नवी दिल्ली : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील नागरिकांसह अल्पसंख्याकांचे संरक्षण ( Protect Hindus ) करण्यासाठी जबाबदार आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी संसदेत केले आहे.
Read More
"स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली. त्यामुळेच याचिकाकर्त्यांना न्यायालयात जाण्यास अवधी मिळाला. हिंदुत्वनिष्ठांची दिशाभूल करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर शासनाने कारवाई करावी.", अशी मागणी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे निमंत्रक बाबासाहेब भोपळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (Vishalgad News Update)
गेले वर्ष हे मानवी इतिहासातील सर्वात तप्त वर्ष ठरले. पृथ्वीवरील वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे जगभर तापमानवाढीची समस्या जाणवत आहे. पण, पर्यावरणातील या बदलांमध्ये मानवी जीवनशैलीचा सर्वात मोठा हात आहे, ही गोष्ट चिंताजनक. जगातील विकसित देशांनी गरीब देशांच्या साधनसंपत्तीची लूट करून, आपले समाज विकसित केले. ते करताना पर्यावरणाचा समतोल बिघडविला. त्याचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
सीमावादाकडे पाहताना भाषा, स्थानिक संस्कृती, वैविध्य महत्त्वाचे आहे, हेदेखील मान्य केले पाहिजे. कारण, व्यापक हिंदू समाज अशा बहुविधांमधूनच निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याचा योग्य तो सन्मान राखलाच पाहिजे. मात्र, त्याचे राजकारण करून एकमेकांना हुलकावण्या देण्यापेक्षा आपल्या परिसराचा विकास कसा करता येईल, याचाही विचार केला पाहिजे.
जागतिक वारसास्थळातील आठव्या मानांकनात स्थित असलेल्या पश्चिम घाट आणि त्यात प्रदेशनिष्ठ असलेल्या जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जतन करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, याच जबाबदारीची जाणीव करून देणारा हा लेख...
आंतरराष्ट्रीय वृक्षारोपण दिनाच्या निमित्ताने 'स्पीहा' या संस्थेने चार खंडातील २००हून अधिक ठिकाणी ५५ हजारहून अधिक रोपे लावून सर्वात मोठी वृक्षारोपण मोहीम राबवली आहे. स्पीहा या संस्थेने २००६ मध्ये भारतातील आग्रा येथून आपले कार्य सुरू केले. आणि आज जगभरात २०० हून अधिक ठिकाणी शाखा आहेत.पर्यावरण आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्दिष्टांचा आणि वचनबद्धतेचा एक भाग म्हणून स्थापना झाल्यापासून वार्षिक वृक्षारोपण करत आहे.
अर्थव्यवस्थेसाठी विकास आवश्यक आहेच परंतु भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दि. ०१ रोजी सांगितले. विशाखापट्टणमच्या रुशीकोंडा टेकडीवर रिसॉर्ट कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. ही टेकडी पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पास परवानगी दिली आहे.
आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महापराक्रमी तर आहेतच. त्यांच्या पुढे उभे राहायला काळालाही भीती वाटते. पण, एवढ्याने त्याचे वर्णन होत नाही. विश्वातील जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सारे रामाच्या ठिकाणी एकवटले आहेत. पराक्रम, चारित्र्यसंपन्नता, न्यायप्रियता, भक्तांचे रक्षण, दुष्टदुर्जनांचा संहार हे गुण रामाला पाहता क्षणीच जाणवतात. समर्थांच्या काळी म्लेंच्छांच्या विध्वंसक कारवायांमुळे सर्वत्र हिंदू समाजाची वाताहत झालेली होती.
हिंदू संस्कृतीवरील आक्रमण रोखून लोकांना संस्कृतीरक्षणासाठी तयार करणे, हिंदवी स्वराज्यासाठी लोकांना अनुकूल करून घेणे, लोकांच्या मनात रामराज्याची प्रेरणा निर्माण करणे, लोकांना धीर धरा, असे सांगून म्लेंच्छांच्या धाडीची भीती घालवणे, बलोपासनेचे धडे देऊन लोकांमध्ये धैर्य उत्पन्न करणे, लोकांना खरे अध्यात्म व भक्तिरहस्य सांगून त्यांना दांभिक गोसाव्यांपासून सोडवणे, हिंदूंमधील दैवतांचा गल्बला बाजूला सारून लोकांना रामोपासनेला आणि हनुमानाच्या उपासनेला लावणे, अशी अनेक समाजोपयोगी आत्मोद्धाराची कामे स्वत: सूत्रधार होऊन त्