने खालावले आहे.
देशविदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने धार्मिक पर्यटनाला विविध माध्यमातून चालनाही दिली. त्यानिमित्ताने या मंदिरांचे महत्त्व, तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास आणि अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण याचा आढावा घेणारा हा लेख...
आपल्या विश्वासू सहकार्यांना सोडून जाणे, हा नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यातील समान गुण आहे. अशा समान गुणधर्मींना एकत्र घेऊन ‘नितीश कुमार बिहाने चले पालकी सजाई के!’ राहुल गांधी यांच्या यात्रेचे शीर्षक आहे, ‘भारत जोडो.’ रस्त्यावरील माणूस विचारतो, “भारत कब बिखरा हुआ था?” भारत म्हणजे ‘फेविकॉल’चा जोड आहे. त्याला तुम्ही जोडणारे कोण? खरं म्हणजे तुम्हाला ‘काँग्रेस जोडो’ यात्रा काढायला पाहिजे.
तेलंगणमध्ये केसीआर यांना धक्का देण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीद्वारे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशात सुनील देवधर यांच्याद्वारे जगनमोहन रेड्डी, तर तामिळनाडूमध्ये प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या नेतृत्वाद्वारे एकाचवेळी द्रमुक व अण्णाद्रमुकला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे.
राजकीय नेत्यांचा उदो उदो करण्याचे दक्षिणेतील पेव ठाण्यातही आले असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचे रूप देण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बाहुबलीच्या रूपात उभारली आहे.
एकट्या उत्तर प्रदेशातून तब्बल ८० खासदार लोकसभेत जातात. एखादा राजकीय पक्ष फक्त उत्तर भारत व भारताच्या इतर भागातून २७२ खासदार निवडून आणून केंद्रातील सत्ता हस्तगत करू शकतो, असे झाल्यास दक्षिण भारतातील राज्यांना सत्तेत वाटा मिळणार नाही. पण राज्यसभा हे दुसरे सभागृह असल्यामुळे या राज्यांच्या हितसंबंधांचे रक्षण राज्यसभेतील खासदार करू शकतील. राज्यसभेचा हा व्यावहारिक उपयोग आहे.
देवी मैसम्माची पूजा प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते. या व्यतिरिक्त, महाराष्ट्रातही तिची 'मेसाई' आणि 'मेस्को' या नावाने पूजा केली जाते. तिच्याकडे चेचक सारख्या संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. हैदराबादच्या 'टाकी बंड'मध्ये स्थित 'कट्टा मैसम्मी' मंदिर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. याबद्दल एक आख्यायिका आहे की, अगदी निजामाने १९०८मध्ये या मंदिरासमोर डोके टेकवले होते. यानंतरच पूर नियंत्रणात आला.
भविष्यात राजकारणात येण्याची इच्छा नाही असे विधान अभिनेता रजनीकांत यांनी केले
अभिनेता धनुषच्या आगामी चित्रपटाची सोशल मिडियावर होतेय चर्चा
राहुल गांधी यांना आता दक्षिण भारतातून राजकारण करायला आवडते, म्हणजेच १५ वर्षे राहुल गांधी त्यांच्या मनाविरुद्ध अमेठीतून निवडून जात होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पणजोबा, आजोबा, आजी, वडील, काकासुद्धा उत्तर भारतातून निवडून जात होते आणि त्यांची आई सोनिया गांधी यादेखील रायबरेलीतून दीर्घकाळपासून खासदार आहेत. त्यामुळे ही सर्व मंडळीदेखील वरवरचे राजकारण करूनच राजकारणात सत्तापदांपर्यंत पोहोचले, असेच राहुल गांधींना म्हणायचे असावे.
दक्षिण भारतातल्या केशवानंद भारती या नावाच्या एका मठाधिपतींचं नुकतेच मंगळुरू येथे निधन झालं. त्यानिमित्ताने त्यांच्याच नावाने परिचित असणाऱ्या केशवानंद भारती खटल्याची थोडक्यात माहिती करुन देणारा हा लेख...
दक्षिण तटीय आंध्र प्रदेश, रायालसीमा, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, किनारपट्टी व दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.
मुंबईत वादळी मेघगर्जनेसह, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरवरील वेस्टर्न डिस्टर्न्स पूर्व दिशेने सरकत आहे.
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'कबीर सिंह' हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये शाहिद कपूर मध्यवर्ती भूमिकेत दाखवण्यात आले
दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा
अनंतकुमार यांच्यासारख्या नेत्याचे निधन भाजपसाठी, त्यातही कर्नाटकसाठी एक पोकळी निर्माण करणारे आहे. आज दक्षिणेत भाजपजवळ मोठा चेहरा नाही. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाले आहेत. केरळ, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू येथे भाजपजवळ जननेता नाही. सतत सहावेळा लोकसभेवर निवडून येणारा एकमेव चेहरा म्हणजे अनंतकुमार होते. त्यांची उणीव भाजपला सतत जाणवत राहिल.
पालघरमधील प्रचारावेळी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला चर्चमध्ये घेऊन जात पाद्र्यांच्या-मिशनर्यांच्या झग्यांशी इमान राखण्याच्या शपथा दिल्या.