मुंबई : नीट-यूजी परिक्षेबाबत ( NEET Exam ) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेश परिक्षा (नीट) लेखी पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय चाचणी कक्ष म्हणजेच एनटीएकडून दि. १६ जानेवारी रोजी परिपत्रक काढण्यात आले. पेपर- पेनच्या साहाय्याने ही परिक्षा घेतील जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
Read More
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा दि. २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनंतर एमपीएससीने संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान दहावी आणि बारावीच्या परिक्षा होणार आहेत.
वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा) परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवार, दि. 13 जून रोजी स्पष्ट केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, “नीट’ परीक्षेत पेपर फुटल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्याचप्रमाणे एनटीएमध्येही भ्रष्टाचार सापडलेला नाही. एनटीए ही एक अतिशय विश्वासार्ह संस्था आहे.
वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स एक्झाम) परीक्षेतील अनियमिततेच्या प्रकरणावर मंगळवार, दि. 11 जून रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने परीक्षा आणि समुपदेशन रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. वैद्यकीय प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ‘नीट’ रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
"लहानपणापासूनच त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याने दहावीनंतर महागडे क्लासेसही लावलेत. बारावीची परिक्षा आणि डॉक्टर बनण्यासाठी नीटची (NEET Exam) तयारी या दोन्ही गोष्टी त्याने उत्तमरितीने सांभाळल्या होत्या. नीटच्या परिक्षेचा दिवस उजाडला आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो परिक्षा केंद्रावर पोहोचला. मन लावून पेपरही सोडवला. त्यानंतर निकाल आला आणि तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. मात्र, तरीही त्याला त्याच्या मनाजोग्या शासकीय विद्यालयात मध्ये अॅडमिशन मिळणार नव्हती. का? त्याचा अभ्यास कमी पडला? क
नीट परिक्षेच्या निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. वैद्यकीय प्रवेशपूर्व परिक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. वैद्यकीय प्रवेशपूर्व परिक्षा अर्थात नीट परिक्षेचा निकाल हा वादग्रस्त ठरला आहे. या निकालाविरोधात देशभरातील जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता आम्ही नेमके करायचे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही निकालानंत
१० वी आणि १२ वीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीच्या विद्यार्थांसाठी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. बुधवार, ३१ जानेवारीपासून विद्यार्थी आपले हॉलतिकीट मिळवू शकतील. SSC Board Exam
कर्नाटकातील कलबुर्गी येथे रविवारी एका सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेदरम्यान हिंदू विद्यार्थिनींचे मंगळसूत्र आणि कानातले काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, बुरखा घातलेल्या मुलींना तपासणी करून आत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची परिक्षा १ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे. तर इयत्ता बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे.
देशातील एकुण रुग्णसंख्येपैकी ७० रुग्ण एकट्या केरळमध्ये आहेत. दररोज जवळपास ३५ हजारांच्या घरात नवे रुग्ण आढळत आहेत
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानकपणे सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. यावेळी पालकांनीदेखील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
देशातील करोना संसर्गाची स्थिती ध्यानात घेऊन सीबीएसईची १२ वीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.
उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर १० वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं डॉक्टरांना सक्तीचं केलं आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
दिल्लीत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी
आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
रिंकु परिक्षा देणार असलेल्या परिक्षा केंद्र ज्या महाविद्यालयामध्ये आहे, त्या महाविद्यालयाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परिक्षा सुरु होणार आहे. मुंबईतील सोफिया महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला आयपॅडवर परिक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
एका महिलेने या कार्यक्रमात ऑनलाईन गेमिंगबद्दल प्रश्न विचारला असता, “तुमचा मुलगा पबजी खेळतो का? फ्रंटलाइनवाला आहे का?” असा प्रतिप्रश्न पंतप्रधान मोदींनी त्या महिलेला विचारला.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात पोहोचण्यास उशिर झाला तरी त्यांना परिक्षेला बसू द्यावे. अशी सूचना मुंबई विद्यापीठाने सर्व परिक्षा केंद्रांना दिली आहे.
आजच्या काळात सरकारी नोकरी प्राप्त करणे, ही प्रत्येक तरुणाची मनस्वी मनीषा. त्यासाठी भरमसाट शुल्क भरून तरुण विविधांगी मार्गदर्शन वर्गांना प्रवेश घेत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते.