(Election Commission of India) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदानाबाबतचे गैरसमज दूर केले आहेत. काँग्रेस पक्षाला दिलेल्या सविस्तर प्रतिसादात आयोगाने मतदारांची नोंदणी अथवा नावे हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
Read More
(Sanjay Raut) कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय मंत्री आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीच्या काही दिवस अगोदर उबाठाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे राजकीय वर्तुळात चर्चेत राहण्यासाठी भाषेची मर्यादा सोडून बोलताना ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० बाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यापाऱ्यांना चोर म्हणत ते खोटं बोलून ग्राहकांना फसवतात आण
(MNS Manifesto) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील पक्ष प्रचारसभा, दौरे, जाहीरनामे प्रसिध्दी या सगळ्यांमध्ये व्यस्त आहेत. आजमितीस महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या शीर्षकाने हा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत
(Raj Thackeray) विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून आपला विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे हा कार्यक्रम पार पडला.
(Devendra Fadnavis)अमित ठाकरेंना पाठिंबा देणे, आता शक्य नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर, उबाठाचे महेश सावंत तर मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने माहीममध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
(Anil Deshmukh) “राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केले,” असा गौप्यस्फोट माजी न्या. के. यू. चांदिवाल यांनी केला आहे. अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणामध्ये न्या. चांदिवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले. त्यात अनिल देशमुखांना आयोगाने ‘क्लिनचीट’ दिली नसल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.
(Devendra Fadnavis) “आपली जी महायुती आहे, ती गती आणि प्रगतीची आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे,” अशा शब्दात महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पेण येथे स्पष्ट केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने काम करीत आहे. या सरकारला साथ देत महायुतीचे उमेदवार आ. रविशेठ पाटील यांना निवडून द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.
(CM Eknath Shinde) “महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, “या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहाता महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
(Kalidas Kolambkar) १९९० ते २०१९ अशा आठ विधानसभा निवडणुकीत सलग निवडून येण्याचा विक्रम आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नावावर आहे. ते नवव्यांदा निवडून आले, तर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल. वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळालेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला हा संवाद.
(Pravin Darekar) लाडक्या बहिणींची योजना बंद करू इच्छिणाऱ्या नाना पटोलेंना मतदान करणार का? असा जाहीर सवाल भाजप विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला. साकोली विधानसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांच्या प्रचारानिमित्त तेथील जाहीर सभेत प्रविण दरेकर बोलत होते.
( Mumbai's Dabbawalas )काही तथाकथित डबेवाला संघटनांचे पदाधिकारी हे मुंबईच्या डबेवाल्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असल्याचे गैरसमज पसरवत असले तरी डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला असल्याचे, उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी स्पष्ट केले. महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे देण्यासह जी कामे केली ती पाहता हा पाठिंबा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
( Amit Shah )"मुंबईकरांनो, हा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एकेक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून बाहेर काढण्याचे काम भाजप करणार आहे." अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी बोरीवलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत केली आहे.
(Amit Shah) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. कलम ३७० हटवण्यावरून प्रश्न विचारत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
(Sharmila Thackeray) ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गोकुळनगर भागात आयोजित केलेल्या प्रचारसभेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी शर्मिला ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .
(AIUB )महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या नवनवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र' या मुस्लीम संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाठा यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला भरघोस मतदान क
( Prakash Ambedkar )सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लीम बांधवांना जर ५% आरक्षण लागू करून घ्यायचे असेल तर, गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही, असे म्हणत मतदानाचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एक्स या सोशल मीडिया अकांउटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केल्याचे दिसत आहे.
उन्नती : महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी उडाली आहे. त्यात महायुती आणि मविआ यांनी त्यांचे निवडणुकीसाठीचे जाहीरनामे प्रसिद्धही केले. राज्यकर्त्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा गुण म्हणजे, दूरदर्शीपणाच होय! याचे उत्तम उदाहरण म्हणजे, महायुतीच्या संकल्पपत्रात जाहीर करण्यात आलेला, राज्यात कौशल्य गणनेचा अंतर्भाव होय. एकीकडे राज्यातील तरुणांच्या हाताला काम नाही, अशी बोंब कायमच विरोधक मारत असतात. पण, याचे मुख्य कारण समजून घेण्यासाठी लागणारे सर्वेक्षण करण्याचे धाडस महायुतीने त्यांच्या संकल्पपत्रातून दाखवले आहे. आज
( Devendra Fadnavis )महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रचारसभांना जोरदार सुरुवात झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी नागपूर दक्षिण पश्चिम या स्वतःच्या मतदारसंघामधील जाहीरसभेत बोलताना मी एकटाच असा मुख्यमंत्री आहे ज्याचं घर मुंबईत नाही. आजही माझं घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असल्याचा गर्व आहे, असं म्हणत भावूक होत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
( Shivani Wadettiwar ) राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या ९ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने खेड्यापाड्यांपासून शहरांमधील गल्लीबोळापर्यंत प्रचारसभांचा धुरळा उडताना दिसत आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार सध्या चर्चेत आल्या आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान शिवानी यांनी शिवराळ भाषा वापरत वीज कर्मचाऱ्यांना थेट धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
( Akola ) महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. अशातच अनेक ठिकाणी प्रचार सभा सुद्धा जोमाने सुरू आहेत. अशातच महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रणांगणात उतरले आहेत. अकोल्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी, जनतेसमोर विजयाचा महासंकल्प मांडण्यासाठी मोदींनी सभा घेतली. भगवान राज राजेश्वर आणि संत गजानान महाराजांना वंदन करून मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.
( Congress )लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसने देशातील प्रत्येक राज्यातील महिलांना खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. महाराष्ट्रातदेखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी महिलांना फसवण्याचे काम करत आहे पण यावेळेस मविआच्या खोट्या आश्वासनांना, भूलथापांना महिला फसणार नाहीत.
( MahaVikas Aghadi ) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे १२ दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांसंदर्भात महाविकास आघाडीच्या महिलांविरोधी भूमिकेचा पर्दाफाश झाला आहे. म्हणूनच महिला मतदारांनी मतदान करताना या गोष्टी लक्षात ठेवून मतदान करावे, असे आवाहन महायुतीने केले आहे.
( Mumbai )महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाला असून येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २० नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गोरेगावमध्ये विद्या ठाकूर हॅट्रिक करणार? l Vidya Thakur l Goregaon Vidhansabha
( Parvati Assembly constituency ) राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अखेर संपली असून दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली होती. या वेळेपूर्वी अनेक उमेदवारांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मात्र पुण्यामधील एका उमेदवाराला ३ मिनिटे उशिर झाल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही.
( Trumpet Symbol ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 'ट्रम्पेट' या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरीत नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असेच ठेवले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे.
या वयात खोटे बोलू नये म्हणाले देवेंद्र फडणवीस. बाबा, अहो बाबा, ऐकताय ना? नका बोलू काही. आपण काही बोलतो आणि मग काही काळाने त्या म्हणण्याचे उत्तर व्याजासकट आपल्याला मिळते. मी पण म्हणाले होते, अकेला देवेंद्र क्या करेगा? त्यानंतर बघताय ना बाबा? क्या से क्या हुआ? तुमचा नवा पुतण्या आणि त्याचा उजवा की डावा हात सारखे म्हणायचे ते म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणूस.
( BJP Fourth Candidate List ) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने महाविकास आघाडी, महायुतीमधील घटक पक्ष आणि इतर पक्ष आपल्या उर्वरित जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. यादरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून या यादीत दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मीरा भाईंदर मतदारसंघ व नागपूर विभागातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
"लोकसभेला बोरिवली मतदारसंघ महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला, आता विधानसभेलाही मतदार महायुतीला कौल देतील आणि राज्यात महायुतीचीच आणायला मदत करतील" असा विश्वास भाजपचे मुंबई सरचिटणीस तथा बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगीनघाई सुरू असताना अनेकजण निवडणुक लढवण्यासाठी 'सोय'रिक करीत आहेत. शिवसेनेत (शिंदे गट) तर इनकमिंग जोरात आहे.
विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 जागांवरील महायुती आणि मविआचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. माघारी होईपर्यंत या उमेदवारांच्या मनात धाकधूक असली तरी, मविआमधील धुसफूस मात्र चव्हाट्यावर आल्याने जिल्ह्यात हसू होत आहे. शहरासोबतच जिल्ह्यातील काही जागांवर मविआच्या सर्वच घटक पक्षांनी दावा केला.
( Sindhudurg ) ग्रामपंचायतीची निवडणूक असो, वा विधानसभा किंवा लोकसभा. तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच! नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला,तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले. लोकसभेतील या विजयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहे. कणकवली आणि सावंतवाडीच्या जो
( Double Engine Government ) पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वदेश, स्वभुषा, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक असून सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
( Ravindra Chavan ) मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाकडून चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या २००९, २०१४ आणि २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास दर वेळेस रविंद्र चव्हाण यांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही ते विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास महायुतीच्या डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
(Mahayuti Sarkar) महाराष्ट्र राज्यात बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाकडून विधानसभा निवडणुक २०२४ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.