Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जिल्ह्यात मुस्लिम जमावाने दंगल घडवल्यानंतर काही दिवसांनी, एका हिंदू महिलेने तिच्यावर बलात्कार करण्यात येणार असल्याच्या धमक्या आणि इस्लाम स्वीकारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले आहे.
Read More
Hindu Bachao मुर्शिदाबादमधील हिंसेनंतर पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेता सुवेंदु अधिकारी यांनी बंगाली हिंदूंसाठी 'हिंदू बचाओ' मोर्चा काढला. दरम्यान, त्यांनी ग्राम सुरक्षा संघटनेची मागणी केली आहे. त्यासोबतच सांगण्यात आले की, हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी परवानायुक्त हत्यारे पुरवण्यात येणार आहेत.
(India slams Bangladesh remark on Murshidabad Violence) गेल्या काही दिवसापासून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचाराची मालिका सुरु आहे. या हिंसाचारावर बांगलादेशने केलेल्या विधानाचा समाचार घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर देताना चांगलीच समज दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी "बांगलादेशने आधी स्वतःच्या देशाकडे पाहावे. आणि आमच्या देशांतर्गत विषयामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही.", अश्या शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला
Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांद्वारे पसरवण्यात आलेल्या हिंसेचा आता मोठ्या प्रमाणात खुलासा करण्यात आला आहे. हिंसा पसरवण्यात आल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांना याबाबत स्फोटकांचा मारा कुठे करायचा आहे आणि कुठे हल्ला करायचा याचे निशाण बनवण्यात आले आहे.
Mamata Banerjee पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे हिंसाचार बळावला गेला आहे. ममता बॅनर्जी आपल्या व्होट बँकचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये मु्स्लिमांनी हिंसाचाराच्या कारणाने ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे.
(Murshidabad Violence) वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. याबाबतच प्राथमिक चौकशी अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातून असे समोर आले आहे की, या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असून त्यांना स्थानिक नेत्यांची मदत मिळाल्याचे समोर आले आहे. पुढे हेच घुसखोर नियंत्रणाबाहेर गेल्याने परिस्थिती आणखी बिकट होत गेली.
(Tensions in West Bengal's South 24 Parganas) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात असताना, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात भांगर येथे सोमवारी १४ एप्रिल रोजी वक्फ कायद्याविरोधात काढलेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उसळला. या ठिकाणी इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) चे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याने अनेकजण जखमी झाले आणि आंदोलकांकडून पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
(Murshidabad Violence) पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्यावरुन सुरु झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत दीडशे जणांना अटक केली आहे. दंगलग्रस्त भागांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) पाच पथके तैनात करण्यात आली होती. या बीएसएफच्या जवानांवर दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केल्याची माहिती बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी दिली.
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित वास्तवावर आधारित असल्याची कोल्हेकुई सुरू केली. मात्र, सध्या प. बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये जे घडत आहे, ते काश्मीरपेक्षा फारसे वेगळे नाही. काही वर्षांनी या घटनांवर ‘बंगाल फाईल्स’सारखा चित्रपटही काढला जाईल. सध्या तो देशवासीयांना लाईव्ह पाहायला मिळत आहे, ही शोकांतिका