वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असून हा निचपणाचा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
Read More
(Uday Samant) राज्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेत कुणाचे इनकमिंग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( sunil prabhu on kadivali MIDC land ) कांदिवली औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या भूखंडाचा नियमबाह्यरित्या व्यवसायिक वापर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या जागेवर बार, पब, जिम आणि दुकाने थाटण्यात आली आहेत. विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे आ. सुनील प्रभू यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. चारकोप परिसरातील सुमारे 116 एकर भूखंड औद्योगिक वसाहतीला औद्योगिक प्रयोजनासाठी प्रतिचौ.मी. 66 रुपये इतक्या माफक दराने वितरित करण्यात आला. मात्र, त्याचा औद्योगिक वापर न करता नियमांचे उल्लंघन करून बार, र
राज्यातील होर्डिंग्जचे आता दरवर्षी ऑडिट केले जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी याबाबत विधानसभेत ग्वाही दिली.
कोकणचा विकास म्हणजे केवळ मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपला निसर्ग जपत पुढे जाण्याचा प्रवास आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान घेऊन येत आहे, ग्लोबल कोकण महोत्सव २०२५, दिनांक ६ मार्च ते ९ मार्च दरम्यान नेस्को ग्राउंड, गोरेगाव (मुंबई) येथे हा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उद्योग मंत्री उदय सामंत भूषवणार असून, या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले असणार आहेत. या महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे माहिती तं
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील " असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिम्मित आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मराठी भाषेला सातासमुद्रापार नेण्यास हातभार लावणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या नावाने त्यांच्या मूळ गावी शिरवाडे-वणी येथे कुसुमाग्रज महोत्सव होणार आहे. हा महोत्सव पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार असून तो दोन दिवस चालेल अशी घोषणा उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली.
(Marathi) मराठी ही जागतिक भाषा आहे. जगातील 12 कोटी लोक ही भाषा बोलतात. जगभरात मराठीचे पाईक असलेले शिलेदार तुम्हाला सापडतील. ही व्यवहाराची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, तंत्रज्ञानाची भाषा आहे, अध्यात्माची भाषा आहे, संवादाची भाषा आहे आणि वेळ पडलीच, तर ‘हर हर महादेव’ म्हणत रणगर्जना करण्याचीही भाषा आहे. ‘एआय’पासून सर्व प्रवाह या भाषेने तत्काळ आत्मसात केले आणि म्हणून ही भाषा आज टिकून आहे, वृद्धिंगत होत आहे.
(Uday Samant Meet Raj Thackeray) राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी शनिवारी दि. २२ फेब्रुवारीला सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
भविष्यात आम्हाला भास्कर जाधवांचे मार्गदर्शन मिळणार असेल तर स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली होती.
आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी, असे आदेश उबाठा गटाच्या खासदारांना आलेत. भविष्यात जेवण काय करायचे? याबाबतचे येऊ शकतात, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुक हाच खरा संजय राऊतांचा पोटशूळ आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला.
उबाठा गटाचे आणि मविआचे १० ते १२ आमदार टप्प्याटप्प्याने शिंदेंचे नेतृत्व स्विकारणार, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
संजय राऊतांचे विधान हा राजकीय बालिशपणा आहे, असे प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले. ते सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला.
पुढच्या ८ दिवसांत उबाठा गटातून शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला काही समाजकंटकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशातच आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे की जर का उद्योजकांना खंडणीसाठी कुणा माफियाने किंवा गुंडाने धमकी दिल्यास त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन त्यावर बोलावे, सरकार त्या उद्योजकांना संरक्षण देईल. दहशत माजवणाऱ्या अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे असे मत त्यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
उबाठा गटाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला नाही तर राजकारणात टिकणार कसे? अशी प्रतिक्रिया उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उबाठा गटाने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
Marathi language ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना आज दि : ८ जानेवारी २०२५ रोजी जारी केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे सोमवारी बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दोघेही परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरभरून मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींना ( Ladki Bahin ) देवाभाऊंनी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) पहिल्याच अधिवेशनात विशेष भेट देऊ केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवार, दि. १६ डिसेंबर रोजी तब्बल ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी ३ हजार १५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी : बांगलादेशात ( Bangladesh ) हिंदू व अल्पसंख्याकांवर घडत असलेल्या अत्याचाराविरोधात आता संपूर्ण भारत आवाज उठवत आहे. राष्ट्रीय मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशात घडणाऱ्या घटनेप्रकरणाविरोधात मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये रत्नागिरी शिवसेना आमदार उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी बांगलादेशात भारतीय अल्पसंख्यांकांवर जो अन्याय होत आहे तो निषेधार्ह असल्याचे सांगून केंद्रसरकारकडे बांगलादेशची परिस्थिती
जर एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार की, नाही याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, यावर आता उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांचा सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजीपासून पालघर ते सिंधुदुर्ग असा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध नागरिक त्यांचे मनोमन स्वागत करत असून ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत कमळ फुलणार असा आशीर्वाद देत आहेत.
एकीकडे विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. सोमवारी मध्यरात्री त्यांनी ही भेट घेतली असून त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही.
उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्वाचे आहे. हेलिकॉप्टर सेवा, टुरिस्ट सर्कीट तयार केल्यास मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये, यासाठी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, दि. १० जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले. आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहीर, ॲड.अनिल परब, प्रवीण दटके आदींनी सहभाग घेतला.
बेस्टमधील भंगार भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी सभागृहात केली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शेलारांनी बेस्ट बसमधील भंगार घोटाळ्याचा प्रश्न सभागृहात मांडला. दरम्यान, यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
“मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे काम मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत रुग्णखाटा, तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, व्हेंटिलेटर, इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेचे पैसे कुठे जातात? सायन रुग्णालयाचा पुनर्विकास कधी होणार?” असा प्रश्न भाजप आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी विधानसभेत विचारला.
नुकतीच भाजपची आणखी एक यादी जाहीर झाली असून यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या जागेसाठी उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संजय राऊतांची रोज सकाळची पत्रकार परिषद आपण एवढी गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. याबद्दल उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. ते शनिवारी माध्यमांशी संवाद साधत होते.
उबाठा गटाचे ८ आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट घडवून देणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत सध्या रामटेक दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.
"एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार जेव्हा गुवाहाटीला होते, तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तेथे येण्यासाठी तयार होते. मात्र, आम्ही भास्कर जाधव यांना पक्षात न घेण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यांच्यासारखे व्यक्ती आपल्या सोबत नको, अशी भूमिका मी मांडली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना येऊ दिले नाही," असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक सुचक ट्विट केलं आहे.
बहुचर्चित कोस्टल रोडचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या आठ दिवसांत सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी विधानपरिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’तून देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
दावोसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नसले तरी त्यांचे अदृश्य हात त्याठिकाणी काम करत होते, असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की, महायुतीत फडणवीस हेच सुपर सीएम आहेत. कारण पडद्यामागून सर्व काही तेच ठरवत असतात. नागपुरात "पेनॉर्ड रिकार्ड" या वाईन कंपनीसोबत महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने सामंजस्य करार केले. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी हे विधान केले आहे.
राज्याच्या आर्थिक प्रगतीस राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)चा आधार मिळणार आहे. राज्य सरकार आणि एनएसई यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आयपीओचा वापर करून विस्तृतपणे आर्थिक धोरण मांडणे या अटीवर सरकारसोबत करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत राज्यातील एमएसएमईंना पुढे येण्याचे आवाहन करतो आणि त्यांनी एनएसई इमर्जद्वारे वित्तपुरवठ्याच्या नवीन स्त्रोताचा लाभ घ्यावा, असे राष्ट्रीय शेअर बाजार वरिष्ठांकडून स्पष्ट करणयात आले.
अभिषेक घोसाळ कर यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने ८ फेब्रुवारीला गोळ्या झाडुन हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःला ही गोळ्या झाडुन आत्महत्या केली. यानंतर संजय राउत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. मॉरीस मुख्यमंत्र्यांना भेटला होता असा आरोप त्यांनी केला. याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिल आहे. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे अस त्यांनी म्हटल आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते मिलींद देवरा हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. मिलींद देवरा हे मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणुक लढवण्यात इच्छूक आहेत. पण काँग्रेस पक्षातू त्यांना तिकीट मिळणार नसल्याने ते शिवसेनेत जाणार असल्याच सांगितल जात आहे.
काँग्रेसचे ७ ते ८ जण कमळावर लढण्यासाठी तयार आहेत, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून न्युज १८ लोकमतशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सतेज पाटलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना हे वक्तव्य केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडी' आघाडीने बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, त्यांच्या कितीही बैठका झाल्या, तरी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार नाही आणि लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा ठाम विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. सोमवार, २५ डिसेंबर रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लग्न झाल्यानंतर पत्नीची जात मुलांना मिळत नाही हा देशात सगळीकडे नियम आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून बघाव्या, असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून आता राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे. मनोज जरांगेंकडे अधिक वेळेची मागणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ गेल्याचे सांगण्यात येत आहे.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त चौकशी समितीच्या अहवालानंतर सहायक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) आणि व्याख्यात्यावर (लेक्चरर) कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, दि. २० डिसेंबर रोजी दिली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता.
देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मोठ्या प्रमाणात जाळला जातो. याचा रुपीनगर आणि तळवडे भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेवून कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
मुंबईतील आग्रीपाड्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आयटीआय) राखीव असलेल्या जागेचे आरक्षण बदलून तेथे उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा घाट तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, या जागेवर उर्दू लर्निंग सेंटरऐवजी ‘आयटीआय’ भवन उभारण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १९ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाईल, तसेच, भूसंपादन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल्, असे आश्वासन राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले.
'लघु उद्योग भारती’च्या भूषण मर्दे यांनी गेल्या रविवारच्या (दि. 10 डिसेंबर) दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अंकात उद्योगधंदे महाराष्ट्र सोडून इतर राज्यात का जातात, याविषयी अगदी सविस्तर मांडणी केली आहे. त्यांनी उदाहरणादाखल तीन-चार उदाहरणे मुंबई, पालघर, खेड येथील दिली असून, कमी-अधिक प्रमाणात याची झळ चोहीकडेच जाणवते.
असा विषय कोणतरी मांडत आहे, हेच मुळात कौतुकाचे आहे. कोल्हापूर कागल ‘एमआयडीसी’चे पण असेच आहे. येथे स्थानिक राजकारणी आपल्याच कागलचे लोक स्टाफ म्हणून घ्या, कामगार म्हणून घ्या, असे उद्योजकांवर लादतात. पुढे हे कामगार आळशी बनतात. कारण, त्यांच्यामागे मोठा वरदहस्त आहे, हे त्यांना चांगलेच माहीत असते. ’रेमंड’सारखी कंपनी असो की किर्लोस्कर ऑईल इंजिन, सर्वांनाच या समस्येला सरसकट सामोरे जावे लागते. शेवटी वैतागून काही मोठ्या कंपन्या धारवाडला गेल्या आणि काही राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर आहेत.