पहलगाम हल्ल्याविषयी भारताने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर कोलंबियाने भारतास पाठिंबा दिला आहे. कोलंबिया सरकारचा हा निर्णय सकारात्मक असल्याचे भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कोलंबियाच्या पाकिस्तानसोबत उभे राहण्याच्या निर्णयाविषयी थरूर यांनी कोलंबियातच जाहिर नाराजी व्यक्त केली होती.
Read More
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा, असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने ' दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता '' धोरण अवलंबिले
भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतीच चित्रकूटला सपत्निक भेट दिली. तेथे त्यांची जगद्गुरू रामभद्राचार्य महाराजांशी भेट झाली. त्यांनी संत आणि विद्यार्थ्यांसमोर भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल सांगितले. यावेळी लष्करप्रमुखांनी रामभद्राचार्यंना गुरुदक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रामभद्राचार्य म्हणाले, "ना रत्ने ना कपडे, मला दक्षिणा म्हणून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हवे आहे." Army Chief with Rambhadracharya
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर पाकिस्तानचा बुरखा फाडत आहेत, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने थरूर यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या देशाबाहेरील तसेच, देशांतर्गत देशविरोधी शक्तींसाठी सरकारने ते तयार ठेवले आहेत.
भारत-पाकिस्तानमधील तणाव संपवण्यावर भाष्य करणारे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे त्यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होताना दिसतोय. सरदेसाई यांनी भारत सरकारला पीओके पूर्णपणे पाकिस्तानला सोपवण्याचा आणि नियंत्रण रेषा आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून स्वीकारण्याचा सल्ला दिलाय. हा व्हिडिओ २२ मे चा असल्याचे सांगण्यात येतेय. Rajdeep Sardesai on PoJK
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ कॅमेऱ्यासह करून त्याविषयी कोणासही पुरावे मागण्याची जागा ठेवली नसल्याचा टोला विरोधी पक्षांना लगावला.
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, आता तो संयमाचा बांध अखेर फुटला आहे.
पाकड्यांनी रचलेल्या वंशविच्छेदाच्या व्यापक कटाबाबतचा खुलासा बलुच नेते मीर यार यांनी नुकताच आपल्या ट्विटमधून केला. 'बलुच लोकांना गॅस गळती करून ठार मारले पाहिजे, आणि तेथील आईच्या गर्भात असलेल्या बाळांनाही ठार केले पाहिजे', असे विकृत विचार पाकिस्तानच्या पंजाप प्रांतातून व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता जगाने पाकिस्तानच्या लष्करावर शस्त्रास्त्र बंदी लादावी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने यासंबंधित एक ठराव पारित करावा अशी महत्त्वाची मागणी बलुचिस्तानमधील लोक करतायत. Balochistan on the Pakistan
"काही महिन्यांपूर्वी इराण-पाकिस्तान-चीन यांच्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या स्तरावर बैठक झाली होती आणि त्यांनी चाबहारला ग्वादरसोबत जोडण्याचा करार केला. जर बलुचिस्तानमधील हे दोन अत्यंत महत्त्वाचे बंदर चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पीएलएच्या (पिपल्स लिबरेशन आर्मी) ताब्यात गेले, तर हे भारत, अमेरिका आणि बलुचिस्तानसाठी अत्यंत विनाशकारी ठरेल.", असे मत बलुच नेते मिर यार यांनी व्यक्त केले. Mir Yar Baloch on Chabahar Port
'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ लष्करी कारवाई नाही, तर ती आपल्या भारतीयांच्या मूल्यांची आणि भावनांची अभिव्यक्ती आहे. याद्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकवून प्रमुख दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील दाहोद येथे केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वडोदरा येथे भव्य रोड शोमध्ये सहभागी झाले. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबियदेखील सहभागी झाले होते.
पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आणि त्यांना संरक्षण देणार्यांच्या नांग्या ठेचल्या. मात्र, पाकिस्तान कितीही बेटकुळ्या फुगवून दाखवत असला, तरीही त्याची खरी शक्ती ही चीनचा पाठींबा हीच.परिणामी पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी, चीन नावाच्या रोगाचा उपचार आवश्यक ठरतो. चीनी पोपटाचा जीव व्यापारात अडकल्याने, त्यावरच घाव घालणे क्रमप्राप्त ठरते. पाकिस्तानसहित तुर्कस्तान आणि चीनला नामोहरम करण्यासाठी अर्थिक बहिष्कार कसा उपयोगी ठरेल याचा घेतलेला आढावा...
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचा बुरखा फाडण्यासाठी परदेशदौऱ्यावर निघालेल्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळने संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या भेटीदरम्यान अबू धाबी येथील जगप्रसिद्ध बॅप्स स्वामीनारायण हिंदू मंदिराला भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भाजप खासदार बन्सुरी स्वराज, मनन कुमार मिश्रा आणि एस.एस. अहलुवालिया, बीजेडी खासदार सस्मित पात्रा, खासदार ई.टी. मोहम्मद बशीर आणि जपानमधील भारतीय राजदूत सुजान चिनॉय उपस्थित होते. all party delegation visits baps temple
विजय वडेट्टीवार यांचे पाकिस्तान कनेक्शन शोधून काढायला हवे, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी एक वादग्रस्त विधान करून ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचा अवमान केला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.
हा नवीन भारत आहे. तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर तुमच्यावर बॉम्बचा वर्षाव केला जाईल, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पाकिस्तान आणि चीनला दिला आहे. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आ
ऑपरेशन सिंदूरबद्दल जगातील प्रमुख देशांना माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानचा दहशतवादासोबतचा संबंध उघड करण्यासाठी भारताचा ‘ग्लोबल आउटरिच प्रोग्राम’ बुधवारपासून सुरू झाला आहे. सात प्रतिनिधी मंडळांपैकी दोन प्रतिनिधी मंडळांना आपल्या प्रवासास प्रारंभ केला आहे.
नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली युट्यूबर ज्योती मल्होत्राने दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा ही सध्या पोलिस कोठडीत असून चौकशीदरम्यान तिच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, ज्योतीने लॅपटॉप आणि मोबाईलमधून डिलीट केलेले व्हिडीओ आणि डेटा जप्त करण्यात यश आले असून यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान बलुचिस्तानातील बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार हल्ला चढवला. भारताने पाकिस्तानची शस्त्रास्त्रे उध्वस्त केलीच, मात्र बलुचिस्तानातील बलुच लिबरेशनल आर्मी सुद्धा पाकिस्तानने खरेदी केलेली चिनी शस्त्रे उध्वस्त करण्यात सक्रीय झाली आहेत. या प्रकरणी समोर आलेल्या एका व्हिडिओने पाकिस्तानची झोप उडवून टाकल्याचे पाहायला मिळतेय. भूसुरुंगाच्या स्फोटात बलुच बंडखोरांनी पाकिस्तानच्या चिलखती वाहनाचे अक्षरशः तुकडे केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते आहे. Balochistan IED attack on Pakistan Army
भारत-पाकिस्तान यांच्यात होऊ घातलेले युद्ध अर्ध्यावरती थांबले असले, तरी त्याची पूर्ण कहाणी समोर यायला काही दिवस लागले. वरकरणी हे युद्ध अनिर्णित अवस्थेत संपले असे वाटले, तरी या युद्धातील अनेक आघाड्यांवर भारताला निर्विवाद विजय मिळाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील घडामोडींचा घेतलेला आढावा...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवार, १८ मे रोजी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. गौरव गोगोई यांना आयएसआय चे निमंत्रण असून या निमंत्रणावरूनच ते पाकिस्तानला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरमा यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी राजुल्ला निजामानी उर्फ अबू सैफुल्ला (खालिद) याची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. माटली शहरातील फलकरा चौकाजवळ दिवसाढवळ्या त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस येते आहे. Pakistan Abu Saifullah Death News
ज्योती मल्होत्रा या महिलेला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून यावर आता तिच्या वडीलांनी मोठा खुलासा केला आहे. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत हे पाकिस्तानसारखेच आहेत, गुन्हे करायचे आणि व्हिक्टीम कार्ड खेळायचं, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच या पुस्तकावरून राजकारण तापले आहे.
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यानिमित्ताने पाकिस्तान दहशतवादी देश आहे हे जगाला कळणार असल्याचे ते म्हणाले. शनिवार, १७ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या अडचणीच प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येतेय. अशातच बलुच नेते मीर यार बलोच यांनी दि. १४ मे रोजी स्वातंत्र्याची घोषणा केली. याचदरम्यान बलुच अमेरिकन काँग्रेसचे सरचिटणीस रझाक बलुच यांनी एक स्फोटक खुलासा केल्याचे समोर येतंय. पाकिस्तानने बलुचिस्तानच्या ८०% पेक्षा जास्त भागावरील नियंत्रण गमावल्याचे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. Pakistan Balochistan Conflict
ज्योती मल्होत्रा. भारतातील एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर. सोशल मीडियावर ज्योतीचे लाखों फॉलोअर्स. मात्र, याच ज्योती मल्होत्रा हिला आता देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनांशी संबंध असल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आलीये. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचाही आरोप आहे. एकीकडे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना ज्योती मल्होत्रा या महिलेचे हे कृत्य उघडकीस आले आहे. मात्र, ही ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे? ती पाकिस्तानच्या संपर्कात कशी आली? आणि ती
भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या करणाऱ्या ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना ज्योती मल्होत्राचे हे कृत्य उघडकीस आले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. ते तर केवळ एक ट्रेलर होते. पाकिस्तानला यातूनही धडा न घेतल्यास संपूर्ण ‘पिक्चर’ही दाखविण्याची भारताची तयारी आहे, असा सणसणीत इशारा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला शुक्रवारी दिला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला भारताने जोरदार दणका देण्यास सुरुवात केली आहे. या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी बुकिंग केलेल्या भारतीय नागरिकांनी त्यांची तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांवर पाकिस्तानी झेंडे किंवा इतर संबंधित वस्तू विकण्यास बंदी घातली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून ‘अ’मेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘उबे’, ‘इट्सी’, ‘द फ्लॅग कंपनी’ आणि ‘द फ्लॅग कॉर्पोरेशन’ या कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या बाबतची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवार १४ मे रोजी अधिकृत एक्स हँलवरून दिली.
भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. अशातच भारत-म्यानमार सीमेजवळ असलेल्याल मणिपूरमधील चांडेल येथे आसाम रायफल्सने १० दहशतवाद्यांना ठार मारल्याचे समोर येत आहे. येथे उपस्थित आसाम रायफल्सना याबद्दल गुप्तचर माहिती मिळाली. त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबवत सदर कारवाई करण्यात आली. Assam Rifles on Myanmar Border
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर हल्ले केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठीकत पाकीस्तानच्या ठिकाणांचे झालेले नुकसान सॅटलाईट चित्रांच्या सहाय्याने दाखवले. पण पाकिस्तान ने हे सगळे खोटे आहे, असा दावा केला होता. मात्र, आता ‘न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका रिपोर्टने पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याचे चित्र सध्या आहे. भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला 'पर्सोना नॉन ग्राटा' असल्याचे घोषित केले. ‘पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणजे अशी व्यक्ती जी नियुक्त केलेल्या पदासाठी अमान्य किंवा अयोग्य असल्याची घोषणा करणे. पाकिस्तानातील भारतीय अधिकाऱ्यावर त्याने पदाच्या मर्यादेबाहेर जाऊन कारवाया केल्या, असा आरोप केला आहे. म्हणून त्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची अखेर सुटका करण्यात आलीये. बुधवार, दि. १४ मे रोजी भारताच्या अटारी बॉर्डरवरून ते भारतात परतले. साधारण २० दिवसांपूर्वी म्हणजेच काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी गस्तीवर असताना चुकून त्यांनी सीमारेशा ओलांडल्याने पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची गर्भवती पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न करत होती. अशातच भारताने पाकिस्तानातील दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यास सुरुवात केल्याने, जवान पू
बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. या प्रदेशात पाकतर्फे दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यामुळे बलुच जनतेने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. समाजमाध्यम ‘एक्स’वर त्यांनी ही घोषणा केली असून ती ट्रेंडींग होत आहे.
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. या मुद्द्यावर भारताने चीनला चोख प्रत्युत्तर देऊन अशा हास्यास्पद प्रयत्नांनी हे वास्तव बदलणार नसल्याचे म्हटले आहे.
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या मुळावरच घाव घातला. त्यामुळे पाकने आता अमेरिकेसमोर लोटांगण घालत काश्मीरवरुन कितीही कांगावा केला, तरी आता भारताकडून चर्चा होणार ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच!
काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केलेच, तर पाकिस्तानी हवाई दलालाही हादरवून टाकले. सोमवार, दि. १२ मे रोजी तिन्ही लष्कर प्रमुखांनी दिल्ली येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची संपूर्ण माहिती दिली. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे डीजीएमओ, एअर मार्शल ए.के. भारती यांनी गोस्वामी तुलसीदास यांच्या 'रामचरितमानस' मधील "विनय न मानत जलधि जड़, गए तीन दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिनु ह
विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी भारतीय हितांना बाधा आणण्याचा प्रयत्न करून पाकला अनुकूल बाबींचा उल्लेख केल्याची टिका थरूर यांनी केली आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांना पाकीस्तानकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नवनीत राणा यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
पाकिस्तान शांत बसणार नसेल ,आणि शब्द देऊनही पाळणार नसेल तर त्यांना एक कडक संदेश देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. रविवार, ११ मे रोजी रत्नागिरी येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांत सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशावेळी रजेवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एका जवानाचे नुकतेच लग्न झाले असून हळदीच्या ओल्या अंगाने जवान देशसेवेसाठी हजर झाला आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री (सोमवार, १२ मे) ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अधिकृतरित्या बोलणार असल्याने ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच भारताचे धोरण असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, जेथे जेथे दहशतवाद असेल; तेथे तेथे त्याच्या मुळावर असाच घाव घातला जाईल. पाकिस्तानसोबच चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रास संबोधित करून ‘ऑपरेशन सिंदूर’चा पराक्रम देशातील माता – भगिनींना समर्पित केला.
"पाकिस्तानचे शांततेचे आणि युद्धविरामाचे वचन फसवणूकीचे आहे. पाकिस्तानच्या वचनांवर विश्वास ठेवण्याचा काळ संपलाय. जर भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली, तर बलुच लिबरेशन आर्मी पूर्व आणि पश्चिम सीमेवर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध निर्णायक कारवाई करतील. पाकिस्तानचा नायनाट झाल्याशिवाय या भागात कधीही कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही.", बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने भारत-पाकिस्तान संघर्षावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.