काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनेक तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महायुतीने धमाकेदार विजय मिळवला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची अवस्थादेखील काही वेगळी नाही. करवीर निवासिनी अंबाबाई जिथे वास्तव्य करते अशा कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सुनेचा अपमान कोल्हापूरवासियांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि थेट मतपेटीतूनच अद्दल घडवत मतदारांनी महाविकास आघडीला कोल्हापुरातून हद्दपार केलं.
‘दम नव्हता तर’सारखी भाषा वापरण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेत्यांना केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरीमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले आणि दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं," अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर आता चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना लवकरच अद्यावत आणि नवे मोबाईल फोन मिळतील , अशी ग्वाही महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दि. २९ जुलै रोजी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयांना दिलेल्या निर्देशांवर कार्यवाही सुरू आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन दिले जातील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. याबाबत सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. निकालाच्या सुरुवातीलाच महाडिक गटाने मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीत महाडिक गटानं विजय मिळवला आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. १ या मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले.
राज्यात शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करताना महिला बचत गटांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेत मिळण्यात ज्या अडचणी आहेत, त्या दूर केल्या जातील. या प्रकरणी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
दहशतवादी याकूब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्या अस्लम शेख आणि नवाब मलिक यांना झेड प्लस सुरक्षा देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये पण एकनाथ शिंदेंना जेव्हा नक्षलवाद्यांकडून जेव्हा मारण्याची धमकी दिली गेली होती, तेव्हा त्यांना मात्र झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली होती असा आरोप मनमाडचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे
आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या आघाडीवर आहेत. मात्र मतमोजणी सुरू असतानाच श्रीमती जाधव यांचे अभिनंदन करणारे फलक कसबा बावडा परिसरात झळकावण्यात आले आहेत.
जयश्री जाधव ११,१२९मतांनी आघाडीवर
राज्यातील सहा जागांसाठी विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आता स्पष्ट आहेत. कोल्हापूरच्या जागेवर शिक्कामोर्तब झाली आहे. भाजपच्या अमल महाडीक यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या सतेज पाटीलांची या जागी बिनविरोध निवड झाली आहे.