(Bangladesh's Interim Government Chief Muhammad Yunus Planning To Resign) बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार कधीही कोसळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus)यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Read More
(Pakistan Army official threatens India in Hafiz Saeed's words) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. मात्र, अजूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आता तेथील पाकिस्तानी लष्करानेही दहशतवाद्यांची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. 'जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू' अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
(India To Urge FATF To 'Grey List' Pakistan Again) पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत आणखी मोठं पाऊल उचलणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊन परकीय गुंतवणूक आणि भांडवलाचा प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुरक्षा मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या १३ व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याची शक्यता आहे. ही परिषद २७ ते २९ मे दरम्यान रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणार आहे.
ईशान्य भारत अष्टलक्ष्मीचे मूर्त स्वरूप आहे, जे समृद्धी आणि संधी आणते. याच सामर्थ्यासह ईशान्येकडील प्रत्येक राज्य गुंतवणूक आणि नेतृत्वासाठी सज्ज असून ऊर्जा व सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी हा प्रदेश केंद्रस्थान बनत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अल्बर्ट आईनस्टाईन यांनी निसर्गातील मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले होते की, “पृथ्वीतलावरून मधमाशा नष्ट झाल्या, तर पुढील तीन-चार वर्षांत मानवजातसुद्धा शिल्लक राहणार नाही.” कारण, मधमाशा वनस्पतींच्या परागीभवनात महत्त्वपूर्ण योगदान देतात. निसर्गसाखळीतील मधमाशांची घटणारी संख्या हा आज चिंतेचा विषय असून, त्यांची वसाहत वाढविणे ही काळाची गरज आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
MPs will be representing the government abroad, the message that there is political consensus in India regarding this action will be sent abroad as well विरोधी पक्षांमधील फाटाफुटीचा आणि काही पक्षांतील आंतरिक दुफळीचा अचूक वापर करून मोदी यांनी काही विरोधकांच्या पाकिस्तानवादी भूमिकेला छेद दिला. परदेशात हे खासदार सरकारचीच भूमिका मांडणार असल्याने परदेशांतही भारतात या कारवाईबद्दल राजकीय एकमत असल्याचा संदेश जाईल. शिवाय, शिष्टमंडळातील विरोधी खासदारांच्या अंतर्भावामुळे भारतात खर्या अर्थाने लोकशाही नांदत असल्याचेही
Shri Yogiraj Maharaj Gosavi Paithankar संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मि
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. 6E2142 क्रमांकाचे हे विमान असून त्याच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोमध्ये दिसतेय. वास्तविक दि. २१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगर येथे रवाना होत असताना विमान अचानक आलेल्या खराब हवामानाच्या कचाट्यात सापडले. विमानात एकूण २२७ प्रवासी होते, विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
विशेष प्रतिनिधी पहलगाममध्ये दहशतवाद्य़ांनी धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानचा कणा मोडला आणि त्या चक्रव्युहात पाकला गुडघे टेकावे लागले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर येथे केले. राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करताना ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
(Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India) डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्षा निवास्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.
(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर आ
(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
( IPL playoffs update ) २०२५ आयपीएल हंगामाच्या प्ले ऑफच्या तिकीटासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत. बुधवार, २१ मे रोजीचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हा सामना आयपीएलमधील प्ले ऑफचं तिकीट कुणाला मिळणार हे ठरवणार आहे. प्ले ऑफमधील चौथे स्थान मिळवण्यासाठी मुंबई आणि दिल्ली संघासाठी आजचा सामना संधी आहे. त्यामुळे आता ही मॅच कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एक चोरी लपवण्यासाठी हजारवेळा खोटे बोलावे लागते, असे म्हणतात. मुंबईत बुधवार, दि. २१ मे रोजी असाच एक प्रकार समोर आला. उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी अचानक रस्त्यांचा पाहणी दौरा काढल्याने कंत्राटदारांना घाम फुटला. आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी त्यांनी गेल्या ६ महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्यावर भल्यापहाटे काँक्रिटीकरण केले. मात्र, हा प्रकार निदर्शनास शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कामचुकार कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश दिले.
इस्लामिक संकल्पना असली तरी ती इस्लामचा अविभाज्य भाग नाही. वक्फ बोर्ड धर्मनिरपेक्ष कामे करतात, म्हणूनच वक्फ बोर्डांमध्ये गैर-मुस्लिमांचा समावेश करण्यास परवानगी आहे, असा युक्तिवाद केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे.
माझ्या वैज्ञानिक म्हणून लहानशा कार्यात नारळीकरांच्या एका सिद्धांताला पुराव्यांसोबत सिद्ध करण्याची संधी मिळाली. पुरावा सापडलासुद्धा, पण आज एक खंत वाटते की, मी थोडे धाडस नाही केले? की मी त्यांच्याशी संपर्क नाही साधला? आज कदाचित या अभिवादनातून मी अनंतात विलीन झालेल्या जयंत विष्णू नारळीकर या थोर महानुभावाशी थेट माझे मनोगत व्यक्त करू शकेन...
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. भारताच्या आक्षेपांची गंभीर दखल घेत आता ‘नाणेनिधी’ने 11 अटी पाकवर लादल्या खर्या. पण, त्या अटींची पूर्तता शरीफ सरकारने करण्याचे तोंडदेखले का होईना, मान्य केले तरी पाकिस्तानातील सामान्यांसाठी ते सुलतानी संकटच!
(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या
( India is not a dharmshala Supreme Court rejects Sri Lankan man’s plea for setting in india) “जगभरातील निर्वासितांना सामावून घेता येईल, यासाठी भारत ही धर्मशाळा नाही,” असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले. ‘बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्या’अंतर्गत अलीकडेच तुरुंगवास भोगलेल्या श्रीलंकेच्या एका व्यक्तीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना याविषयी टिप्पणी केली.
( Prime Minister Modi inaugurated Amrut Bharat stations on Thursday ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत भारत स्थानक पुनर्विकास योजने’तून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारतातील 1 हजार, 300 हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास हाती घेतला
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून भारतीय सैन्याचा अवमान करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले असून यामुळे उबाठा गटाची काँग्रेसी मानसिकता पुन्हा उघड झाल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
(Veteran Nuclear Scientist M. R. Srinivasan passes away at 95) प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. मंगळवारी २० मे रोजी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी तामिळनाडूतील उदगमंडलम येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारताने एक असा शास्त्रज्ञ गमावला आहे ज्यांनी देशाला अणुऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न साकार केले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक सामान्य लोक जखमी झाले किंवा त्यांचं नुकसान झालं. याच लोकांसाठी भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.
विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सोमवारी हेग येथे नेदरलँड्सचे संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकेलमन्स यांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्या संबंधित सुरक्षा दृष्टिकोन आणि आव्हानांवर चर्चा केली.
विशेष प्रतिनिधी भाजप नेते अमित मालवीय यांनी समाजमाध्यमांवर राहुल गांधींचे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. त्यामध्ये राहुल गांधी आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांचे चेहरे एकत्र करून दोघांची विचारधारा एकच असल्याचे म्हटले आहे.
( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवार, १८ मे रोजी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. गौरव गोगोई यांना आयएसआय चे निमंत्रण असून या निमंत्रणावरूनच ते पाकिस्तानला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरमा यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षामुळे क्रीडाविश्वावर विपरीत परिणाम झाला. अनेक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या, तर काही क्रीडापटूंना काही स्पर्धांना मुकावे लागले. या तणाव आणि अशांततेमुळे क्रीडा क्षेत्रावर होणार्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दि. 5 मे रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावरून होणार्या मालवाहतुकीवर बंदी घातली. त्यानंतर कांद्याच्या निर्यातीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, दि. 6 मे रोजीपासून मुंबईहून दुबईकडे थेट जहाजसेवा सुरू झाल्याने लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये कांद्याची थेट निर्यात पुन्हा वेग घेत आहे. आतापर्यंत 350 कंटेनरद्वारे 90 हजार क्विंटल (30 हजार मेट्रिक टन) कांद्याची निर्यात झाली. त्यामुळे भारतीय कांदा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात गाजू
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारा संभाव्य हल्ला परतवून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. ८ मे रोजी रात्री, पाकिस्तानकडून पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन्स पाठवले गेले होते. त्याचा मुख्य उद्देश अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा होता. भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने या ड्रोन्सना आधीच वर्तवले होते. त्यामुळे नाश करणे सोपे झाले. या घटनेचा व्हिडिओ भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन्सना कसे पाडले हे दाखवले आहे.
ईशान्य भारतातील व्यापार हा बांगलादेशवर अवलंबून असल्याच्या वल्गना बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान आणि चीनच्या हातचे नवे बाहुले ठरलेल्या मोहम्मद युनूस यांनी मागे केल्या होत्या. पण, आता भारताने लादलेल्या निर्बंधांमुळे एक तृतीयांश व्यापार प्रभावित करुन, बांगलादेशच्या आर्थिक नाड्या आवळणारी ही खेळी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे!
Operation Sindoor new India पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून चोख प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे एकीकडे पाकिस्तानची लष्करी क्षमता क्षीण झाली, तर भारताच्या अचाट युद्धकौशल्याचे दर्शन जगाला झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामधील सुप्त घटनांचा हा घेतलेला आढावा...
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा-चिचोली ग्रामपंचायत क्षेत्रात आज सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे आणि सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती.
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ
ज्योती मल्होत्रा. भारतातील एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर. सोशल मीडियावर ज्योतीचे लाखों फॉलोअर्स. मात्र, याच ज्योती मल्होत्रा हिला आता देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनांशी संबंध असल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आलीये. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचाही आरोप आहे. एकीकडे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना ज्योती मल्होत्रा या महिलेचे हे कृत्य उघडकीस आले आहे. मात्र, ही ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे? ती पाकिस्तानच्या संपर्कात कशी आली? आणि ती
( Maharashtra in Khelo India Youth Championship) 'भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकाचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की ग्राउंड-हँडलिंग कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
Bangladeshi in rajsthan पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आता कडक कारवाई सुरू झाली आहे. राजस्थानच्या अजमेर येथील स्पेशल टास्क फोर्सने बेकायदेशीररीत्या भारतात राहत असलेल्या फूलजान या बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली संबधित महिला ही गंज पोलीस स्टेशन हद्दीतील नागफणी परिसरात राहत होती. ती बांगलादेशच्या विविध भागात राहिली. त्यानंतर ती अजमेरला आली, तेव्हापासून ती नागफणी परिसरात राहत होती.
( pak ishak Dar exposed ) पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा आणखी एक बुरखा फाडण्यात आला आहे. भारताच्या कारवाईचे पुरावे द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात छापून आल्यानंतर पाकिस्तानच्या उपपंतप्रधांनांनी मुर्खपणाचा कळसच गाठला आहे. पाकचे मंत्री इशाक दार यांनी यूकेतील वृत्तपत्र असलेल्या ‘द डेली टेलिग्राफ’च्या पहिल्या पानाची बनावट प्रत तयार केली. ज्यात पाकिस्तानच्या हवाई दलाचे कौतूक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
( Loan to Pakistan means funding terrorism) भारत आणि पाकिस्तान यांच्या युध्द तणावाच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाला हिरवा कंदील दिला होता. आता या प्रकरणी अमेरिकेचे माजी अधिकारी असलेल्या मायकल रुबिन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला चांगलेच फटकारले आहे. एका अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मायकल रुबीन यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे.
पाकिस्तानच्या कुरघोड्या, चीनची दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानला फूस, तुर्कीची पाकिस्तानशी वाढलेली जवळीक आणि भारताविरोधात या तिन्ही देशांची उघड झालेली आघाडी लक्षात घेतला केंद्र सरकारचे संरक्षण बजेट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण निधी ७ लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद मागील वर्षीच्या बजेटच्य
राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेतली. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे मूल्यमापन शुक्रवार, दि. १६ मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
“वानखेडे मैदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे एक ‘आयकॉनिक स्टेडियम’ आहे. मागच्या काळात दिवंगत अध्यक्ष अमोल काळे आणि ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे मैदान उभारण्याबद्दल चर्चा केली होती. ‘एमसीए’ने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा देऊ. तेथे किमान एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य मैदान उभारू”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १६ मे रोजी केली.
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता त्याच ट्रम्प यांनी आपण केवळ तणाव निवळण्यासाठी मदत केली, असे म्हटल्याने, भारताची कूटनीतिक शक्ती अधोरेखित होण्याबरोबरच विरोधकही तोंडावर आपटले आहेत.
आपल्या शेजारचे राष्ट्र आपला किती द्वेष करते, हे युद्धविराम झाल्यानंतरदेखील दिसून येते. त्यामुळे येऊन-जाऊन पाकिस्तान्यांची तळी उचलणार्यांनी ‘उचलली जीभ’ असे प्रकार जे समाजमाध्यमांतून सुरू केले आहेत, त्याला जरा आवर घालावा. आपल्या शूर सैनिकांनी अतिशय अचूक मारा केला, म्हणूनच तुर्कीने पाकिस्तानला दिलेले ड्रोन नष्ट करण्यात यश आले, हे जरा ध्यानी ठेवावे. ते जर का भारतात पडले असते, तर पहलगामपेक्षा आणि काँग्रेस-डावे आणि पुरोगाम्यांच्या सरकारच्या काळात जेवढे दहशतवादी बळी गेले, त्यांपेक्षा कितीतरी बळी आपल्या देशात गेले
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जसा भारतीय सैन्याचा पराक्रम चर्चेत आला, तसेच पकिस्तानच्या फाळणीच्या चर्चेलाही उधाण आले होते. त्यातच बलुचिस्तानने स्वातंत्र्य घोषित करून भारत, संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांकडे पाठिंबादेखील मागितला. त्यामुळे पाकिस्तानचे तेथील प्रांतांवर होणारे जुलूम उघड झाले. पाकिस्तानातील परिस्थितीचा हा आढावा...
विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या