भारत सध्या चांगल्या स्थितीत नसल्याचे तसेच नरेंद्र मोदी कोणाचे ऐकत नसल्याचे राहुल गांधी या परिसंवादात बरळले. एवढेच नव्हे, तर देशात सर्वत्र रॉकेल पसरवून ठेवले असून, केवळ एक ठिणगी टाकण्याचा अवकाश कधीही भडका उडू शकतो, असे सांगताना त्यांची जीभ कचरली नाही. केंद्रातील भाजप सरकारला दूर सारणे अशक्य असल्याचे राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांच्या लक्षात आल्याने त्यांचा मोदी सरकारविरुद्ध असा थयथयाट सुरू केला आहे.
Read More