"निःस्वार्थ समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची आहे. ही संवेदना कधीही क्षीण होता कामा नये. कारण संवेदनेतूनच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, उभारी मिळते," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी केले.
Read More
भैय्याजी जोशी आणि सुहासराव हिरेमठ यांचे मनोगत जनकल्याण समितीच्या प्रयोजनाचे आणि वाटचालीचे मर्म सांगणारे. प्रस्तुत स्मरणिका जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा मागोवा घेते. मात्र, त्याचे तेवढेच महत्त्व नाही. हजारो कार्यकर्ते अशा सेवाकार्यांत स्वतःस निरपेक्षपणे झोकून देतात; आपल्या तज्ज्ञतेचे क्षेत्र नसूनही अशी सेवाकार्ये देखील संघटनेच्या आणि तळमळीच्या जोरावर साकार करून दाखवितात आणि हे सगळे करीत असताना कोणताही गाजावाजा करीत नाहीत, हा यातील सर्वाधिक लक्षणीय भाग. गेल्या ५० वर्षांत जनकल्याण समितीची सेवाक