धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
Read More
केरळमधील सर्वात मोठ्या विद्यापीठात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला ‘इंतिफादा’ असे नाव देण्यात आले आहे. केरळ विद्यापीठात दि.७ मार्च ते दि.११ मार्च या कालावधीत होणारा युवा महोत्सव 'आक्रमकतेच्या विरोधात कलेचा निषेध' या टॅगलाइनसह आयोजित केला जात आहे. ज्याचा थेट अर्थ इस्रायल-हमास युद्धात हमासला पाठिंबा आहे. आता या 'इंतिफादा' विरोधात एका विद्यार्थ्याने केरळ आणि लक्षद्वीप हायकोर्टात याचिका दाखल करून नाव बदलण्याची मागणी केली आहे.
हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत इस्रायलच्या दीड हजार पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही पाकिस्तानसारख्या कट्टरवादी मानसिकतेच्या देशांनी हमासचे समर्थन केले आहे. याच दरम्यान आता एका पाकिस्तानी महिला खासदाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
भारतातील तथाकथीत फॅक्ट चेकर पत्रकार मोहम्मद जुबेर यांच्यावर सतत हिंदू धर्मीयांविषयी द्वेष पसरवण्याचे आरोप केले जातात. आता असाच आरोप अमेरिकन शोध पत्रकार एमी मीक यांनी मोहम्मद जुबेरवर आणि त्यांच्या आल्ट न्यूज या वेबसाईटवर लावला आहे.
हमासने इस्त्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत हजारो इस्त्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत इस्त्रायला पाठिंबा दिला आहे. पण भारतातील काही कट्टरपंथी मानसिकतेच्या लोकांनी इस्लामिक दहशतवादी संघटना असलेल्या हमासचे उघडपणे समर्थन केले आहे.
नवी दिल्ली : देशभरात येत्या मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या आणि लव्ह जिहादसह दहशतवादाचे सत्य मांडणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसला पोटशूळ उठण्यास प्रारंभ झाला आहे. हा चित्रपट म्हणजे संघ परिवाराचा अजेंडा आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले. गेल्या अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या यासंबंधीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. आता तो अहवाल समोर आला आणि चीन वगळता स्वतःला मानवाधिकारवादी, उदारमतवादी वगैरे म्हणवून घेणार्या देशांमध्ये खळबळ माजली.
ऑगस्ट महिन्यात तालिबानने हळूहळू अफगाणिस्तान गिळंकृत केले. त्यानंतर तिथे जे काही अराजक माजले, ते अख्ख्या जगाने विविध माध्यमांतून पाहिले, वाचले. तालिबानच्या अधिपत्याखाली आलेला हा देश जणू आता आपला नाहीच, म्हणून परकीयांनी आक्रमण केल्याप्रमाणे अफगाणी नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आपल्याच देशातून पलायन करण्यासाठी जीवाचे अक्षरश: रान केले. काहींनी तर चक्क ट्रकप्रमाणे विमानावर चढून आपला जीवही गमावला. पण, त्या अनागोंदीतून दिसून आली ती सामान्य अफगाणी माणसाची अगतिकता अन् हतबलता.
इस्लामी दहशतवादामुळे आपले घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास प्रारंभ झाला आहे. जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत काश्मीरी पंडितांसाठी २ हजार ७४४ फ्लॅट्स उभारण्यासाठी २७८ कनाल जमिन हस्तांतरित करण्यास नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे.
युरोपात वाढत्या दहशदवादी हल्ल्यांच्या घटनांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. गेल्या चार महिन्यांत हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रीयाची राजधानी वियाना येथेही हल्लेखोरांनी गोळीबार केला. जगभरातून या अशा घटनांची निंदा केली जात आहे. काही घटनांमध्ये तर केवळ एकच दहशतवादी होता. कोरोना विषाणू महामारीशी लढत असताना दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे.
‘इसिस’च्या संकटांच्या संदर्भात प्रचंड जनजागृती करीत राहिली पाहिजे. कारण, ‘इसिस’चे तत्त्वज्ञानcलोकांना जीवंत राहण्याचा अधिकार नाकारते. मानवी स्वातंत्र्याला इथे काही किंमत नाही. स्त्री स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्य नाही, ‘कुराण’ सोडून अन्य धर्मग्रंथ त्यांना मान्य नाहीत. अनेकता, बहुविधता त्यांना मान्य नाही. प्रेषिताच्या काळातील शुद्ध इस्लाम जगात आणला पाहिजे आणि जेथे जेथे मुसलमान आहेत त्यांनी शुद्ध इस्लामचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी त्यांची शिकवणूक आहे.
इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल आणि त्यातही जगातला सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश असल्यामुळे ‘इस्लामी राष्ट्र संघटनेत’ (Organisation of Islamic Countries) त्याचं एक विशिष्ट वजन आहे. पाकिस्तानने त्या व्यासपीठावर काश्मीर प्रश्न वेळोवेळी उपस्थित करून इतर सभासद देशांना प्रक्षोभित करण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. पण इंडोनेशियाच्या ठाम भूमिकेमुळे भारताच्या निषेधाचे संयुक्त पत्रक कधीही त्या व्यासपीठावरून निघू शकले नाही. त्याउलट इस्लामी दहशतवादाविरुद्ध भारताने घेतलेल्या भूमिकेला इंडोनेशियाने नेहमीच पाठिंबा दर्शवला आणि स