दि. २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय ‘जागतिक बौद्ध परिषद’ पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण भारताकडे होते. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय व ‘इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन’ यांनी एकत्रितरित्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात भारताच्या या आयोजनावर बरीच चर्चा झाली. आजच्या आधुनिक जगात अशा प्रकारच्या जागतिक बौद्ध परिषदेचे हे पहिलेच आयोजन ठरले. जगभरातील अनेक बौद्ध भिक्खू, तत्वज्ञ, अभ्यासक यांनी या परिषदेस हजेरी लावली. त्यामुळे एकप्रकारे भारताने चीनला दिलेला हा शह मानला जात आहे.
Read More