( India positive about bilateral trade deal with USA S. Jaishankar ) “भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी केले आहे.
Read More
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
S. Jaishankar भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. बांगलादेशला भारतासोबत असलेल्या संबंधांचा निर्णय घ्यावाच लागेल. रविवारी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी संबोधित केले. बांगलादेश सतत भारतविरोधी विधान करत आहे. तसेच अल्पसंख्यांकांवरही अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यावर एस. जयशंकर यांनी निषेध व्यक्त केला.
“लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राजकारणासाठी परराष्ट्र धोरणसंदर्भात खोटे दावे करतात. मात्र, त्यांच्या या दाव्यांमुळे परदेशात भारताची प्रतिमा मलीन होते”; असे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सुनावले आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांविरोधात ( Editorial on Illegal Immigrants In America ) कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्याच भूमीवरून त्याचे स्वागत केले आहे. त्याचवेळी अशा भारतीयांना देशाची दारे उघडी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण, भारताची घुसखोरीविरोधातील उक्ती आणि कृती सारखीच आहे...
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या शपथविधीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सोमवार, दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. शपथविधी आयोजन समितीने यासाठी भारताला निमंत्रण पाठवले आहे.
(Dr. S. Jaishankar) परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. २४ ते २९ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील नागरिकांसह अल्पसंख्याकांचे संरक्षण ( Protect Hindus ) करण्यासाठी जबाबदार आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी संसदेत केले आहे.
१९९० साली काँग्रेसने देशातील उद्योगांना कोणतेही संरक्षण न देता, आंधळेपणाने देशाच्या सीमा आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी खुल्या केल्या. जागतिकीकरणाने उद्योगाला चालना मिळून त्यातूनच अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी अपेक्षा असताना भारतात त्यासाठी कोणतेही ठोस धोरण नसल्याने केवळ आयात वाढलेली दिसून आली.
( Dr. S. Jaishankar ) कॅनडामध्ये जस्टीन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवाद्यांना ‘राजकीय आश्रय’ उपलब्ध करून देत आहे, अशी टिका परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी1 केली आहे.
( Dr. S. Jaishankar ) यशस्वी संस्थेतर्फे आयोजित "जागतिक स्तरावरील सध्याच्या उदयोन्मुख संधी" या विषयावर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, यांचा पुण्यातील प्रमुख नागरिकांशी वार्तालाप कार्यक्रम पार पडला.
S. Jaishankar परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) हे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी मुंबईतील २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा जर अशी घटना घडल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असे जयशंकर यांनी रविवारी सांगितले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मुंबई जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये. जिथे दहशतवादी हल्ला झाला आणि कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संयुक्त राष्ट्रसंघाची गरज यापूर्वीच वेळोवेळी अधोरेखित केली आहे. एकविसाव्या शतकातील आव्हानांना समर्थपणे तोंड देणारी नवी जागतिक व्यवस्था उभारणे ही आज काळाची गरज आहे. ज्या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली, ते हेतूच आज साध्य करण्यात संयुक्त राष्ट्रसंघ अपयशी ठरला आहे. धगधगता मध्य-पूर्व हा त्याचेच प्रतीक...
बांग्लादेशमध्ये अराजक माजल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आसियान बैठकीसाठी गुरुवार, दि. २५ जुलै २०२४ लाओसची राजधानी वियनतियाने येथे पोहोचले आहेत. यादरम्यान, ते म्हणाले की दक्षिण पूर्व राष्ट्रांच्या संघटनेशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते उत्सुक आहेत. जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या 'ॲक्ट ईस्ट पॉलिसी'ला १० वर्षे पूर्ण करत आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेत जम्मू – काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा चांगलेच सुनावले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.
कुवैतमधील मंगफ येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय लोकांचा समावेश असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिण मंगफमधील आग दुर्घटनेत मृत पावलेले भारतीय केरळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
डॉ. एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून मंगळवार, दि. ११ जून २०२४ पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताना एस. जयशंकर म्हणाले की, "आम्हा सर्वांना पूर्ण विश्वास आहे की हे आम्हाला 'विश्व बंधू' म्हणून स्थापित करेल, एक देश जो अतिशय अशांत जगात आहे, एक अतिशय विभाजित जग आहे, संघर्ष आणि तणावाच्या जगात आहे."
पाकव्याप्त काश्मिर भारताचे अंग आहे. मागच्या सरकारमधील लोकांच्या चुकीमुळे ते आपल्यातून काही काळासाठी गेले आहे. पण संसदेच्या सर्वसंमतीने ते निश्चित परत मिळवले जाईल, यात काही शंका घेण्याची गरज नाही, असा विश्वास केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरूवार, दि. 16 मे रोजी व्यक्त केला. नाशिकच्या कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉल येथे श्वास फाऊंडेशनतर्फे विश्वबंधू भारत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. जयशंकर यांची ज्येष्ठ विचारवंत व लेखक विजय चौथाईवाले आ
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुर्णपणे दहशतमुक्त आहे. एक दिवस पाकव्याप्त काश्मीरही आम्ही भारताला जोडू, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केला.
चीन-पाकिस्तानने बळकावलेले प्रदेश परत घेण्याबाबत भारताने विचार करावा की सद्दस्थिती स्वीकारावी या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भाष्य केले आहे. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चीनच्या धोक्याला कमी लेखण्याची चूक ही सद्दस्थितीस कारणीभूत आहे, असा आरोप अहमदाबाद येथे गुजरात चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात केला आहे.
पाच दिवसांचा रशिया दौरा आटपून, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. ४ ते ५ जानेवारीदरम्यान दोन दिवसांच्या नेपाळ दौर्यावर गेले. या दौर्यात त्यांनी नेपाळसोबतचे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच परराष्ट्र मंत्री नेपाळमधील चीनच्या प्रभावाला रोखण्यातसुद्धा यशस्वी झाले. नेपाळसोबत भारताचे ’रोटी-बेटी’चे नातं आहे. पण, डाव्यांची सत्ता आल्यापासून, नेपाळमध्ये चीनचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे सामारिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या, नेपाळमधील चिनी कुरापती बंद करणे, भारतासाठी क्रमप्राप्
लहान तोंडी मोठा घास घेतला की, तो घशात अडकणारच! मालदीवनेही आपल्या लहान तोंडात भारताला दुखावण्याचा असाच मोठा घास घेतला असून, त्यामुळे त्याच्या श्वासाला घरघर लागली आहे. केवळ पर्यटकांवर अवलंबून असलेल्या, या बेटसमूहाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर डबघाईला येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शत्रूला केवळ लष्करी हल्ल्यांनीच नामोहरम केले जाते असे नव्हे; कारण मोदी हे तर राजनैतिक डावपेचांनीही एखाद्या देशाला गुडघ्यावर आणू शकतात.
भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण खनिजे आणि व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा केली.दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेअंतर्गत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्याशी चर्चा केली.
कतारमध्ये अटकेत असलेल्या भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा दिलासा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना सोमवारी दिला आहे.
दळणवळणाशी संबंधित प्रकल्पांनी सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे दळणवळणाचा विकास म्हणजे कर्जाचे जाळे नव्हे, असा टोला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी किर्गिस्तान येथे शांघाय सहकार्य परिषदेत चीनचे नाव न घेता लगावला आहे.
इस्रायल-‘हमास’च्या संघर्षानंतर भारतविरोधी शक्तींनीही बेटकुळ्या फुगवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. मग पाकिस्तानी असो वा खलिस्तानी, त्यांनी भारतालाही ‘हमास’सारखा खुनी हल्ला सहन करावा लागेल, अशी फुटकळ धमकी देण्याचे उद्योग केले. म्हणा, अशा धमक्यांना मोदी सरकारने यापूर्वीही कधी भीक घातली नव्हती आणि भविष्यातही हे धमकी देणारे ‘अज्ञातां’च्या हस्ते कधी यमसदनी धाडले जातील, हेही सांगणे अवघडच. पण, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशीच खलिस्तानींची सध्याची गत!
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. इस्रायलने पण हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, हमासच्या १५०० दहशतवाद्यांना मारले आहे. दोन्ही बाजूने युद्धविरामाची कोणतीच चिन्ह दिसत नसल्यामुळे हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारताला इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यास हिंसाचार भडकविण्यासाठी वापर केला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे कॅनडात होणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधात भारताने व्हिसा सेवा निलंबित केली आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वॉशिंग्टन डिसी येथे पत्रकारपरिषदेत शुक्रवारी केले आहे.
‘भारत’ या शब्दास विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी भारताची राज्यघटना वाचून बोलावे, अशा सल्ला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.
रशियासह चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘जी २०’ परिषदेला उपस्थित राहणार नसल्याने फारसा फरक पडत नसल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ठामपणे सांगतात. ही परिषद म्हणजे राजकीय आखाडा नाही, असेही ते ठळकपणे नमूद करतात. असे परखडपणे सांगणारा हा नवा भारत आहे. विकसित राष्ट्रांची मनधरणी आपण करणार नसल्याचे, तो कृतीतून दाखवून देतो. संपूर्ण जगाला भारतात होणार्या या परिषदेतून काही साध्य करून घ्यायचे आहे. जगभरातील नेत्यांचा भारताबद्दलचा हा बदललेला दृष्टिकोन अभिमानास्पद असाच!
खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी युकेने नवा फंड जाहीर केला आहे. भारत आणि युके कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठीदेखील काम करत आहेत.
भारतातून थेट पाकिस्तानात आपल्या प्रियकराच्या शोधात गेलेल्या अंजूने अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, अंजूने आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आपण भारतातून पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तिने जाहीर केले आहे. तसेच, आपण भारतात येण्याच्या लायकीचे राहिले नसल्याचे देखील तिने सांगितले. दरम्यान, अंजूने फेसबुक फ्रेंड नसरुल्लाला भेटण्यासाठी ती पाकिस्तान गाठून त्याच्याशी विवाह केला. या लग्नानंतर अंजूच्या व्यथा समोर येऊ लागल्या आहेत.
२०२५ पर्यंत भारताचे पाच अब्ज डॉलर्स किमतीच्या संरक्षण निर्यातीला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट आहे. हा सौदा फक्त शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा नाही आहे, तर चीनविरुद्ध उभे ठाकण्यासाठी संरक्षण उपकरणाची विक्री करण्याची भारताची भूमिका आहे. भारतीय क्षेपणास्त्रांमुळे फिलिपाईन्सला दक्षिण चीन समुद्रात त्यांचा हक्क मिळू शकेल. भारताने फिलिपाईन्सला सैन्याला सायबर सुरक्षा प्रशिक्षण देऊ केले आहे.
भारतीयांना आता लवकरच ई-पासपोर्ट मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोकांना एक चिप असलेला ई-पासपोर्ट मिळेल.
आधुनिक काळातील जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे भारत आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणजे अमेरिका. या दोन्ही लोकशाहीचे स्तंभ मानल्या जाणार्या देशांचे मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर पाश्चात्यांशी जवळीक साधण्याचे वाईट परिणामच आजवर आपण अनुभवलेले. त्यामुळे या मैत्रीत जपून पावलं टाकण्याची भारताला गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौर्यानिमित्ताने या दोन्ही देशांच्या ऐतिहासिक संबंधांचा घेतलेला हा धावता आढावा...
पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे पाणी मिळत नसल्याने पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे तक्रार करताना दिसत आहेत. मी परराष्ट्र मंत्री असून मला पाणी विकत घ्यावे लागते, माझ्या घरी टँकर बोलवावा लागतो, असे भुट्टो या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. कराचीतला हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे नुकतीच सहावी इंडियन ओशियन कॉन्फरन्स अर्थात हिंद महासागर परिषद संपन्न झाली. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेदेखील उपस्थित होते. त्यांनी या संमेलनाला संबोधित केले. यावेळी जयशंकर यांनी चीनसह पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. चीनवर अप्रत्यक्ष हल्ला चढवत एस. जयशंकर यांनी सांगितले की, जेव्हा एखादे राष्ट्र कायदेशीर दायित्वांकडे दुर्लक्ष करते किंवा दीर्घकालीन सहकार्य करारांचे उल्लंघन करते, तेव्हा विश्वास कमी होत जातो. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर गंभीर नु
भारत मालदीवमध्ये अनेक प्रकल्प विकसित करत आहे. ज्यामध्ये ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प आणि ‘हनीमधु’ आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्रमुख आहेत. सत्तेवर आल्यापासून म्हणजे २०१८ सालापासून राष्ट्रपती सोलिह यांनी ’इंडिया फर्स्ट’ मिशनच्या अनुषंगाने देशाच्या परराष्ट्र धोरणात भारताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तथापि, ते चीनशी काळजीपूर्वक संतुलित संबंध राखत आहेत.
भारताचा मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड हे येत्या मे महिन्यात भारत दौर्यावर येणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच दौरा असेल. तत्पूर्वी त्यांनी भारताविषयी अभ्यास करून गृहपाठ पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. खास याकरिता त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयानेही ‘ग्राऊंड वर्क’ सुरू केले आहे. प्रचंड यांचा भारत दौरा अनेकदा पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी गुरुवार, दि. 20 एप्रिलपर्यंत भारत दौर्यावर येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर शु
काँ‘ग्लोबल साऊथ’ म्हणविल्या जाणार्या गटातील एक महत्त्वाचा देश म्हणजे कोलंबिया. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला वसलेला हा एक प्रमुख देश. या देशाची भूराजकीय, भूव्यापारीदृष्ट्या जागाही तितकीच मोक्याची. उत्तरेला कॅरेबियन समुद्र तर पश्चिमेला अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर
अमेरिकेने भारताचे महत्त्व ओळखले असून, आशिया खंडात शांतता प्रस्थापित करायचे असेल, तर नव्या भारताला पर्याय नाही, हे तिने मान्य केले आहे म्हणूनच अमेरिकी निर्बंधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भारत रशियाबरोबर व्यापारी संबंध कायम ठेवतो आणि त्याला विरोध केला जात नाही.
भारतासाठी दूरसंचार तंत्रज्ञान हे केवळ सामर्थ्याचे साधन नसून सक्षमीकरणाची मोहीम आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञान सार्वत्रिक असून ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या क्वाड समुहाने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यगट स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या बैठकीत केली आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हे युग यद्धाचे नाही’, हीच भूमिका भारत मांडणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी बुधवारी केले. राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटरमध्ये (आरबीसीसी) ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिवसभर बैठक होणार आहे. त्याविषयी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पत्रकारांशी विशेष संवाद साधला.
भारताने ‘एफसीआरए’ नियमांची मजबुती केल्यामुळे जॉर्ज सोरोसचे हिंदू आणि भारतविरोधी प्रचारासाठी फंडिंग बंद झाले, ज्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला दिसतो. जॉर्ज सोरोसच्या इच्छेप्रमाणे २०२४च्या निवडणुकीत सरकार बदल, भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचविण्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.
गेल्या दशकात भारतात ज्या आमूलाग्र सुधारणा झपाट्याने झालेल्या दिसतात, त्यात प्रत्येक भारतीयाने दिलेले योगदान अतिशय बहुमूल्य आहे, मग ती ‘डिजिटल’ क्षेत्रातील क्रांती असो की इतर देशांचा भारताकडे बघण्याचा (आधीच्या तुलनेत) आताचा सकारात्मक दृष्टिकोन...! यातून भारताची वाटचाल दमदार होताना दिसते, त्यामुळे ‘मोदी क्वश्चेन’सारख्या निर्बुद्ध मुद्यांना सामान्य जनता भिक घालत नाही हेदेखील अधोरेखित करणे गरजेचे वाटते.
महाराष्ट्रात, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत. मग महापालिकेच्या निवडणुका असो किंवा पदवीधर निवडणुका; सर्वांचं लक्ष या निवडणुकांनी वेधून घेतलयं. राज्यात जरी या निवडणुकांच्या वारंवार चर्चा होत असल्या तरी जागतिक पातळीवर चर्चा होतेयं ती मालदीव येथे होणार्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांची. ही निवडणूक जरी मालदीवमध्ये होत असली तरी भारतासाठी आणि भारत-मालदीव संबंधासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे.
देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या वर्षी नुतनीकरण करण्यात आलेल्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचे शानदार संचलन होणार आहे.