अध्यात्माबद्दल बोलायचे तर संतांनी अंतिम सत्य जाणलेले असते. भगवंताची प्रचिती घेतलेली असते. मग त्यांचे सांगणे, त्यांची अनुभूती, आपण का स्वीकारत नाही? भगवंत आहे, हे जाणूनही काही माणसे आपल्या ज्ञानाहंकाराने ते नाकारतात. त्यांना स्वामींनी ‘पापी’ म्हटले आहे. कारण, ते इतरांच्या बुद्धीत ईश्वराविषयी भ्रम निर्माण करतात. ही माणसे जाणूनबुजून ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात. इतरांचा बुद्धिभ्रंश करतात, म्हणून स्वामी त्या देह बुद्धीधारक अहंकारी माणसांची दुरात्मा, अतिशय वाईट (महांनष्ट) व चांडाळ म्हणजे दुष्कृत्ये करणारे म्हणून
Read More
समर्थ रामदासस्वामी शिष्यांना, महंतांना किंवा सामान्यजनांना उपदेश करीत. तेव्हा त्या विचारातील मर्म त्यांनी अनुभवलेले असे, त्याची प्रचिती घेतलेली असे. प्रचिती आल्यावर स्वामींच्या मुखातून तो उपदेश बाहेर पडे. थोडक्यात सांगायचे, तर स्वामींची वागण्याची पद्धत अशी होती की, ’आधी केले, मग सांगितले. यावरून विचारांच्या बाबतीत समर्थ आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान देत असत, हे लक्षात येते. या संदर्भात दासबोधातील समर्थवाणी स्पष्टपणे सांगते की, हे प्रचितीचे बोलिलें। आधी केले मग सांगितलें। मानेल तरी पाहिजे घेतलें। कोणी येक
समर्थ पुन्हा पुन्हा ‘राघवाजवळ वस्ती करुन राहा’ असे मनाला का सांगत असावेत, त्यात काही सांकेतिक रुपकात्मक संदेश दडला आहे का, हे पाहिले पाहिजे. जेथे उघडपणे बोलता येत नाही, तेथे सांकेतिक रुपकात्मक भाषा परिणामकारकरी त्या काम करून जाते.
श्रीकृष्णाने सर्व उपनिषदरूपी गाईंचे दूध काढून ते भगवद्गीतेतून आम्हाला दिले आहे, तसाच प्रकार समर्थ रामदासांनी केलेला आहे. समर्थांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे, भक्तिमार्गाचे सार काढून ते आम्हाला मनाच्या श्लोकांतून दिले आहे. यासाठी पांगारकरांनी त्यांना मराठी भाषेतील ‘उपनिषद’ म्हटले आहे. अर्थात, त्यातील विचार, उपदेश हे उपनिषदांच्या तोडीचे आहेत. तो उपदेश शिवकालीन मराठी मनाने आदराने स्वीकारला.
समर्थ रामदासस्वामींवर प्रकाशित साहित्य एकाच ठिकाणी वाचणे शक्य व्हावे यासाठी सुमंगल प्रकाशनातर्फे 'समग्र समर्थ साहित्य' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहे.
समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’ समर्थांचे अवलोकन चौफेर असल्याने असल्याने त्यांनी या समासात कवित्वाचे तीन-चार प्रकार सांगितले आहेत आणि कवित्व प्रकारांची नावे स्वामींनी स्वतः दिलेली आहेत.
रामोपासना ही सर्वांसाठी आवश्यक अट होती. आजही सर्व रामदासी मठांतून रामाची काकड आरती, पूजाअर्चा या गोष्टी कटाक्षाने पाळून रामोपासना सांभाळली जाते, तथापि रामोपासना सांभाळण्यासाठी प्रथम रामाचे दास्य स्वीकारले पाहिजे. समर्थ स्वत:ला रामदास म्हणजे रामाचा दास म्हणवून घेत असत. हे ‘रामदास्य’ कसे असते, त्यासाठी महंतांनी भक्तांनी आचरण ठेवले, हा आजच्या लेखाचा प्रमुख विषय आहे.
समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मयनिर्मिती केली. त्याची थोडक्यात माहिती घ्यायची, तर सोळा स्फुट काव्ये त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ओवीसंख्या सुमारे तीन हजार २०० इतकी भरेल. त्याशिवाय वीस दशकी ‘दासबोधा’च्या सात हजार ७५१ ओव्या आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. ‘आत्माराम’ ग्रंथाच्या १८३ ओव्या आहेत.