ठाणे : आत्मस्वराने गाण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर ( Daji Panshikar ) यांनी व्यक्त केले. दाजी पणशीकर लिखित 'गान सरस्वती आदिशक्तिचा धन्योद्गार' या मॅजेस्टिक प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मॅजेस्टीक पब्लिशिंग हाऊस आणि तारांकित संस्था यांच्या वतीने शनिवारी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमात पणशीकर यांनी ‘किशोरीताईंचे प्रातिभदर्शन आणि मी’ या विषयावर व्याख्यान दिले.
Read More
आर्यजन भोगवस्तूच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका अर्थाने भोगघटनेला चिरीत जाऊन त्यापलीकडील सत्य जाणण्याचा सर्वदा प्रयत्न करतात. म्हणून ते आर्य. कधीच थांबत नाहीत आणि कधीच नष्ट होत नाही. सतत पुढे जाणारा, भोगातून अमर आनंद प्राप्त करणारा तो ‘आर्य असतो मा सद्मय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’ म्हणून जो सामर्थ्यवान असेल तोच भोग भोगू शकेल. शक्तिहीनांना काहीच प्राप्त होऊ शकत नाही.
रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आसन, प्राणायम, मन:शांतीसाठी ध्यान यांना वेळ दिलाच पाहिजे. कारण, रोजच्या योगसाधनेने कार्यकुशलतेबरोबर कामाचा दर्जाही वाढू लागतो. म्हणून योग हा रोजच्या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक असणे अत्यावश्यक आहे.