महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे सरळसेवा भरतीच्या माध्यमातून एकूण ३४५ रिक्त जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. तसेच, अर्ज करण्याकरिता दि. १३ डिसेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृतीस सुरुवात होणार आहे. तर दि. ३१ डिसेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.
Read More
आपले आई-वडील काबाडकष्ट घेऊन आपल्याला शिक्षण देत आहेत. शिक्षकवर्ग मेहनत घेऊन आपल्याला शिक्षण देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात जे काही करायचे आहे ते ध्येय्यवेडे होऊन करा, असा मोलाचा सल्ला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमावेळी दरेकर बोलत होते.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. ते देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्या ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाचा अंतिम टप्पा मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्पाची सद्यःस्थिती त्याबरोबरच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजना आणि सध्या सुरू असलेल्या इतर प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गाय
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने आगामी काळात काय गंभीर स्थिती होईल, याची चिंता आहे. जिल्ह्यातील ३६८ गाव-वाड्यांना टंचाईच्या झळा बसत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) गट क संवर्गातील महाभरतीसाठी ११ हजार ५८८ उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु ही संपुर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. पैकी १ हजार ४४७ अर्जदारांपैकी ज्यांनी परिपुर्ण माहिती संकेतस्थळवर भरली होती, त्या ७४४ उमेदवारांना परिक्षा शुल्क पोटी २ लाख १४ हजार २५० रुपये परत करण्यात आले आहेत.तरी उर्वरीत उमेदवारांनी संकेतस्थळावर बँक खात्याच्या तपशिलासह परिपुर्ण माहिती भरून शुल्क परतावा घेण्याचे आवाहन झेडपी द्वारे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांकरिता थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळांतर्गत होणाऱ्या थेट मुलाखतीसाठी दि. २२ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची वर्षानुवर्षांची मागणी. कारण, रात्री-अपरात्री होणारा वीजपुरवठा हा बेभरवशाचा असून, थंडीच्या दिवसांत रात्री पिकांना पाणी देणे, हे मोठे आव्हानात्मक. त्यावर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतकर्यांना सकाळी १२ तास वीजपुरवठ्याचा घेतलेला निर्णय हा सर्वार्थाने बळीराजाचे जीवन प्रकाशमान करणाराच!
पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनीगोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर, सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मुंबई येथील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
भारतीय विभागाने गेल्या अनेक दशकांमध्ये देशाच्या सुरक्षिततेसाठी दैदिप्यमान आणि नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. चीन आणि पाकिस्तनाशी लढताना त्रिशूल विभागाची कारवाई नोंदणीय राहिलेली आहे. त्रिशूल विभागाच्या या कामगिरीला महाराष्ट्र शासनाच्या मदतीने वॉर म्युझिअम अर्थात युद्धसंग्रालहाच्या समोर आणण्यात येणार आहे. लेहच्या करू भागात महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात येणार असून आता लडाख मध्येही महाराष्ट्राचा डंका वाजणार आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातील भरतीप्रक्रियेस सुरुवात झाली असून उमेदरवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेऊन अर्ज करावयाचा आहे. या भरतीप्रक्रियेद्वारे पदवीधरांना पुणे जिल्ह्यात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://cdn.digialm.com/
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मग यासंदर्भात जागरूक हिंदूंची जबाबदारी नेमकी काय असायला हवी? समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण व्यक्ती व सामाजिक पातळीवर यानिमित्ताने काही करू शकतो का? आपण यात काही भूमिका बजावू शकतो का? याचा उहापोह करणारा हा लेख...
आज उबाठा गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता ठाकरेंच्याच वाढदिवसानिमित्त त्यांची ‘पॉडकास्ट’ स्वरुपातील मुलाखत प्रथेप्रमाणे संजय राऊतांनी घेतली. खरं तर वाढदिवसाच्या दिवशी माणसावर शुभेच्छांचाच वर्षाव होणे अपेक्षित. ठाकरेंवर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तो तसा होईलही म्हणा.
भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
समितिचे अध्यक्ष निवृत्त न्यायमुर्ती कैलास चांदीवाल यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दरमहा मिळणारे वेतन आणि भत्ते इतके मानधनस्वरुपात राज्य सरकारकडून अदा करण्यात येईल.
. शासन शब्दकोश भाग - एक असे या मोबाईल अॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२ हजार १७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.