अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश
Read More
ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे ( Railway ) स्थानकाच्या कामात रेल्वेच्या उच्च दाब वीज वाहिनीचा अडथळा होत आहे. तेव्हा, स्थानकाचे काम थांबु नये यासाठी यावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
मुंबई : ( Municipal Commissioner ) मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकार्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सुटी देणे संबंधित नियोक्तांसाठी बंधनकारक राहील. या नियमांचे पालन न करणा़र्यां नियोक्तांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण
ठाण्यातील प्राचीन कौपीनेश्वर मंदिर कात टाकणार आहे. कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकतीच मंदिराची पाहणी केली. मंदिराचा जीर्णोद्धाराची प्रक्रिया मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच माती परीक्षण महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, असे या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले
राज्यात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्य सरकारकडून राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मह्त्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना म्हणाले, सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असून त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील.
शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल, अशी पूरक पद्धती अवलंबू नका, असे खरमरीत पत्र आमदार नीतेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना लिहीले आहे. मुंबई महापालिकेतील एकूण १२३ प्रलंबित प्रस्तावांबद्दल अवैधता आढळत असेल तर संपूर्णपणे प्रक्रीया रद्द करावी, अशी मागणी राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.
नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना केल्याचा भाजपचा आरोप
अभिजित सामंत यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा
सखोल चौकशीची केली मागणी
ट्विट करत दिली माहिती!
मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची माहिती!
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय!
लस उपलब्ध होईपर्यंत कोरोना शून्यावर आणणे अशक्य असल्याची कबुली
स्थायी समितीसह गटनेता व सभागृहाची बैठक घेण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांचे स्थायी समिती अध्यक्ष व महापौरांना पत्र
म्युनिसिपल मजदूर युनियनची मागणी
‘आरोग्ययोद्धे’ कोरोनावर खोलवर चढाई करत असतानाच परदेशी यांची सेनापतीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. कारण काय होते, तर शीव रुग्णालयात मृतदेहाच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्धचे युद्ध अटीतटीचे चालले असतानाच त्याच्या सरसेनापतीला हटवून ‘कोरोना योद्ध्यां’मध्येच संभ्रमावस्था निर्माण केली. त्यामुळेच प्रशासनाला कोरोना चाचणीचे नियम वेळोवेळी बदलावे लागत आहेत. ज्यावेळी प्रवीणसिंह परदेशी पालिका आयुक्त होते, तेव्हा रुग्ण सापडण्याची संख्या ४०० ते ७०० यादरम्यान होती. मात्र, परदेशी यांना आयुक्त पदावरून हटविल्यानंतर तीच संख्या ७०० ते १००० च्या दरम्यान गेली आहे.
प्रवीणसिंह परदेशी यांनी दिलेला रजेचा अर्ज पुरेसा बोलका आहे. भिडे, जयस्वाल यांना त्यांच्या प्रशासकीय वकुबापेक्षा निम्नस्तरावर नेमण्याचे कारस्थान मुंबईला कुठे घेऊन जाणार आहे? फडणवीसांच्या काळात कार्यक्षम असलेले हे अधिकारी आज अकार्यक्षम का झाले आहेत, या प्रश्नाचे उत्तर खूप सोपे आहे. नोकरशाही कुठल्याही सरकारात तीच असली तरी तिच्या मागे एक खंबीर राजकीय आधार उभा असावा लागतो. फडणवीसांच्या काळात तो होता.
दिवसेंदिवस नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता महापालिका आयुक्तांसह ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्यांनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘स्मार्ट रोड’चे रखडलेले काम पाहता ‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी संबंधित ठेकेदारांला पाठीशी घालत आहेत काय, असा संशय आता नागरिक आणि परिसरातील व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
महापुराच्या अस्मानी संकटानंतर पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना देण्यात आली आहे.
११३६.३१ कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी
मुंबईत वाहनांची एवढी गर्दी वाढली आहे की, जागा नसल्याने ती कुठेही उभी केली जातात. महापालिकेने अनेक ठिकाणी पार्किंग सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र बेशिस्तपणा अंगी असणारे चालक-मालक रस्त्यातच गाडी उभी करतात. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडतो. यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आणि तो तातडीने अंमलातही आणला. त्यामुळे काही ठिकाणी घुसमटलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. परदेशी यांचा हा तातडीचा निर्णय म्हणजे ’केल्याने होत आहे रे, आधी क
सकाळी बेस्ट बसमध्ये स्थानापन्न होताच पहिल्या टप्प्यासाठी पाच रुपयांचे आणि लांबच्या प्रवासासाठी 20 रुपयांचे तिकीट हातात पडताच प्रवाशांना आनंदाचा धक्काच बसला. कंडक्टरची झोप उडाली नसेल असे म्हणून काहीनी `हे काय, पैसे कमी कसे घेतले?` अशी विचारणा केली. मात्र आजपासून तिकीटदर कमी केल्याचे समजताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली भाडेकपात मंगळवार, दि. ९ जुलैपासून लागू केली जाणार आहे.
कपड्यांना मागणी असताना मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या. तशीच आवश्यकता असतानाही 'बेस्ट'ला शेवटची घरघर लागते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. नगरनियोजनातले तज्ज्ञ म्हणून आणि त्याचबरोबर शिक्षणाने अर्थतज्ज्ञ असलेल्या परदेशी यांनी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत, त्या 'बेस्ट'विषयी आशा पल्लवित करणाऱ्या आहेत.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरून वाहू लागल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करताना आयुक्तांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का?