राणी एलिझाबेथ द्वितीय आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना भेट दिली.
Read More
(Tamil Nadu) विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान झाल्याने तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित न करताच सभागृह सोडले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप दिला.
वनसंपदा, खनिज संपदा व कला यांनी समृद्ध असलेले झारखंड हे राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. या राज्यातील जमिनीच्या उदरात काही ना काही संपदा दडलेली आहे. वृक्ष व निसर्गाची पूजा करणारे आदिवासी लोक या राज्यात आहे. निसर्ग रक्षणाला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे लोकांनी निसर्ग संपदेचे रक्षण केले आहे, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच 'झारखंड राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल होणार आहेत. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? , प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. दरम्यान अजित पवार यांचे PA राजभवनात दाखल झालेले आहेत.
मुंबईतील राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. एका एनजीओच्या काही महिला राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात आल्या होत्या. संबंधित महिला निमंत्रित होत्या. या महिलांबरोबर अभिनेत्री मायरा मिश्रा ही देखील आली होती. राज्यपालांच्या दालनात मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नसताना देखिल नियमांचे उल्लंघन करुन अभिनेत्री मायरा मिश्राने फोटो काढला.
"मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका अनोळखी गाडीचं शिरणं ही अनावधानाने घडलेली घटना आहे. त्यामुळे त्या प्रकाराला गांभिर्यानं घेण्याची आवश्यकता नाही.", असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. शुक्रवारी (दि. १८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा ताफा राजभवन येथून वर्षा निवासस्थानी चालला होता. त्यावेळी मलबार हिलवरील रस्त्यावर अचानक एक अनोळखी चाकचाकी गाडी त्या ताफ्यात शिरली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा आणि वाहनचालकावरील कारवाई याबाबत प्रश्नचिन्ह उद्भवत होते. त्यासंदर्भात राज्याच्या गृह
नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील वनवासी भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्य करणार्या ‘सेवा विवेक’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या आकर्षक राख्यांचे विमोचन राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच पुणे येथील राजभवनात करण्यात आले.
पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यावर आधारित विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
लखीमपूर खिरी प्रकरणात योग्य कारवाई न झाल्याने काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ११ ऑक्टोबर २०२१ रोजी राजभवनावर बाहेर मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाबाबत अधिक माहिती सांगताना भाई जगताप म्हणाले की, 'आमच्या मौनव्रत आंदोलनामध्ये आमच्या दोन मागण्या असणार आहेत.'
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची शपथ घेतली.राजभवन येथे गुरुवारी (दि.१९) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली.शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया, मुंबई उच
बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्धमूर्ती भेट
संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन सलमान मोहमद अलमर्झुकी यांनी मंगळवार दि. १६ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना सामोरे जात त्यांची सेवा करण्याचे मोलाचे कार्य केले असल्याचे गौरोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड) च्या वतीने राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्यातील ५० निवासी डॉक्टरांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
'विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. आपल्याकडे प्रश्नांची कमतरता नाही, सरकारच्या निर्णयांची कमतरता आहे', असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.राज ठाकरेंचे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत आलेली वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.
आज अभिनेते सोनू सुदने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती सूद यांनी यावेळी राज्यपालांना दिली.
पालघरमधील साधूंच्या हत्येचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेच्या महंतांनी राज्यपालांची भेट घेतली.
मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता
देंवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून ते या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.