महाराष्ट्र राज्य हे पाणीपुरवठा व स्वच्छता बाबतीत संस्थात्मक बळकटीकरण आणि मागणी आधारित पुरवठा करणारे देशातील अग्रगण्य राज्य आहे. ग्रामीण महाराष्ट्राशी निगडित सर्वाधिक महत्त्वाच्या अशा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची जबाबदारी सांभाळताना ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, यासाठी या विभागामार्फत काम सुरू आहे. पाणी मिळाल्यानंतर लोकांच्या चेहर्यांवरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहणे यासारखे सुख नाही. ते सुख आणि ती पुण्याई या विभागाच्या माध्यमातून काम करताना मिळत आहे.
Read More