आचार्य म्हणजे शुद्ध आचरणाने परिपूर्ण असलेले दिव्योत्तम व्यक्तिमत्व अशा आचार्यांची प्रत्येक कृती व त्याचे सदाचारसंपन्न जीवन हे ब्रह्मचार्यांसाठी आदर्शांचा प्रेरक दीपस्तंभ असतो. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना ‘ब्रह्मचारी’ नावाने संबोधतात, ‘विद्यार्थी’ म्हणून नव्हे. कारण, विद्यार्थी म्हणजे केवळ विद्येला ग्रहण करणारा! पण, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरति- नेहमी ब्रह्मतत्वात विचरण करणारा!
Read More
उपनयन संस्कारामागचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे बालक-बालिकांचा सर्वांगीस विकास साधून त्यांच्या माध्यमाने राष्ट्राला व एकूणच समग्र विश्वाला ब्रह्म, क्षत्र आणि वैश्य वृत्तीने परिपूर्ण अशा सुप्रजेची प्राप्ती! कारण, त्यामुळेच कुटुंब, समाज, देश व जगाची चौफेर प्रगती साधण्याचे सत्कार्य घडणार आहे.
आश्रमात गेल्यावर आचार्य सर्वप्रथम त्या बटूंचा पहिल्यांदा हा उपनयन संस्कार संपन्न करतो. घराच्या बाहेर आचार्यगृही म्हणजेच गुरुकुलात होणारा हा पहिलाच संस्कार.
मागील लेखात आपण चूडाकर्म संस्काराचे महत्त्व आणि त्याच्या स्वरूपावर विस्तृत प्रकाश टाकला होता. आज या लेखात या संस्काराच्या विधीच्या संदर्भात विवेचन करूया.
सहाव्या महिन्यांत बाळाचा ‘अन्नप्राशनम’ हा सातवा संस्कार करण्यात यावा. यावेळी शक्य वाटत नसेल, तर बाळाच्या शारीरिक कुवतीप्रमाणे जेव्हा तो अन्न पचवण्यास समर्थ होईल, त्यावेळी (त्यादिवशी) देखील हा संस्कार करू शकतो.
आता वेळ येते ती बाळाचे नाव ठेवण्याची. बाळाच्या माता-पित्यांनी अथवा निकटच्या नातेवाईकांनी बाळाचे नाव अगोदरच निश्चित करून ठेवावे. यानंतर हा बाळ एका विशेष संज्ञेने ओळखला जाणार आहे. आज ठेवण्यात येणारे नाव हे त्या बाळास अजरामर करेल, असे नाव ठेवण्यात यावे की त्याच्या नावाचा उद्घोष केल्याबरोबर त्या बाळाला जीवनभर नाम-अर्थाचा बोध होत राहावा व इतरांनाही प्रेरणा मिळत राहील. यादृष्टीने नाममहात्म्य मोलाचे आहे.