आध्यात्मिकदृष्ट्या नामस्मरणाचा अभ्यास हा अनुभूतीचा आहे. तो नुसत्या बोलण्याचा विषय नाही. हा अनुभव प्रत्येकाला आपापल्या पात्रतेनुसार मिळत असतो. हा चंचल मनाशी संबंधित असल्याने भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे येथे यशासाठी ‘अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते।’ अभ्यासाने आणि वैराग्याने मन वश होते.त्यामुळे नामस्मरणातील पात्रता अभ्यासाने आणि वैराग्याने वाढवता येते.
Read More