uniqueness of the election results in Canada 51वे राज्य म्हणून अमेरिकेत सामील व्हा, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाला वारंवार हिणवण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कॅनडाची निवडणूक राष्ट्रवादाच्या प्रमुख मुद्द्याभोवती केंद्रित होती. या निवडणुकीत अखेरीस लिबरल पक्षाचा विजय झाला आणि पक्षाचे नेते मार्क कार्नी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. त्यानिमित्ताने कॅनडातील निवडणुकांचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
Read More
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. निवडणूक निकाल पाहता, विद्यमान पंतप्रधान मार्क कार्नी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत खलिस्तानी जगमीत सिंग याचा पराभव झाला आहे.
India अमेरिकेच्या टेरिफमुळे जगामध्ये व्यापारयुद्धाचे सावट जमा झाले आहे. त्यातच कॅनडाच्या नव्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याची मनिषा व्यक्त केली आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धकाळात जगाच्या पुरवठा साखळीमध्ये, मोलाची भूमिका बजावण्याची नामी संधी भारताकडे आहे. याच पार्श्वभूमीवर एकूण परिस्थितीचा घेतलेला आढावा....
कॅनडाच्या राजकारणातील आधुनिक इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची कारकीर्द ही गोंधळ, दुटप्पी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय अपयश यांचे मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे. त्यांनी खलिस्तानसारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर कॅनडाच्या जागतिक विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाले. ‘जागतिक हरित धोरण’ आणि मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांनी, आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेक भावनिक भाषणे केली. पण, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील अस्थिरतेने कॅनडाच्या व्यापार, गुंतवणूक आणि परराष्ट्र
( Mark Carney as Canada leader ) कॅनडाच्या लिबरल पक्षाने मार्क कार्नी यांची नेतेपदी निवड केली आहे आणि ते जस्टिन ट्रुडो यांची जागा कॅनडाचे पंतप्रधान म्हणून घेणार आहेत, असे वृत्त कॅनडातील सीटीव्ही न्यूजने दिले आहे.
जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर जगाची रचना पूर्वपदावर आणण्याचा चंग डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. त्यालाच अनुसरून ते आक्रमक विधाने करत आहेत. मात्र, आजही त्यांचा प्रवास हा त्यांच्या सर्व नेतृत्वगुणांचा कस पाहणारा असेल, हे निश्चित...
जस्टिन ट्रूडो यांची लिब्रेल पार्टी आणि न्यू डेमोक्रेटीक पार्टी सत्तेमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. परंतु त्यांच्या मित्रपक्षाने आता त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खलिस्तानी नेते जगमीत सिंह हे येत्या वर्षात ट्रूडो सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणणार आहे. लिब्रल पार्टी आणि एनडीपीच्या सहयोगाने ट्रुडो यांचे सरकार आतापर्यंत स्थिर होते, परंतु सिंह यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जस्टिन ट्रूडो यांच्या नेतृत्वात कॅनडाची अर्थव्यवस्था ढासळल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या उपपंतप्रधान तथा अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. ट्रूडो यांच्या नेतृत्वात क्रिस्टिया संसदेत ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दलचा अहवाल मांडणार होत्या, परंतु त्याच्या काही तास आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. क्रिस्टिया फ्रीलँ
काही दिवसांआधी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे झालेल्या हिंदू मंदिरावरील हल्लाप्रकरणातील चौथा आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो खलिस्तानी संघटनेचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. इंद्रजीत घोसल असे त्याचे नाव असून गुरूपवंत सिंह यांचा तो युवक निकटवर्ती आहे.
मुंबई : कॅनडामधील ( Canada ) एका हिंदू मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनडामध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानावर झालेल्या हल्ल्याचा कॅनडातील भारतीय वंशाच्या खासदारांनी परखड शब्दांत टीका करत पंतप्रधान ट्रुडोंना दहशतवाद्यांना आश्रय देण्यास जबाबदार धरले आहे.
नवी दिल्ली : ( Canada ) कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तान्यांनी हल्ला केल्यानंतर ‘कॅनडियन नॅशनल काऊन्सिल ऑफ हिंदू’ (सीएनसीएच) या संघटनेने कॅनडियन राजकारण्यांना मंदिरात प्रवेश करू न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘सीएनएचएच’तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “ब्रॅम्प्टनमधील गोर रोडवर असलेल्या हिंदू मंदिराला हिंसक घटनेदरम्यान खलिस्तान समर्थक आंदोलकांनी लक्ष्य केले होते.
Hindus कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण यामुळे हिंदूंचा क्रोध शांत होत नाही. कॅनडात मोर्चा काढून त्यांनी आपल्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
Khalistani गटाने हिंदू गटाला लक्ष केले गेले असल्याची घटना कॅनडा येथे घडली आहे. मात्र या हल्ल्याला आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी ब्रॅम्प्टन येथील मंदिरात हिंदू भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. देशात हिंसाचाराची कृत्ये अस्वीकार्य आहेत. रविवारी हिंदू मंदिरात भाविकांच्या एका गटाला कथित खलिस्तानी समर्थकांनी लक्ष्य केले गेले. यामुळे आता याप्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे.
Khalistan भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरचे मृत्यूपत्र देण्यास नकार देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय एजन्सी एनआयएने कॅनडाकडून निज्जरचे मृत्यूपत्र मागितले. जेणेकरून त्यांच्यावरील खटले न्यायालयात अद्ययावत करता येतील. यावर आता कॅनडाने भारताच्या या विनंतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी भारताला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संघर्षाचे नवे अध्याय दिवसेंदिवस निर्माण होत असतानात आता एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना एका घटनेचा गौप्यस्फोट केला आहे. कॅनडामध्ये असताना काही खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामधून मी थोडक्यात बचावलो. भारताच्या आणि भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील झालेल्या बेबनावाला पूर्णपणे जस्टिन ट्रूडो जबाबदार असून, ट्रूडो हे खलिस्तानी प्रोपोगंडाचा प्रचार करत आहेत असे जाहीर विधान पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे. ट्रूडो यांना केवळ शीखांची मतं मिळवायची असून, जाणीवपूर्वक खलिस्तानी लोकांना फूस लावली जात आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडवल्यानंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या समोर आता नवीन आव्हान उभे राहिले आहे. ट्रूडो यांच्याच पक्षातील खासदारांनी त्यांना २८ ऑक्टोबरच्या आत राजीनामा द्यायला सांगितला आहे. खासदारांचा हा सल्ला ट्रूडो यांनी मान्य केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांच्याच पक्षातील लोकांनी दिला आहे.
नवी दिल्लीतील रोहिणी परिसारात, रविवारी सकाळी झालेल्या स्फोटामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता नवीन माहिती समोर आली आहे. या स्फोटाची जबाबदारी खालिस्तान जिंदाबाद फोर्सने घेतली आहे. टेलिग्राम वर या संदर्भातील पोस्ट व्हायरल करत संघटनेने ही माहिती दिली.
भारत आणि कॅनडा मध्ये सुरू असलेल्या वादामध्ये आता एक नवीन खुलासा समोर आला आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजीव कुमार वर्मा यांनी असा दावा केला आहे की, शीख फुटीरतावादी हे कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेचे हस्तक आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांना खुद्द कॅनडा सरकार प्रोत्साहन देत असते.
खलिस्तानी आणि कॅनडाच्या ट्रुडो सरकारचे लागेबांधे हे तसे सर्वश्रूत. मतपेढीच्या लांगूलचालनाचा हा कॅनडामधील केविलवाणा प्रकार. भले, मग या खलिस्तानींमुळे भारताशी संबंध बिघडले तरी बेहत्तर अशीच ट्रुडो सरकारची आजवरची भूमिका. पण, आता कॅनडामधील विरोधी पक्षनेते आणि लोकप्रतिनिधींच खलिस्तानींना पाठीशी घालणार्या ट्रुडो यांना खडे बोल सुनावले आहेत.
( Randhir Jaiswal )भारताने कॅनडाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती केली होती. मात्र, कॅनडाने त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही; अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारला सुनावले आहे.
खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या मृत्यूमुळे भारता आणि कॅनडा या देशांमधील तणाव वाढत असताना, या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. कॅनडाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांच्या मते निज्जर याची हत्या रिपुदमन सिंग मलिक याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी झाली होती.
India-Canada row : भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांतील तणाव वाढण्याचं कारण काय? भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा भारतात का परतले? नेमकं काय घडलं जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
(India-Canada Diplomatic Row)हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे पुन्हा भारतावर बिनबुडाचे आरोप करत, भारताच्या कॅनडामधील राजदूतांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताने कॅनडातील उच्चायुक्त आणि सर्व अधिकार्यांना पुन्हा मायदेशी बोलावले आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याचे दिसून आले आहे. भारताने कॅनडामधील राजदूतांना आणि उच्चपदस्थ अधिकारी यांना मायदेशी बोलवण्यात आले आहे.
Bangladeshi Hindu बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली. बांगलादेशी आंदोलकांनी शेख हसीनांचे सरकार पाडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर बांगलादेशी कट्टरपंथींनी हिंदूंवर अन्याय, अत्याचार केले. बांगलादेशातील हिंदू देव देवतांचे मंदिर, पाडण्यात आले. हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. हिंदू महिला, तरूणींवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात १० ऑगस्ट रोजी कॅनडात मोर्चा काढून बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणावर प्रश्न उपस्थित केला
युरोप, आखाती देश आणि अनेक प्रगत देशांना कामगारांची मोठी कमतरता जाणवते. त्यामुळे या देशांमध्ये भारतातील कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, या देशांमध्ये बरेचदा कामगारांचे शोषण होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे प्रकार थांबवण्याकरिता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, यामध्ये सरकारी यंत्रणांनी पूर्णपणे लक्ष घालून, परदेशातील भारतीय कामगारांचे शोषण हे थांबवलेच पाहिजे.
कॅनडामध्ये खलिस्तानी मुद्द्यावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. खलिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ३३१ जणांचा मृत्यू झाला होता.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दि. १५ जून २०२४ रोजी भारतासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. इटलीतील जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे, जून २०२३ मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला कॅनडाच्या भूमीवर ठार केल्याचा आरोप ट्रुडो यांनी भारतावर केल्याने दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधात तणाव निर्माण झाला होता.
भारताशी स्पर्धा करण्यासाठी तयार असलेल्या चीनने खलिस्तानी फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी चीन बनावट सोशल मीडिया अकाउंटचाही वापर करत होता. जेणेकरून भारतााबाहेर राहणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना एकत्र करता येईल. यासाठी चीन बॉट्सची मदत घेत होता, मात्र फेसबुकची मूळ कंपनी मेटाने त्याच्यावर कारवाई केली आहे. मेटाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये चीनच्या चुकीच्या धोरणांचा खुलासा केला आहे,
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी केली. या वेळी ट्रुडो या भारतविरोधी घोषणांवर हसत राहिले आणि त्यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ट्रुडोच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कॅनडा सरकारची भारतविरोधी वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील टोरंटो या मोठ्या शहरात आयोजित खालसा डे सेलिब्रेशनमध्ये हा प्रकार घडला. या कार्यक्रमाचे आयोजन शीख संघटनांनी केले होते. कॅनडाचे अनेक खासदार, टोरंट
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारताने कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याचे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले. हा अहवाल कॅनडाच्याच उच्च अधिकार्यांच्या समितीने जाहीर केला, हे विशेष. त्यामुळे २०२१ साली कॅनडाने भारतावर केलेले आरोप हे सर्वस्वी बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
भारत - कॅनडा या उभय राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा नवा वाद उफाळून आला आहे. भारताने आपल्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप कॅनडाने केला आहे. या आरोपांना भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कॅनडाच्या नव्या आरोपांमुळे भारताकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, कॅनडाने केलेले आरोप निराधार असल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अरविंद केजरीवालांना झालेली अटक ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून करण्यात आली. असे असतानाही अमेरिकेने केजरीवालांना निष्पक्ष, न्याय्य वागणूक मिळावी, अशी अनावश्यक टिप्पणी केली. पण, लोकशाही यंत्रणा, न्याय व्यवस्था, मानवाधिकार यांच्याबाबत आज अमेरिकेची परिस्थिती भारतापेक्षाही बिकट असेच म्हणावे लागेल.
भारत जागतिक मुत्सद्देगिरीच्या यादीत ११व्या स्थानी पोहोचल्याची माहिती नुकतीच समोर आली. लोकसंख्येच्या तुलनेत कमी राजनैतिक अधिकारी असतानाही भारताने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण हे भल्याभल्यांना अचंबित करणारे ठरले. म्हणूनच भारताची मुत्सद्देगिरीच्या क्रमवारीत सुधारणा झाली. नवनवीन देशांशी संबंध प्रस्थापित करत ‘ग्लोबल साऊथ’चा निर्विवाद नेता ही भारताची नवी ओळख यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
कॅनडातील दक्षिण सरे येथील सिमरनजीत सिंग नावाच्या खलिस्तान समर्थकाच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला असून रात्रभर गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सिमरनजीत सिंग हा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरचा मित्र होता. हा हल्ला अमली पदार्थांच्या तस्करीबाबत टोळीयुद्ध असल्याचेही बोलले जात आहे. त्याचवेळी अमेरिकेत दोन खलिस्तान समर्थक गटांमध्ये हाणामारी झाली आहे.
कॅनडातील आणखी एका खलिस्तानीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सरकारने बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा सदस्य आणि गुंड लखबीर सिंग लांडा याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. लांडावर भारतात खून आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
‘द ग्रेट अमेरिकन ड्रीम’च्या नादात, चांगल्या जीवनशैलीच्या स्वप्नपूर्तीसाठी आजही जगभरातून लाखो लोक अमेरिकेची वाट धरतात. पण, मग ज्यांना अमेरिकेचे मार्ग विविध कारणास्तव आडवळणाचे वाटतात, त्यांची पावलं अमेरिकेसम जीवनमान असलेल्या देशांकडे वळतात. यामध्ये मुख्यत्वे युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांचा समावेश. त्यात अलीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे तर जागतिक स्तरावर स्थलांतराचा वेग आणि स्थलांतरितांचे लोंढे विकसित देशांच्या सीमांवर आदळू लागले. त्यामुळे शिक्षण, रोजगार असो अथवा मायदेशातील युद्धसदृश परिस्थिती, अशा विवि
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्वात मोठी ख्रिश्चन संघटना 'चर्च ऑफ नॉर्थ इंडिया'चा (सीएनआय) परकीय निधीसंबंधीचा परवाना (एफसीआरए) परवाना रद्द केला आहे. आता ही संस्था परदेशी देणग्या स्वीकारू शकणार नाही. ही ख्रिश्चन संघटना गेल्या पाच दशकांपासून भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचे काम करत आहे.
कॅनडातील खलिस्तान्यांनी आता हिंदू मंदिरांचा वापर भारतविरोधी घोषणा देण्यासाठी करण्याचे तंत्र अवलंबलेले दिसते. तथापि, हिंदूंनी खलिस्तान्यांना ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत चोख प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे भारतद्वेष्ट्या आणि आता हिंदूंच्या जीवावरही उठलेल्या खलिस्तानी दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याशिवाय पर्याय हा नाहीच!
'वसुधैव कुटुम्बकम्’ हा शब्द भारतीयांसाठी नवीन नाही. पाश्चात्य देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’जी २०’च्या निमित्ताने त्याची नव्याने ओळख करून दिली. हा शब्दप्रयोग विविध देशांत वेगवेगळ्या स्वरुपांत वापरला जातो. नोव्हेंबर महिना उजाडताच अमेरिकेसह कॅनडा आणि लगतच्या देशांमध्ये ‘थँक्सगिव्हिंग’ची चर्चा होत असते. ’थँक्सगिव्हिंग’ म्हणजेच ’कृतज्ञता’ अथवा ‘आभार.’ गेल्या काही वर्षांत त्याचे वारे आपल्याकडेही वाहू लागले आहेत. ‘थँक्सगिव्हिंग’ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या आरोपांबाबत कॅनडा सरकारकडून पुरावे मागितले आहेत.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव पुन्ही एकदा वाढण्याची शक्यता आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसंदर्भात ट्रुडो यांच्या आरोपांवर पुन्हा एकदा पुरावे मागितले आहेत.
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट असल्यानेच कॅनडाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत जॉर्डनने मांडलेल्या ठरावात दुरूस्ती सुचवली. तेव्हा, भारताने कॅनडासोबतच्या बिघडलेल्या राजनैतिक संबंधांचा विचार न करता, तिला पाठिंबा दिला. कारण ही दुरूस्ती ‘हमास’च्या दहशतवादी कारवाईविरोधात होती. मानवतावादाचे कारण पुढे करत खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई न करणारा कॅनडा ‘हमास’विरोधात दुरूस्ती आणतो, तेव्हा तो म्हणूनच दुटप्पीपणा ठरतो.
कॅनडातील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोइलिवरे यांनी भारतासोबतच्या राजनैतिक वादावर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे. गेल्या आठ वर्षांत ट्रुडो यांची कोणतीही किंमत राहिलेली नसून भारतासह जगभरात त्यांचे हसे झाले आहे, असे पोइलिवरे यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये लपलेला भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी मारला गेला आहे. या दहशतवाद्याचे नाव दाऊद मलिक असल्याचे सांगितले जात असून तो 'जैश-ए-मोहम्मद' या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा आहे. 'जैश-ए-मोहम्मद' व्यतिरिक्त दाऊद मलिक हा लष्कर-ए-जब्बारचा संस्थापकही होता. त्याचा लष्कर-ए-झांगवीशीही संबंध होता.
भारतामध्ये कॅनडाच्या राजनयिका अधिकाऱ्यांची संख्या प्रमाणाबाहेर होती. या अधिकाऱ्यांकडून सातत्याने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ केली जात असल्यानेच त्यांना परत पाठविण्यात आले आहे, असे भारताने कॅनडास सुनावले आहे.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात मोहम्मद रेहान सोशल मीडियावर खोटी प्रोफाइल बनवून मुलींना फसवत असे. तो मुलींना मॉडेलिंगचे आमिष दाखवून न्यूड फोटो काढण्यास सांगत असे. त्यानंतर या फोटोंच्या माध्यमातून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा. पोलिसांनी मोहम्मद रेहानला अटक केली आहे.मोहम्मद रेहान मॉडेलिंगच्या नावाखाली मुलींचे फोटो मागायचा. त्यानंतर तो त्यांना ब्लॅकमेल करायचा. यावेळी एका मुलीला त्याच्यावर संशय आला. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला माहिती दिली. त्यामुळे या भामट्याला पकडण्यात मोठी मदत झाली
जगभरातील बरेचसे पक्षी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करतात, हे आपण जाणतोच. आपल्या भोवतालाच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी नैसर्गिकपणे घडणारी ही प्रक्रिया. जगभरातील लाखो पक्षी विविध हंगामांत स्थलांतर करतात. काही पक्षी प्रजननाच्या कालावधीत, तर काही ऋतूबदलानुसार स्थलांतराचा निर्णय घेतात. पक्षी स्थलांतराच्या या कालावधीमध्ये वातावरणात होणारे बदल आणि या बदलांचे परिसंस्थेतील इतर घटकांवर होणारे परिणाम, यांचेही सहसंबंध जोडलेले आहेत. त्यामुळे पक्षी स्थलांतरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या प्रजा
इस्रायल-‘हमास’च्या संघर्षानंतर भारतविरोधी शक्तींनीही बेटकुळ्या फुगवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. मग पाकिस्तानी असो वा खलिस्तानी, त्यांनी भारतालाही ‘हमास’सारखा खुनी हल्ला सहन करावा लागेल, अशी फुटकळ धमकी देण्याचे उद्योग केले. म्हणा, अशा धमक्यांना मोदी सरकारने यापूर्वीही कधी भीक घातली नव्हती आणि भविष्यातही हे धमकी देणारे ‘अज्ञातां’च्या हस्ते कधी यमसदनी धाडले जातील, हेही सांगणे अवघडच. पण, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशीच खलिस्तानींची सध्याची गत!