सावरकर दीर्घ लिहितात. अवजड लिहितात. पण सुलभ लिहितात. ही त्यांच्या लाडक्या हिंदभूमीला समर्पित कविता. त्यांची लेखणी त्यांच्या स्वप्नांशी, इच्छांशी आणि भावनांशी नेहमीच प्रामाणिक राहिली. स्वातंत्र्यवीरांच्या राजकीय कारकिर्दीइतकीच त्यांची लेखणीही स्फोटक आहे असे मला नेहमीच वाटते. त्यांच्या कित्येक कविता आत्मप्रेरित तर कित्येक आत्मप्रेरणेसाठी लिहिल्या गेलेल्या आहेत.
Read More